मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन…जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 9, 2024 | 12:05 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
image001ZS0E e1728412493894

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) असे जाहीर केले आहे की, भारत सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या खुपऱ्या रोगाचे देशातून समूळ उच्चाटन केले असून हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणारा भारत दक्षिण-पूर्व आशियाई क्षेत्रातील तिसरा देश ठरला आहे. नवी दिल्ली येथे डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशियाई प्रदेशासाठीच्या क्षेत्रीय समितीच्या आज झालेल्या बैठकीत, डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाई प्रदेशाच्या क्षेत्रीय संचालक सायमा वाझेद यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक आराधना पटनाईक यांच्याकडे या संदर्भातील अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द केले.

खुपऱ्या हा डोळ्यांवर परिणाम करणारा जिवाणूजन्य संसर्ग आहे. डब्ल्यूएचओ ने या रोगाला दुर्लक्षित उष्णकटिबंधीय संसर्ग असे संबोधले आहे. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार जगातील दीडशे दशलक्ष लोकांना खुपऱ्या रोगाचा संसर्ग झाला असून त्यापैकी 6 दशलक्ष लोकांना अंधत्व आले आहे किंवा त्यांची दृष्टी अधू करणारी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. हलक्या दर्जाच्या पर्यावरणीय परिस्थितीत राहणाऱ्या वंचित समुदायाच्या लोकांमध्ये खुपऱ्या आजार प्रामुख्याने आढळतो.

देशात 1950-60 या कालावधीत अंधत्व येण्याच्या कारणांमध्ये खुपऱ्या हे प्रमुख कारण होते. त्यानंतर वर्ष 1963 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय खुपऱ्या नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केली आणि नंतरच्या काळात भारताच्या राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमात (एनपीसीबी) या खुपऱ्या नियंत्रणविषयक प्रयत्नांचे एकत्रीकरण करण्यात आले.

वर्ष 1971 मध्ये देशात खुपऱ्या रोगामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण 5% होते. नंतरच्या काळात राष्ट्रीय अंधत्व तसेच अधू दृष्टी नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत (एनपीसीबीव्हीआय)राबवण्यात आलेल्या विविध हस्तक्षेपांमुळे हे प्रमाण 1% पेक्षाही कमी करण्यात यश आले आहे. अंतिमतः, खुपऱ्या रोगाविरुद्धच्या अनेक वर्षांच्या लढ्यानंतर, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लाडकी बहीण योजना किती वर्ष चालू राहील? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली थेट माहिती

Next Post

गेल्या तीन महिन्यांत तूर आणि उडीद डाळीच्या दरात झाली इतकी घट….केंद्र सरकारची माहिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
Untitled 28

गेल्या तीन महिन्यांत तूर आणि उडीद डाळीच्या दरात झाली इतकी घट....केंद्र सरकारची माहिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011