गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक – हुतात्मा स्मारक येथे ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन, आदरांजली अर्पण

ऑगस्ट 9, 2021 | 12:26 pm
in स्थानिक बातम्या
0
20210809 121727

 

ऑगस्ट क्रांती दिनी मिळाले देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला मुख्य वळण – मंत्री छगन भुजबळ
नाशिक –
९ ऑगस्ट १९४२ रोजी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची गर्जना केली. याच दिवशी गांधीजींचा ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र देशातील हजारो तरुणांच्या नसानसात भिनला होता. देशभरातील नागरिक या आंदोलनातून उतरले. हे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला मुख्य वळण देणारे आंदोलन ठरले असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिक संघटना, हुतात्मा फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत आदरांजली अर्पण केली.

यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेस प्रदेश पदाधिकारी शरद आहेर, विजय राऊत, स्वातंत्र्यसैनिक उत्तम तांबे, अखिल भारतीय समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, नगरसेविका वत्सला खैरे, आशा तडवी, माजी नगरसेविका कविता कर्डक, बबलू खैरे, अभिजित राऊत यांच्यासह हुतात्मा स्मारकातील पदाधिकारी व स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले की, ‘ऑगस्ट क्रांती दिन’ स्वातंत्र्याची नवी पहाट होती. गांधीजींनी हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले होते. “आता कार्यकर्ता नाही तर नेता बना”, असे आवाहन देखील गांधीजींनी देशातील नागरिकांना केले. या स्वातंत्र्य संग्रामाला हिंसक वळण लागले होते. स्वातंत्र्य संग्रामातला हा शेवटचा करो या मरोचा लढा मानला जातो. इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य देऊन चालते व्हावे, यासाठी गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला. गांधीजींच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकजण नेता झाला होता. स्वातंत्र्यासाठी ज्याला जे पटेल ते तो करत होता. क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतींना आपण अभिवादन करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, या आंदोलनाची सुरुवात ‘गवालीया टॅंक’ म्हणजे आजच्या ‘ऑगस्ट क्रांती मैदाना’तून झाली आणि नंतर या आंदोलनाचा भडका संपूर्ण देशभरात पसरला. इंग्रजी सत्तेविरुद्ध संपूर्ण देश पेटून उठला. धर्म, जात, वंश इत्यादी बाबी बाजूला सारत लाखो लोक या जनआंदोलनात सामील झाले. इंग्रजांना परिस्थिती हाताळताना नाकी नऊ आले. या आंदोलनात इंग्रजांनी इतक्या लोकांना अटक केले की, जेलमध्ये जागाच शिल्लक राहिली नाही. इंग्रज कोणत्याही व्यक्तीला अटक करुन कुटूंबात डांबत होते. ब्रिटिशांनी सर्वच आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे जरी प्रचंड उद्रेक झाला असला तरी स्वातंत्र्याची पहाट या जनआंदोलनामुळेच उगवली, हे विसरता येणार असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्य घटनेमुळे एकसंघ राहिला आहे. डॉ.बाबासाहेब यांनी तयार केलेल्या घटनेचा जगभर अभ्यास केला जातो. या देशाच्या प्रगतीसह मनमोहन सिंग, नरसिंह राव यांच्याश नेत्यांनी देश प्रगती पथावर नेण्यास अधिक योगदान असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, महात्मा गांधी यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन लढा लढला मात्र आता देशात तुकडे तुकडे पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सर्वांनी सर्व भेद विसरून राजकारणातील नकारात्मक काढून टाकली पाहिजे. आपल्याला हा देश महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही विचारांवर चालवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी जातीभेद विसरून एकसंघ रहायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्वदेशी बनावटीचे विमानवाहक ‘विक्रांत’जहाजाचा पहिला सागरी प्रवास यशस्विरीत्या पूर्ण

Next Post

मुख्यमंत्र्यांना मनसेचा खोचक प्रश्न: मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवाल यासाठी याचिका करू का आंदोलन ?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
sandip deshpande e1628494965568

मुख्यमंत्र्यांना मनसेचा खोचक प्रश्न: मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवाल यासाठी याचिका करू का आंदोलन ?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011