इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रॉयल चॅयल चॅलेंजर्स बंगळुरुने क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली आहे. या सामन्यात आरसीबीने पंजाबसमोर १०२ धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान १ विकेटच्या मोबदल्यात १० ओव्हरमध्ये करत फायनलमध्ये धडक दिली. आरसीबीने १० ओव्हरमध्ये १०६ रन्स केले. पंजाबला या पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
आरसीबीच्या ४ फलंदाजांनी विजयात योगदान दिलं. फिल सॉल्ट याने सर्वाधिक योगदान दिलं. तर विराट कोहली,मयंक अग्रवाल आणि कर्णधार रजत पाटीदार या तिघांनीही धावा जोडल्या.आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबला पद्धतशीर १४.१ ओव्हरमध्ये १०१ धावांवर गुंडाळलं. त्यामुळे १०२ धावांचं माफक आव्हान मिळालं. गोलंदाजांनंतर आरसीबीच्या फलंदाजांनी धमाका करत ६० बॉल राखून आव्हान पूर्ण केलं.
विराट कोहली आणि फिलीप सॉल्ट या सलामी जोडीने ३० धावांची भागीदारी केली. विराट फटकेबाजी करुन आरसीबीला एकहाती विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात होतं. मात्र त्याला तसं करता आलं नाही. विराट १२ रन्स करुन आऊट झाला. आरसीबीला ३० रन्सवर पहिला झटका लागला. विराट आऊट झाल्यानंतर मयंक अग्रवाल मैदानात आला. फिलीप आणि मंयक या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत आरसीबीचा विजय सुनिश्चित केल