सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कांद्याचे शेकडो कंटेनर्स बॉर्डरवर आणि पोर्टवर अडकले…हे आहे कारण

by Gautam Sancheti
सप्टेंबर 16, 2024 | 11:54 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240916 WA0235 1 e1726511010302

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने १३ सप्टेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवरील साडेपाचशे डॉलरचे किमान निर्यात मूल्य पूर्ण हटवले तर कांद्याच्या निर्यातीवर असलेले निर्यात शुल्क ४० टक्क्यावरून २० टक्के केले आहे हे निर्णय नंतर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त कांदा निर्यात होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला दरवाढ मिळेल असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे प्रत्यक्षात चार दिवस झाले अजूनही बांगलादेशची बॉर्डर मुंबईचे जेएनपीटी बंदर तसेच नाशिकच्या जानोरी येथील ड्रायपोर्ट येथे कांद्याने भरलेले कंटेनर्स निर्यातीच्या नवीन निकषानुसार कांदा निर्यात करण्यासाठी कस्टम विभागाकडून परवानगी मिळाली नाही म्हणून निर्यात होण्याच्या प्रतीक्षेत आहेत सलग एक वर्षापेक्षा अधिक काळ कांद्याचे निर्यातीवरचे असलेले ४० टक्के शुल्क त्यातील सहा महिने थेट कांद्याची निर्यातबंदी आधीचे कांद्यावरील आठशे डॉलरचे किमान निर्यात मूल्य तर गेल्या पाच महिन्यांपासून असलेले कांद्याचे साडेपाचशे डॉलरचे किमान निर्यात मूल्य या अशा विविध निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना आपला कांदा थोडी कवडीमोल दराने विकावा लागला होता

आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत परंतु प्रत्यक्षात जोपर्यंत जास्तीत जास्त कांदा निर्यात होत नाही तोपर्यंत या नवीन निर्णयाचा कांदा दर वाढीला फायदा होणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कस्टम विभागाकडून नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी वेळखाऊपणा होत असल्याने शेकडो कंटेनर्समध्ये निर्यातदारांचा भरलेला कांदा सडण्याची स्थिती निर्माण झाली आहे याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बाजारभावावर होण्याची शक्यता असल्याने सरकारने तत्काळ नवीन नियमानुसार कांदा निर्यात होण्यासाठी योग्य ते पावले उचलण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे

कांदा निर्यात धोरण हे कायमच नुकसानीचे
सरकारकडून कांदा निर्यातबंदी केल्यानंतर अगदी तत्काळ प्रभावाने परदेशात जाणारा कांदा त्याच वेळी रोखला जातो मात्र याच सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध हटवल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी नेहमीच दिरंगाई होते. आमचे सरकार हे गतिमान कारभार करणारे सरकार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येते परंतु प्रत्यक्षात सरकारचे कांदा निर्यात धोरण हे कायमच शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या नुकसानीचे ठरत आहे.
भारत दिघोळे , अध्यक्ष ,महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना लक्ष्मीचा वरदहस्त लाभेल, जाणून घ्या, मंगळवार, १७ सप्टेंबरचे राशिभविष्य

Next Post

अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना ‘धर्मभूषण’ पुरस्कार प्रदान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20240916 WA0243 1

अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना 'धर्मभूषण' पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

Untitled 2

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची धमकी…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 3, 2025
unnamed 6

नाशिक जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात…विरल आणि अन्यना यांची उत्तम कामगिरी

ऑगस्ट 3, 2025
crime 12

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

ऑगस्ट 3, 2025
image0037LA4 e1754183811326

जळगावात जमले भारताचे भावी बुद्धिबळपटू: ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

ऑगस्ट 3, 2025
IMG 20250802 WA0467 e1754183550323

मठाच्या माधुरी हत्तीणी स्थलांतराबाबत वनताराने केली आपली भूमिका स्पष्ट….

ऑगस्ट 3, 2025
3 1024x683 1

दीडशे दिवस उपक्रमात होणार अनुकंपाच्या सर्व पदांची भरती…अतिरिक्त जिल्हाधिकारी होणार आरडीसी

ऑगस्ट 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011