पुणे – चांगल्या पॉलिसीत गुंतवणूक केली तर, त्याचा चांगला परतावा मिळतो. बहुतांश सगळेच जण मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी पैसे जमा करतात. यासाठी विचार करून पद्धतशीरपणे गुंतवणूक केली जाऊ शकते. तेव्हाच तुमचे पैसे योग्यरितीने वाढू शकतील. अनेकवेळा बँकेत गुंतवणूक करण्यापेक्षा इतर ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीकडेसुद्धा अशीच एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.
एलआयसीने एक विशेष पॉलिसी सादर केली आहे. त्यामध्ये तुम्ही मुलीसाठी हळूहळू पैसे गुंतवू शकता. त्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. या परताव्याचा वापर तुम्ही मुलीच्या लग्नासाठी करू शकतात. मुलीच्या लग्नाच्या काळात तुमच्यासमोर कोणतीही आर्थिक अडचण निर्माण होणार नाही. एलआयसीच्या या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला दररोज १५० रुपये जमा करावे लागतील. मुलीच्या लग्नाच्या वेळी तुम्हाला २२ लाख रुपयांचा परतावा मिळेल.
या पॉलिसीत काही विशेष बाबी आहेत. त्यामध्ये मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यास तत्काळ कुटुंबियांना दहा लाख रुपये मिळतील. वडिलांचा मृत्यू अपघातात झाल्यास कुटुंबियांना २० लाख रुपये मिळतील. वडिलांच्या मृत्यूनंतर या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याची गरज नाही. पॉलिसी त्याच स्वरूपात सुरू राहील. पॉलिसी सुरू असल्याच्या दरम्यान मुलीचा दरवर्षी शिक्षण आणि इतर खर्चासाठी एक लाख रुपये मिळेल. एलआयसीच्या संकेतस्थळावर या विशेष पॉलिसीबद्दल अधिक माहिती मिळेल.