शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मान्सूनपूर्व पाऊस नुकसानी बाबत शेतकऱ्यांना तातडीने मदत करा….किसान सभेची मागणी

by Gautam Sancheti
मे 20, 2025 | 8:32 am
in संमिश्र वार्ता
0
kisan sabha

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यभर मान्सूनपूर्व अवेळी पावसाने शेतीचे, शेती पिकांचे व शेतजमिनीचे अतोनात नुकसान होत आहे. खरीप पूर्व मशागतीची कामे यामुळे संपूर्णपणाने वाया गेली असून फळबागा, भाजीपाला व इतर उभ्या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. कमी वेळामध्ये अधिक पाऊस पडत असल्यामुळे शेतजमिनी व बांधबंधिस्ती अनेक ठिकाणी वाहून जात आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचे सांगत किसान सभेने तातडीने मदतीची मागणी केली आहे.

राज्यात खरीप हंगामाची तयारी करण्यात शेतकरी गुंतला असताना शेतकऱ्यांवर व शेतीवर ओढवलेल्या या संकटामुळे हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मान्सूनपूर्व होत असलेल्या या अतिवर्षणाचा खरीप हंगामावर काय परिणाम होऊ शकतो व त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत कृषी विद्यापीठे व कृषी तज्ञ यांनी सजगपणाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

राष्ट्रीय आपत्ती सहायता निधी अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करण्याची कारवाई राज्य सरकारने तातडीने सुरू केली पाहिजे. केंद्र सरकारने याबाबत राज्य सरकारच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद तातडीने दिला पाहिजे व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे. राज्य व केंद्र सरकारने याबाबत तातडीने पावले उचलावीत अशा प्रकारचे आवाहन अखिल भारतीय किसान सभा करत आहे.

राज्य सरकारने पीक विमा योजनेमध्ये केलेल्या बदलाचा अत्यंत वाईट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. शेतकऱ्यांना ज्या तरतुदी अंतर्गत सर्वाधिक भरपाई मिळत होती त्या प्रमुख चार तरतुदी राज्य सरकारने पीक विमा योजनेतून काढून टाकल्या आहेत. राज्य सरकारने कृषी योजना व पीक विम्याचे पैसे लाडक्या योजनांकडे वळवण्याचा घाट घातला असून पीक विमा योजनेतील बदल त्याचीच फलनिष्पत्ती आहे. राज्य सरकारने येऊ घातलेले संकट पाहता पीक विमा योजनेत केलेले बदल मागे घ्यावेत व शेतकऱ्यांना अधिक सहाय्यभूत होतील अशा प्रकारचे बदल करून सक्षम पीक विमा योजना राज्यात राबवावी अशी मागणीही किसान सभा करत असल्याचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक…नियमांचे पालन न केल्यास इतका होणार दंड

Next Post

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन….देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 39

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन….देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना तारेवरची कसरत करावी लागेल, जाणून घ्या, शुक्रवार, १ ऑगस्टचे राशिभविष्य

जुलै 31, 2025
bjp11

काँग्रेसचे हे माजी आमदार समर्थकांसह भाजपामध्ये…प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

जुलै 31, 2025
IMG 20250731 WA0303 1

नाशिकमध्ये पाण्यासाठी या भागातील रहिवाशी रस्त्यावर; जलकुंभाजवळ निदर्शने, अधिकार्‍यांना विचारला जाब

जुलै 31, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाची ४ बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्राच्या या मार्गिकांचा समावेश

जुलै 31, 2025
post

भुसावळ टपाल विभागात ‘ए.पी.टी.’ प्रणालीचा शुभारंभ; या तारखेपासून सात तालुक्यांत कार्यान्वित

जुलै 31, 2025
bjp11

मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर भाजपने दिली ही प्रतिक्रिया…

जुलै 31, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011