सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अखेर राज्यातील या २५ जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील होणार

आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांची माहिती

by Gautam Sancheti
जुलै 29, 2021 | 5:30 am
in मुख्य बातमी
0
Rajesh Tope 3005 1 679x375 1

मुंबई – राज्यातील कोरोना निर्बंध शिथीलतेबाबत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोना संसर्ग कमी असणाऱ्या राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथील होणार आहेत. तर ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. तसे, डॉ. टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य टास्क फोर्सच्या बैठकीनंतर डॉ. टोपे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य टास्क फोर्सची बैठक आज झाली. राज्यात ४ कोटीहून अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात मृत्यू आणि संसर्ग दर कमालीचा घटला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता देण्याच्या तयारीत आहे. याबाबत जिल्हा पातळीवरुन विविध प्रकारची माहिती आरोग्य विभागाने मागवून त्याचा प्रस्ताव सादर केला. त्यावत चर्चा करण्यात आली. त्यानुसार २५ जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील केले जाणार आहेत. निर्बंध शिथील झाल्यानंतर कोरोना संसर्ग वाढला तर पुन्हा निर्बंध लावण्यात येतील. यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसे, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना मुंबईत लोकल प्रवासाची मुभा देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. त्यावरही ते अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या जिल्ह्यांना दिलासा नाही

राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण ५ टक्क्यांच्याही खाली आहे. तेथे कोरोना निर्बंध शिथील होणार आहेत. मात्र, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, बीड, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात अद्यापही संसर्गाचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

ही सूट मिळणार
राज्यातील २५ जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील होताना सोमवार ते शनिवार दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. केवळ रविवारी पूर्णपणे बंद असणार आहे. ज्या दुकाने आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण झाले आहे तेथे ५० टक्के सुरू राहण्यास मुभा देण्यात येणार आहे. दुकाने, रेस्टॉरंट, सिनामागृहे, शो रुम्स यांना अटीशर्थी घालून परवानगी मिळणार आहे, असे टोपे यांनी सांगितले आहे.

उत्तर महाराष्ट्राला दिलासा
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील होणार आहेत. मात्र, अहमदनगर येथे निर्बंध कायम राहणार आहेत. दरम्यान, निर्बंध शिथील झाले तर कोरोनाचे नियम पाळावेच लागतील, असे डॉ. यांनी बजावले आहे.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ब्रह्मगिरी संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा मोठा निर्णय

Next Post

हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक फोटो

हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 2

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची धमकी…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 3, 2025
unnamed 6

नाशिक जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात…विरल आणि अन्यना यांची उत्तम कामगिरी

ऑगस्ट 3, 2025
crime 12

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

ऑगस्ट 3, 2025
image0037LA4 e1754183811326

जळगावात जमले भारताचे भावी बुद्धिबळपटू: ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

ऑगस्ट 3, 2025
IMG 20250802 WA0467 e1754183550323

मठाच्या माधुरी हत्तीणी स्थलांतराबाबत वनताराने केली आपली भूमिका स्पष्ट….

ऑगस्ट 3, 2025
3 1024x683 1

दीडशे दिवस उपक्रमात होणार अनुकंपाच्या सर्व पदांची भरती…अतिरिक्त जिल्हाधिकारी होणार आरडीसी

ऑगस्ट 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011