बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कर्नाटकात भाजपचा पराभव का झाला? ही आहेत प्रमुख ५ कारणे

by Gautam Sancheti
मे 13, 2023 | 2:26 pm
in इतर
0
Narendra Modi e1683968154575

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  कर्नाटक निवडणुकीचे निकाल आता बऱ्याच अंशी स्पष्ट झाले आहेत. हिमाचल प्रदेशपाठोपाठ कर्नाटकातही भाजपला मोठा झटका बसला आहे. गेल्या वर्षभरात काँग्रेसने भाजपच्या हातून सत्ता काढून घेतलेले हे दुसरे राज्य आहे. त्यातून मोठा राजकीय अर्थ काढला जात आहे. विशेषत: भाजपसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

यंदा कर्नाटकपाठोपाठ आणखी पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. याशिवाय पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे. यानंतर सात राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. येत्या दोन वर्षांत लोकसभेच्या तसेच १३ मोठ्या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये दक्षिणेकडील अनेक राज्येही आहेत. त्यामुळे कर्नाटकचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर अडचणीत सापडलेल्या काँग्रेससाठी ती संजीवनी ठरली आहे.

कर्नाटकात भाजप का हरला?
राजकीय विश्लेषकांच्या मते, ‘कर्नाटक निवडणुकीचे चित्र विधानसभा निवडणुकीतच बऱ्याच अंशी स्पष्ट झाले होते. यावेळी निवडणुकीत भाजप बॅकफूटवर तर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. अशा स्थितीत भाजपच्या या पराभवाचा अर्थ स्पष्ट होतो. भाजपच्या पराभवाची पाच प्रमुख कारणे आहेत.

१. अंतर्गत कलह
हे सर्वात मोठे कारण आहे. केवळ निवडणुकीच्या काळातच नाही तर याच्या खूप आधीपासून भाजपमधील अंतर्गत कलहाच्या बातम्या चव्हाट्यावर आल्या होत्या. कर्नाटक भाजपमध्ये अनेक गटबाजी निर्माण झाली होती. एक म्हणजे बेदखल मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा गट, दुसरा विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा, तिसरा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष आणि चौथा भाजप प्रदेश नलिन कुमार कटील यांचा गट. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांच्या नेतृत्वाखाली पाचवी आघाडीही होती. या सर्व आघाड्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते चिरडले जात होते. प्रत्येकाच्या आत सत्तेच्या खेळाची लढाई चालू होती.

२. तिकीट वाटपाचा घोळ :
तिकीट वाटपाबाबत मोठा गोंधळ उडाला. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची तिकिटे कापणे भाजपला महागात पडले. पक्षश्रेष्ठींच्या बंडखोरीमुळे भाजपलाही अनेक जागांवर धक्का बसला आहे. अशा १५ हून अधिक जागा आहेत, जिथे भाजपच्या बंडखोर नेत्यांनी निवडणूक लढवून पक्षाचे मोठे नुकसान केले. जगदीश शेट्टर, लक्ष्मण सवदी यांसारखे नेते वेगळे होणेही पक्षासाठी तोटाच ठरले.

३. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप :
संपूर्ण निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने आक्रमकपणे मांडला. तोच भापसाठी कर्दनकाळ ठरला. निवडणुकीपूर्वी भाजप आमदाराचा मुलगा लाच घेताना रंगेहात पकडला गेला. त्यामुळे भाजप आमदाराला तुरुंगातही जावे लागले. भाजप सरकारने ४० टक्के कमिशनचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत एका ठेकेदाराने गळफास लावून घेतला होता. संपूर्ण निवडणुकीत काँग्रेसने हा मुद्दा जोरदारपणे मांडला. राहुल गांधींपासून मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधींपर्यंत सगळ्यांनीच या मुद्द्याचं भांडवल केलं. जनतेमध्ये भाजपची प्रतिमा डागाळली आणि पक्षाचे मोठे नुकसान झाले.

४. दक्षिण विरुद्ध उत्तर :
हे देखील एक मोठे कारण मानले जाऊ शकते. सध्या दक्षिण विरुद्ध उत्तर अशी मोठी लढत सुरू आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून सध्या केंद्रात सत्तेत आहे. अशा स्थितीत हिंदी विरुद्ध कन्नड या लढतीत भाजप नेत्यांनी गप्प राहणेच योग्य मानले. त्याचवेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी कर्नाटकात हा मुद्दा आवाज उठवला. नंदिनी दूध प्रकरण हे त्याचे उदाहरण आहे. काँग्रेसने नंदिनी दुधाचा मुद्दा खूप गाजवला. एक प्रकारे भाजप उत्तर भारतीय कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे, तर दक्षिणेतील कंपन्यांना बाजूला केले जात आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसने केला. यातून प्रादेशिक अस्मिता जागृत झाली.

५. आरक्षणाचा मुद्दा :
कर्नाटक निवडणुकीत भाजपने चार टक्के मुस्लीम आरक्षण संपुष्टात आणून लिंगायत आणि इतर वर्गांमध्ये विभागले. याचा फायदा पक्षाला होईल, अशी अपेक्षा होती, मात्र अखेरच्या क्षणी काँग्रेसने मोठे फासे फेकले. काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आरक्षणाची व्याप्ती ५० टक्क्यांवरून ७५ टक्के करण्याची घोषणा केली होती. याने भाजपचे हिंदुत्व मोडीत काढले. आरक्षणाच्या आश्वासनाचा काँग्रेसला मोठा फायदा झाला. लिंगायत मतदारांपासून ते ओबीसी आणि दलित मतदारांनी काँग्रेसला साथ दिली.

https://twitter.com/narendramodi/status/1655161543246630912?s=20

Karnataka BJP Defeat Major 5 Reasons

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांनी मुंबईत घेतले घर… एवढी आहे त्याची किंमत… भरली एवढी स्टॅम्प ड्युटी…

Next Post

कर्नाटकमध्ये काँग्रेसचा मोठा विजय का झाला? ही आहेत प्रमुख कारणे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250901 WA0417
महत्त्वाच्या बातम्या

ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध, आजपासून राज्यभर उपोषणे आणि आंदोलने

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

सप्टेंबर 2, 2025
fire 1
क्राईम डायरी

धक्कादायक….कौटूंबिक वादातून मुलाने आईवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले

सप्टेंबर 2, 2025
image002EJ0W
महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे आणि स्टेट बँक यांच्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी झाला हा मोठा करार….

सप्टेंबर 2, 2025
crime1
क्राईम डायरी

चर्चच्या फादरसह अन्य दोघांवर टोळक्याचा हल्ला…जत्रा हॉटेल भागातील घटना

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाच दिवस…कोर्टाच्या आदेशानंतर ही आहे स्थिती

सप्टेंबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना काही आर्थिक समस्या त्रासदायक ठरतील, जाणून घ्या, मंगळवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 2, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
Next Post
Congress Sabha

कर्नाटकमध्ये काँग्रेसचा मोठा विजय का झाला? ही आहेत प्रमुख कारणे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011