रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुम्हाला माहित आहे? या राजाला होत्या ३६५ राण्या आणि एवढी मुलं

एप्रिल 29, 2021 | 12:46 am
in संमिश्र वार्ता
0
CbMVv TUMAA0X1t

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सध्या आपल्या देशात लोकशाही राज्यव्यवस्था असली तरी एकेकाळी राजेशाही कारभार होता. भारतात अनेक राजे-महाराजे राज्य करीत होते. त्यांच्या बडेजाव आणि श्रीमंतीचे अनेक किस्से सांगितले जातात. काही राजे-महाराजे शिकारीचा छंद जोपासत तर काहीजण तलवारी संग्रह करीत. यापैकीच एक आगळेवेगळे राजे म्हणजेच उत्तर भारतातील पटियालाचे भूपिंदर सिंग महाराज होत.
     महाराजा भूपिंदर सिंग हे पटियाला संस्थानचे ३८ वर्ष राजे होते. ज्यांच्या बद्दलचे काही किस्से जगभरात लोकप्रिय आहेत. १२ ऑक्टोबर १८९१ रोजी जन्मलेल्या भूपिंदरसिंग वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी राजा बनले. परंतु जेव्हा ते १८ वर्षांचे झाले तेव्हाच त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पटियालावर त्यांनी ३८ वर्षे राज्य केले. महाराजा भूपिंदरसिंग यांच्या जीवनाविषयी काही रंजक गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करतात.

download 1 1

      महाराजा भूपिंदरसिंग यांच्या रंगील्या मनोवृत्तीचा उल्लेख दिवाण जरमानी दास यांनी त्यांच्या ‘महाराजा’ पुस्तकात केला आहे. राजाने पटियालामध्ये ‘लीला-भवन’ किंवा ‘रंग भवन ‘ नावाचा राजवाडा बांधला होता, जिथे केवळ विशिष्ठ लोकांना प्रवेश मिळेल.
दिवाण जरमानी दास यांच्या म्हणण्यानुसार, राजवाड्यातील एक खास खोली होती, ज्याला ‘प्रेम मंदिर’ म्हटले गेले होते, ते केवळ महाराजासाठी आरक्षित  होते, म्हणजेच, त्याच्या परवानगीशिवाय दुसरे कोणीही खोलीत प्रवेश करू शकत नाही.  या खोलीत राजाच्या आनंदासाठी संपूर्ण व्यवस्था होती.
       या वाड्याच्या आत एक मोठा तलाव होता, त्याला जलतरण तलाव म्हणता येईल. तिथे जवळपास दीडशे लोकांना आंघोळ करण्याची सोय होती. राजा अनेकदा येथे मेजवानी देत असे, त्यामध्ये तो आपल्या खास मित्रांना आणि मैत्रिणींना बोलावत असे.  याशिवाय महाराजांचे काही खास लोकही या पार्टीत सामील व्हायचे.  हे सर्व लोक तलावामध्ये खूप वेळ आंघोळ करत आणि पोहण्याचा आनंद घेत.

CbMVv TUMAA0X1t

      इतिहासकारांच्या मते, महाराजा भूपिंदरसिंग यांना १० महाराण्यांसह एकूण ३६५ राण्या होत्या. त्यांच्यासाठी पटियाला येथे भव्य वाडे बांधण्यात आले होते. या राजवाड्यांमध्ये राण्यांचे आरोग्य तपासण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे पथकही हजर होते. महाराजाला १० राण्यांकडून ८३ मुले झाली होती, मात्र त्यापैकी फक्त ५३ मुलेच जगू शकली.
    असे म्हटले जाते की, महाराजाच्या वाड्यात दररोज ३६५ कंदील पेटले जात असत आणि प्रत्येक कंदिलावर त्याच्या ३६५ राण्यांची नावे लिहिलेली असे. याशिवाय महाराजा भूपिंदरसिंग इतरही बऱ्याच गोष्टींसाठी जगभर प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे जगातील प्रसिद्ध ‘पटियाला हार’ होता. त्यात २९०० हून अधिक हिरे आणि मौल्यवान रत्ने जड होती. या हारमध्ये त्यावेळी जगातील सातवा सर्वात मोठा हिरा होता.  सन १९८८ च्या सुमारास हा बहुमोल हार पटियालाच्या शाही तिजोरीतून गायब झाला आणि काही वर्षांनंतर त्याचे वेगवेगळे भाग अन्य ठिकाणी सापडले.
     मद्य प्रकारात प्रसिद्ध ‘पटियाला पेग ‘ ही महाराजा भूपिंदरसिंग यांची खास गोष्ट आहे.  हे पेगचे पेले (ग्लास ) विशिष्ठ आकाराचे होते. त्याचप्रमाणे त्याच्याकडे ४४ रोल्स रॉयस कार होती, त्यापैकी २० कार दैनंदिन कामांसाठी वापरल्या जात असे.
विशेष म्हणजे, महाराजा भूपिंदरसिंग हे भारतातील पहिले व्यक्ती होते ज्यांचे स्वतःचे विमान होते, ते विमान त्यांनी सन १९१० मध्ये ब्रिटनमधून खरेदी केले. आपल्या विमानासाठी पटियाला येथे एक विमानतळ (धावपट्टी ) बांधले होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वनविभागातील भरतीत आता यांच्यासाठी राहणार जागा राखीव

Next Post

निआ शर्माच्या डान्सवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
nia sharma

निआ शर्माच्या डान्सवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011