गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुप्रिम कोर्टाचा LIC ला दणका; विमा नाकारल्याने दिले हे निर्देश

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 3, 2021 | 5:06 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
SC2B1

 

नवी दिल्ली – आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन सुरूळीत व्हावे म्हणून लोक जीवन विमा काढतात. संबंधित कंपनीनुसार या जीवन विम्याचे विविध उत्पादने असतात. त्यासाठी दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक हप्ते फेडण्याची तरतूद असते. आज विमा क्षेत्रात अनेक खासगी कंपन्या असल्या तरीही बहुतेक लोक अजूनही भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) जीवन विम्याला प्राधान्य देताना दिसतात. तिथे आपली गुंतवणूक आणि नंतर मिळणारी दाव्याची रक्कम आदी सर्वकाही सुरळीत आणि सुरक्षितपणे होईल असा विश्वास त्यांना असतो. मात्र  एलआयसीने जीवन सुरक्षा नावाच्या विमा पॉलिसीचा दावा नाकारला. परिणामी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.

न्यायालयाने विमा कंपनीला निर्देश दिलेत की, त्यांनी आपल्या सर्व अटी आणि शर्ती विमा खरेदीच्या कागदपत्रांमध्ये ठळक नमूद कराव्यात जेणे करून ग्राहकांना त्याची स्पष्ट कल्पना असेल. मात्र न्यायालयाच्या निर्णयाचा प्रत्यक्ष दावेदारांना काहीही उपयोग झाला नाही. कारण न्यायालयाने निकाल विमा कंपनीच्या म्हणजेच एलआयसीच्या बाजूने दिला. परिणामी विम्याच्या दावेदारांना केवळ विमा कंपनीत भरलेले हप्तेच परत मिळू शकले.

त्याचं झालं असं होतं की एका व्यक्तीने एलआयसी ची 3. 75 लाख रुपयांची जीवन सुरक्षा विमा पॉलिसी खरेदी केली होती. त्यासाठी तो सहामाही हप्ता देत होता. मात्र काही कारणाने तो पॉलिसीचे नियमित हप्ते भरू शकला नाही. दरम्यान 2012 मध्ये एका अपघातात तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने विमा रकमेसाठी अर्ज केला, पण कंपनीने तो फेटाळून केवळ जमा असलेली मूळ रक्कम 3.75 लाख तेवढीच विमाधारकाच्या पत्नीला दिली.

मात्र दाव्याची 3.75 लाख रुपयांची रक्कम द्यायला नकार दिला. त्यासाठी त्यांनी नियमित हप्ता भरलेला नाही याचे कारण दिले. दरम्यान संबंधित महिला जिल्हा ग्राहक मंचात गेल्यावर ग्राहक मंचाने तिच्या बाजूने निकाल दिला. त्या विरोधात एलआयसीने राज्य तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली, तिथे मात्र महिलेच्या विरोधात निकाल दिल्यावर महिलेने राष्टÑीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दावा दाखल केला. त्यांनी मात्र महिलेच्या बाजूने निकाल दिला.

मात्र हे प्रकरण इथेच थांबले नाही. दरम्यान या निर्णयाविरोधात विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केल्यावर सर्वोच्च न्यायालयाने कंपनीची बाजू योग्य ठरविली. त्यांनी सांगितले की विमा कंपनी आणि ग्राहकांमध्ये विमा पॉलिसी घेणे हा करार असतो अािण त्यांच्या अटी-शर्तीचे पालन करून दोघांनीही त्या कराराचा आदर करायला हवा. ज्या अर्थी संबंधित विमाधारकाने विम्याचे हप्ते थकविले आहेत, त्या अर्था त्यांना विमा कंपनीकडून मिळणारी पॉलिसीमधील दाव्याची रक्कम मिळण्याचा प्रश्नच येत नाही.

मात्र संबंधित विमा कंपनी, एलआयसीनेही पॉलिसी विकताना आपल्या अटी आणि शर्तींमध्ये या अटी ठळक नमूद करायला हव्यात असे निर्देशही न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिपाठी यांच्या पीठाने दिले आहेत. या निर्णयामुळे आता संबंधित महिलेला केवळ 3.75 लाख इतक्याच रकमेवर समाधान मानावे लागणार आहे. विमा पॉलिसी धारकांनीही यातून बोध घेण्यासारखा असून वेळेत पॉलिसीचे हप्ते भरणे आणि हप्ते चुकू किंवा थकू न देणे याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपले कुटुंबिय किंवा आप्त आपल्यानंतरही सुरक्षित कसे राहतील?

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निर्लज्जपणाचा कळस! हुंड्यासाठी घरात सीसीटीव्ही लावून महिलेचे अश्लील फोटो काढले

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – सत्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post
laugh3

इंडिया दर्पण - हास्य षटकार - सत्य

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011