नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– त्र्यंबकेश्वर रस्त्या लगत असलेल्या संदीप युनिव्हर्सिटीमध्ये मंगळवारी झालेल्या मधमाशांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील विद्यार्थ्यांना सुट्टी देत तज्ञांच्या सहाय्याने व पेस्ट कंट्रोल करत येथील मधमाशांचे मोहोळ हटविण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य अमोल पोटगंटवार यांनी दिली.
मंगळवारी मधमाशांच्या हल्ल्यात कॅम्पस मधील १५ ते २० विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. खबरदारीचे पाऊल म्हणून बुधवारी विद्यार्थ्यांना सुट्टी देत येथील मधमाशी मोहोळ हटविण्यात आल्याचे पोटगंटवार यांनी सांगितले.
संदीप युनिव्हर्सिटी मधील एस बिल्डींग जवळ मंगळवारी दुपारी तीन वाजता अचानक मधमाशांचे मोहोळ उठत त्यांनी थेट विद्यार्थ्यांना हल्ला चढवला. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी इतरत्र पळ काढला, मात्र पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना मदमाश्यांनी विद्यार्थ्यांना चावा घेतला होता. सर्व जखमी विद्यार्थ्यांना सातपूर अशोकनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. पैकी तीन विद्यार्थ्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर उपचार सुरू आहे. यात काहींना किरकोळ जखमा झाल्या असून चार विद्यार्थ्यांच्या डोळे आणि काना जवळ चावा घेतल्याने गंभीर जखमी झाले होते.
विद्यार्थ्यांचा आरडा ओरडा ऐकू आल्याने त्यांना वाचवणाऱ्या सुरक्षा रक्षक व बाउन्सर यांच्यावरी मधमाश्याने जोरदार हल्ला केला आहे. यात शुभम गुंजाळ यास मधमाशानी सर्व बाजूनी हल्ला केला असून त्यावर अतिदक्षतता विभागात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, आकांशा पाटील,अंशी कसबे, भावेश राऊत, प्रसन्नजीत वाघोळे, मोहित जाधव,संदीप शेरे, महेश बोरसे,माळी (पूर्ण नाव नाही माहित नाही) आदीसह सात आठ जण खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. काही जखमीना प्राथमिक तपासणी व औषध उपचार केल्यावर घरी सोडण्यात आले आहे.
खर्च संदीप युनिव्हर्सिटीने उचलला
मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व जखमी विद्यार्थ्यांचा रुग्णालयाचा खर्च संदीप युनिव्हर्सिटीने उचलला असून पुढील देखभालही युनिव्हर्सिटी करणार असल्याची माहिती प्राचार्य अमोल पोटगंटवार यांनी दिली.