शनिवार, सप्टेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोल्हापुरात पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन

by Gautam Sancheti
एप्रिल 5, 2022 | 4:45 pm
in इतर
0
00 PM

 

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र ही संतांची समृद्ध भूमी आहे. विश्व बंधुत्वाची शिकवण संतांनी घालून दिली आहे. संत साहित्यात विश्व कल्याणची ताकद असल्याने संत साहित्यातील विचार आणि शिकवण प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित ‘पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे’ उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष म्हणून ह.भ.प. न्या. डॉ. मदन महाराज गोसावी तर स्वागताध्यक्ष म्हणून संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते. कार्यक्रमास मान्यवर साहित्यिक, पादाधिकारी, वारकरी, साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.अमरवाणी इव्हेंट्स फाउंडेशन आयोजित पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि इंडसमून मीडिया, मुंबईद्वारा हे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे प्रायोजित करण्यात आले आहे.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सारे विश्व हे आपले घर असल्याची शिकवण संतांनी दिली आहे. आज मात्र आपण या शिकवणीपासून दूर जावून नात्या-नात्यात गुंतलो आहोत. सुखी जीवनासाठी संत साहित्याचे मनन, चिंतन करुन त्यांचे आचार-विचार प्रत्येकाने आचरणात आणावेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत तुलसीदास, गौतम बुद्ध, गुरु गोविंदसिंग यांच्यासह सर्व धर्मातील संतांनी त्यांच्या साहित्यातून विश्व कल्याणाची शिकवण दिली आहे.

संतांची साधना मोठी आहे, सारे लोक ईश्वराची लेकरे आहेत, ही भावना सर्वसामान्यांच्या मनात संतांनी रूजवली. जगाला आश्चर्य वाटावे अशी पंढरपूर येथे वारी होत आहे. या वारीतून संतांनी सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे. संतांची ही भावना जगासमोर आणण्यासाठी संत साहित्याचे अध्ययन होणे गरजेचे असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी सांगितले.
जगातील अनेक तत्वज्ज्ञ ज्ञानेश्वरीसह भारतातील अन्य धर्मग्रंथांचे अध्ययन करीत असून संत साहित्याचा देश विदेशात प्रचार होणे गरजेचे आहे. कोल्हापुरात घेण्यात आलेल्या या संत साहित्य संमेलनातून विश्वकल्याणाचा विचार सर्वदूर पोहोचेल, असा विश्वास राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.
विश्वाच्या कल्याणासाठी संताचे विचार, आचार, साहित्य सर्वांसमोर यावे यासाठी संयोजकांनी भरविलेल्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनास शुभेच्छा देवून यासाठी पाच लाख रुपये मदत देत असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जाहिर केले.
संमेलनाध्यक्ष ह.भ.प. न्या. डॉ. मदन महाराज गोसावी म्हणाले, मानवाच्या कल्याणाचे सूत्र संत साहित्यात आहे. संतांचे विचार, शिकवण जनसामान्यांपासून गाव-शिवारापर्यंत नेण्यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्व धर्मांचे तत्वज्ञान जगासमोर येईल. मानवामध्ये विश्व बंधुत्वाचा धागा आहे. कोरोनाच्या संकट काळात एकमेकाला मदत करण्याची भूमिका यामुळेच दिसून आल्याचेही ते म्हणाले.

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘हे विश्वची माझे घर’ मानून संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी जगाच्या कल्याणासाठी कार्य केले. विश्वाला शिकवण देण्याची ताकद संत साहित्यात आहे. या विचारांच्या जोरावर कोणत्याही देशावर आलेल्या संकटात भारत देश योग्य विचार व दिशा देवून कठीण परिस्थिती बदलण्याची भूमिका बजावू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संतांनी आपल्या साहित्यातून भूतदया हा मंत्र जगासमोर आणला. संमेलनाच्या माध्यमातून हा मंत्र जोपासण्याचा विचारही रुजेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी देश-विदेशातील संत साहित्यिकांशी संवाद साधला. तत्पूर्वी सकाळी टाळ-मृदंग व हरिनामाच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष ह.भ.प. न्या. डॉ. मदन महाराज गोसावी व लोक साहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथ दालनाचे उद्घाटन संत साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते तर अध्यात्मिक विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या चित्रदालनाचे उद्घाटन डॉ. सुहास बहुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विद्युत क्षेत्र कामगार युनियनच्या महाअधिवेशनात ऊर्जामंत्र्यांनी केली ही घोषणा

Next Post

महाराष्ट्रातील ५ नद्यांच्या संवर्धनासाठी ११८२ कोटींची घोषणा; केंद्र सरकारचा निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

CBI ने या स्पर्धा परिक्षा घोटाळ्यातील भरती प्रकरणी पाच आरोपींना केली अटक…IAS सह उच्च अधिकारी जाळ्यात

सप्टेंबर 20, 2025
cidco1 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

या कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला..इतक्या कामगारांना मिळाले १० लाखाचे धनादेश

सप्टेंबर 20, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांच्या १३०० स्मृतिचिन्हे ई-लिलावात नाशिक मधील श्री काळाराम मंदिरातील चांदीचा राम दरबार…या संकेतस्थळावर द्या भेट

सप्टेंबर 20, 2025
G1Ovmg XYAAE7vR e1758332093239
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताचा सलग तिसरा विजय….ओमानला २१ धावांनी केले पराभूत

सप्टेंबर 20, 2025
ladki bahin 750x375 1
राज्य

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू….

सप्टेंबर 20, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

मोठा निर्णय….अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवानाच होणार निलंबित

सप्टेंबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील, जाणून घ्या, शनिवार, २० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 19, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मंत्री समिती गठीत…या सात मंत्र्यांचा समावेश

सप्टेंबर 19, 2025
Next Post
Agrani River Basin Rejuvenation 1 750x375 1

महाराष्ट्रातील ५ नद्यांच्या संवर्धनासाठी ११८२ कोटींची घोषणा; केंद्र सरकारचा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011