विशेष प्रतिनिधी, मुंबई
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘अनुपमा’त आपण लवकरच एक नवीन ट्विस्ट पाहणार आहोत. प्रमुख भूमिकेत असलेल्या अनुपमा आणि वनराज यांचे लग्न होऊन घटस्फोट झाला आहे. तरीही वनराज आणि काव्या या दोघांचे अफेअर आहे. आणि ते दोघे लग्न करणार आहेत. मात्र, ऐन लग्नाच्या क्षणीच वनराज गायब आहे आणि त्यामुळे काव्या चिंताग्रस्त. आता पुढे काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. वनराज अचानक कसा गायब झाला? तो काव्याशी लग्न करणार की नाही, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
त्यातच या मालिकेत सध्या राखी म्हणजेच अनुपमाची विहीण, परितोषची सासू हिची एंट्री झाली आहे. आपल्या मुलीचे, किंजलचे लग्न या घरात करून देण्याबाबत ती साशंक आहे. याच राखीची सध्या मालिकेत एंट्री झाली आहे.










