बुधवार, ऑक्टोबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025 | 3:13 pm
in स्थानिक बातम्या
0
kanda 11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये आज कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा घाम आणि मेहनत वाया जात आहे. अशा गंभीर परिस्थितीत राज्यातील सत्ताधाऱ्यांनी दिल्लीत जाऊन कांदा प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा असताना ते फक्त मौन बाळगून बसले आहेत. त्याचवेळी विरोधक देखील शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नावर लढा देण्याऐवजी राजकीय पोळ्या भाजण्यात व्यस्त आहेत असे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे

चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि सलग दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्री राहिलेले शरद पवार साहेब यांना दिल्लीत जाऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून कांद्याच्या घसरलेल्या भावावर तातडीने निर्णय घ्यायला लावणे शक्य आहे. परंतु त्यांनी तसे केलेले नाही. उलट नाशिकमध्ये मोर्चे, रास्ता रोको काढून शेतकऱ्यांना फक्त भावनिक करण्याचे राजकारण ते करत आहेत. हे दाखवते की सत्ताधारी असो वा विरोधक, कुठल्याही पक्षाला शेतकऱ्यांचे प्रश्न मूळातून सोडवायचे नाहीत.

डिसेंबर २०२३ मध्ये केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केली होती. त्यावेळेसही शेतकरी प्रचंड अडचणीत आले, पण शरद पवार साहेब दिल्लीत जाऊन ती बंदी हटवण्यासाठी झटले नाहीत. त्याऐवजी त्यांनी नाशिकच्या चांदवडमध्ये रास्ता रोको करून जाहीर सभा घेतली. त्या आंदोलनाचा राजकीय फायदा विरोधकांना लोकसभेत सहानुभूतीच्या रूपाने मिळाला, पण शेतकऱ्यांना काहीच हाती लागले नाही.

आजही नेमके तसेच घडते आहे. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा अहंकार झाल्यामुळे ते शेतकऱ्यांना पायदळी तुडवत आहेत. तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उपयोग फक्त निवडणुकांमध्ये मतं मिळवण्यासाठी केला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शेतकऱ्यांचा राग आणि नाराजी भांडवल म्हणून वापरण्याचा विरोधी पक्षांचा डाव आहे, हे आता शेतकऱ्यांना स्पष्ट दिसू लागले आहे.

थोडक्यात सांगायचे तर शेतकऱ्यांच्या घामाचे आणि श्रमाचे चीज राजकारणी करत आहेत. शेतकऱ्यांचा फक्त राजकीय प्याद्याप्रमाणे वापर करून त्यांच्या प्रश्नांची खरी सोडवणूक कोणीही करत नाही. यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आर्थिक वाटोळे होत आहे असेही भारत दिघोळे यांनी सांगितले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

Next Post

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
i4tUkRbQ 400x400

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011