डांगसौंदाणे – केळझर (गोपाळ सागर) धरण ओव्हरफ्लो झाल्याने आराम खोरे तील जनतेत समाधानाचे वातावरण आहे. पश्चिम पट्ट्यात वरदान ठरलेले केळझर गोपाळ सागर धरण हे ५७२ दलघफु क्षमतेचे आहे. धरण भागात होणाऱ्या रिमझिम पावसाने धरण अंतिम टप्प्यात भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून ३५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग आरम नदी पात्रात सुरू आहे. धरण भरल्याने आरम नदीवरील ३० ते ३५ गावांसह सटाणा शहराचा उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे. तर रब्बी हंगामासाठी ही कालव्यावर अवलंबून असलेल्या गावांना फायदा होणार आहे. यापुढील काळात या भागात चांगले प्रजन्यमान झाल्यास नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी येण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. कर आराम नदीपात्र भरून वाहू लागल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.