सोमवार, ऑक्टोबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकचे आयटीपार्क क्षेत्र घटता घटता घटे…साडेतीन वर्षांत आकार ३६५ एकरवरून २५ एकरवर

जून 16, 2025 | 1:14 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 42

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक : नाशिक महापालिकेने २०२२ च्या सुरुवातीला आडगाव शिवारात ३६५ एकरवर आयटीपार्क प्रस्तावित करून नाशिकला आयटी परिषद घेतली होती. त्यानंतर निवडणुका वेळेत न झाल्याने महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली व हा विषय मागे पडला. दरम्यान जून २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्योगमंत्री झालेल्या उदय सामंत यांनी अक्राळे एमआयडीसीत आयटी पार्कसाठी १०० एकर जागा आरक्षित करण्याची घोषणा केली. पुढे २०२३ मध्ये तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांच्या हट्टामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजूर बहुलेच्या एमआयडीसीत ५० एकर जागेवर आयटीपार्क उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २०२४ मध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर भाजप आमदार सीमा हिरे यांनी आयटी पार्कचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडला. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजूर बहुलेत आयटी पार्कसाठी २५ एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिका हद्दीत १५ एकर जागा आयटीपार्कला दिली जाणार आहे. म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांमध्ये नाशिकला आयटी पार्क प्रत्यक्षात आले नाहीच, पण घोषणांमध्ये या आयटीपार्कचे क्षेत्र घटता घटता घटे, असे कमी कमी होत चालले आहे.

नाशिक येथे आयटी पार्क नसल्याने स्थानिक तरुणांना पुणे,बंगलोर आदी मोठ्या शहरांमध्ये जावं लागते. यामुळे नाशिक शहर परिसरात आयटी पार्क उभारण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेच्या पुढाकारातून २००३ मध्ये अडीच कोटी रुपये खर्च करून आयटी पार्कची दोन मजली इमारत उभारण्यात आली. प्रत्यक्षात तेथे एकही आयटी कंपनी आली नाही. त्यामुळे अखेर जागा वापराचा उद्देश बदलून ते गाळे इतर कंपन्यांना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर २०२२ मध्ये नाशिक महापालिकेने आडगाव शिवारात ३६५ एकर जागेवर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडून त्यासाठी नाशिकमध्ये आयटी परिषद घेतली. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार व महापालिकेत भाजपची सत्ता असे गणित होते. यामुळे तत्कालीन केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना त्या परिषदेला बोलावण्यात आले. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने नाशिक महापालिकेवर प्रशासकीय राजवट आली व आयटी पार्कचा विषय मागे पडला.

राज्यात जून २०२२ मध्ये सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार आले व उदय सामंत उद्योगमंत्री झाले. या उद्योग मंत्र्यांनी त्यांच्या प्रत्येकवेळच्या नाशिक दौऱ्यात आयटी पार्कच्या ठिकाणात व आयटी पार्कसाठी दिल्या जाणाऱ्या क्षेत्रात बदल करण्याच्या घोषणेशिवाय काहीही केले नाही. डिसेंबर २०२२ मध्ये दौऱ्यावर आलेले मंत्री सामंत यांनी नाशिकला १०० एकरवर आयटी पार्क उभारला जाणार असून तेथे डेटा सेंटर कंपनी येणार असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी नाशिक महापालिका हद्दीतील जागेऐवजी आयटी पार्क दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे उभारण्याची घोषणा केली.

पुढे तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठ पुराव्यामुळे उद्योगमंत्र्यांनी पुढच्यावेळी म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये आयटी पार्कचे ठिकाण अक्राळेवरून नाशिक तालुक्यातील राजूर बहुले येथे हलवले व त्याचे क्षेत्र १०० एकरवरून ५० एकर केले व उद्योग विभागाने तशी अधिसूची प्रसिद्धही केली. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. नाशिकच्या भाजप आमदारांनी दोन कार्यकाळात नाशिकसाठी काय दिले, हा मुद्दा विरोधकांनी समोर आणला. याला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकच्या सभेत नाशिकला आयटी पार्क उभारण्याची घोषणा झाली. निवडणुकीत नाशिकसह राज्यातील मतदार महायुतीच्य मागे उभे राहिले यामुळे महायुतीची सत्ता आणखी भक्कमपणे कायम राहिली. यामुळे नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी हिवाळी अधिवेशनात नाशिकला आयटी पार्क उभारण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी पार्क उभारण्याची घोषणा विधानसभेत केली.
त्यानंतर जवळपास सात महिन्यांनी नाशिकमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली व त्यात राजूरबहुले येथे आयटीपार्कला २५ एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच नाशिक महापालिका हद्दीत आयटी पार्कसाठी १५ एकर जागेलाही मान्यता देण्यात आली. मुळात डिसेंबर २०२३ च्या उद्योग मंत्रालयाच्या अधिसूचित राजूर बहुले येथे आयटी पार्कसाठी ५० एकर जागा मंजूर केली होती, तिचे काय झाले, असा प्रश्न कोणालाही पडला नाही. या बैठकीस नाशिकच्या तीन आमदारांपैकी केवळ सीमा हिरे उपस्थित होत्या. आता या मंजुरी दिलेल्या आयटीपार्कच्या जागेवर खरोखर आयटी उद्योग येणार की अंबड आयटीपार्क प्रमाणे आणखी दहा पंधरा वर्षांनी जागेच्या वापराचा उद्देश बदलण्याची अधिसूचना निघणार याची नाशिककराना प्रतीक्षा आहे.
[email protected]

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा आहे नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखडा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

Next Post

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केले हे प्रश्न….

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
GtiVVojaAAALkKK

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केले हे प्रश्न….

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011