इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काल पासुन मिडिया मध्ये वाल्मीक कराड याच्या कडुन १५ लाख रुपये खंडणी घेतल्याच्या बातम्या सुरु आहेत. तो हाच शिवराज बांगर आहे,
हा ऊसतोड कामगरांच्या हक्कासाठी लढतोय, भगवानगडाच्या पायथ्याला ऊसतोड कामगरांचा मेळाव घेतो अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियात पोस्ट टाकून दिली.
त्यांनी या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. वंजारी समाजातील हा पोरगा पुढे जड जाणार हा वेगळे राजकीय आस्तीत्व निर्माण करतोय, म्हणुन त्याला आणि याच्या कुटुंबाला धंनजय मुंडे आणि वाल्मीक कराड ने गेले ५ वर्षे प्रचंड छळलेय, त्याचे वयोव्रध्द आई वडील, पत्नी यांच्यावर आनेक खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यापैकी हा खंडणीचा १ गुन्हा आहे. असे शेकडो वंजारी समाजातील तरुण यांनी कायद्याचा दुरुपयोग करूण संपवलेत.
यांच्यावर वेळ आली की समाजाचे पांघरून घ्यायचे आणि वेळ निघुन गेली की, समाजातील तरूणांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचे हे यांचे समाज प्रेम.
आशा समाजातील उध्वस्त लोकांची यादी खुप मोठी आहे.