गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वाद आणखी पेटणार! महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येण्यास बंदी; कर्नाटकचा फतवा

by Gautam Sancheti
डिसेंबर 2, 2022 | 7:41 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
CM Basavraj Bommai

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यान सीमावाद सुरू असतानाच कर्नाटक सरकारने एक अजब फतवा काढला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील कोणत्याही मंत्र्यांना बेळगावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकच्या या अजब फतव्यामुळे सीमावादाचा प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचे होणार असून महाराष्ट्रात याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

सध्या गेल्या आठवड्यापासून हा प्रश्न अधिकच तीव्र बनला आहे. दरम्यान, एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही जिल्ह्यांवर दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे राज्यातील एकही गावच काय जमिनीचा तुकडाही कर्नाटकाला जाऊ नये म्हणून राज्याने जोरदार प्रयत्न सुरू केलेले असतानाच सोलापुरातील २८ गावांनी कर्नाटकात जाण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. तसा ठरावही त्या गावांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता दुसरीकडे महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे पत्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवले आहे. महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना हे पत्र पाठवले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने सीमावादावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. तसेच या समन्वय समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई आहेत. आता हे दोन्ही मंत्री दि. ६ डिसेंबर रोजी कर्नाटकात जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हे पत्र पाठवले आहे. त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी आपण कर्नाटकात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) पक्ष नेते संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील मंत्र्यांनी केवळ तेथे जाऊ नये तर तेथे उपोषण करावे, आणि राज्याच्या हितासाठी काही तरी ठोस निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे यापुर्वी अशीच बंदी असताना माजी मंत्री छगन भुजबळ हे वेषांतर करून बेळगाव मध्ये गेले होते. मात्र आता विदयमान मंत्री काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

असा आहे सीमावादाचा इतिहास
सध्याचे कर्नाटक राज्य म्हणजे पूर्वीचे म्हैसूर हे राज्य होय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन १९४८मध्ये भारतातील पहिले राज्य म्हैसूर हे बनले असून दि.१ नोव्हेंबर १९७३ मध्ये म्हैसूरचे नाव बदलून कर्नाटक करण्यात आले. त्याआधी सन १९५६ मध्ये तत्कालीन म्हैसूर राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी विजापूर, धारवाड, गुलबर्गा, बीदर यासह बेळगाव जिल्हा म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला. यावेळी भाषावार प्रांतरचना लक्षात न घेता प्रशासकीय कामांमध्ये बदल घडवण्यासाठी कायदा मंजूर करत बेळगावचा समावेश म्हैसूर राज्यात करण्यात आला. या राज्याची राज्यभाषा कन्नड असल्याने सध्या बेळगावसह सीमाभागामध्ये कन्नड भाषेची सक्ती केली जाते. त्यामध्ये कारवार, निपाणी ,बिदर, बेळगाव या शहरासह ८६५ गावांचा समावेश या राज्यात करण्यात आला. विशेष म्हणजे सीमाभागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला. तेव्हापासून मराठी भाषिक जनतेचा सीमाप्रश्नाचा हा लढा सुरू आहे.

Karnataka Order Maharashtra Minister Ban in Belgavi
Border Issue Controversy

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बहुविकलांग बालकांचा प्रश्न ऐरणीवर! बघा, अशी आहे त्यांची अतिशय गंभीर अवस्था

Next Post

गीता जयंती; भगवद्गीतेतील शिकवणींची उजळणी करण्याची संधी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

VIRENDRA DHURI
संमिश्र वार्ता

‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

सप्टेंबर 11, 2025
sushila kargi
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की? अंतरिम सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु

सप्टेंबर 11, 2025
G0e W1lXkAAWJGD
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रव्यापी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक…झाले हे निर्णय

सप्टेंबर 11, 2025
G0f9gZ0aYAAJPQC e1757556321796
मुख्य बातमी

आशिया कपमध्ये भारताची सलामी…पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने यूएईच्या संघाचा ९ विकेट्सने केला पराभव

सप्टेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
Next Post
IMG 20221202 WA0202

गीता जयंती; भगवद्गीतेतील शिकवणींची उजळणी करण्याची संधी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011