सोमवार, ऑक्टोबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असे आहे इंदूरचे ‘स्वच्छता मॉडेल’; …म्हणून सलग सहाव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान

ऑक्टोबर 6, 2022 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
FeJD 5tUcAACJgu

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल नुकताच लागला आहे. यात मध्य प्रदेशमधील इंदूर हे सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. या शहरात कचर्‍याचे व्यवस्थापन नेमके कसे केले जाते ते आपण पाहूया.

केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर शहराने प्रथम क्रमांक कायम राखला, तर सुरत आणि नवी मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. यासोबतच महाराष्ट्र देशातील तिसरे स्वच्छ राज्य ठरले. ‘स्वच्छ भारत मिशन (नागरी)’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. ‘स्वच्छतेबाबतची उत्तम कामगिरी’ या श्रेणीत मध्य प्रदेशने पहिला नंबर कायम राखला. तर छत्तीसगड आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची स्वच्छ राज्ये ठरली.

तुम्हाला ठाऊक आहे का? २०१६ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणात इंदूर हे २५ व्या क्रमांकावर होते. त्यानंतर सलग सहावेळा या शहराने भारतातील सर्वात स्वच्छ शहर हा मान पटकावला आहे. इंदूरमधील या बदलांची कहाणी उल्लेखनीय आहे. इंदूर हे भारतातील पहिले कचरामुक्त शहरही आहे. इंदूर शहर कचर्‍याचे व्यवस्थापन नेमके कसे करते हे माहीत आहे का?

निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण किती?
जवळपास ३५ लाख लोकसंख्या असलेल्या इंदूर शहरात दररोज सरासरी १ हजार ९०० टन कचरा घरोघरी जमा होतो. यामध्ये १२०० टन सुका कचरा आणि ७०० टन ओला कचरा निर्माण होतो. २०१५ मध्ये इंदूर शहरात सुरुवातीस केवळ दोन प्रभागतच कचराकुंडय़ा पूर्णपणे हटवून घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यात आले. ही यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती. नागरिकांच्या प्रतिसादानंतर पूर्णवेळ आणि सर्वच वॉर्डात ही संकल्पना राबवण्यात येत आहे. आणि आता इंदूरने सलग पटकावलेल्या नंबरमुळे ती यशस्वी देखील झाल्याचे दिसत आहे. आजमितीस जवळपास संपूर्ण इंदूर शहर कचराकोंडीमुक्त झाले असून शहराच्या वातावरणातील प्रदूषणही प्रमाणात घटले आहे. साधारणपणे संपूर्ण देशात कचऱ्याचे दोन भागात वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे ओला कचरा आणि दुसरा सुका. परंतु इंदूरमध्ये कचऱ्याचे सहा श्रेणीत वर्गीकरण केले जाते आणि हेच इंदूरच्या यशाचे गमक आहे.

तीन शिफ्टमध्ये स्वच्छता
इंदूर महापालिकेचे स्वच्छता विभागाचे अधीक्षक महेश शर्मा यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, महापालिकेकडे ८५० वाहने आहेत जी घरोघरी आणि व्यावसायिक आस्थापनांमधून दररोज कचरा गोळा करतात. हा कचरा गोळा करतानाच तो सहा प्रकारात विभागला जातो. यात ओला, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक, नॉन-प्लास्टिक, बायोमेडिकल आणि धोकादायक स्वरूपाचा कचरा असतो. वेगवेगळ्या स्वरूपाच्या कचऱ्यासाठी वाहनामध्ये स्वतंत्र कप्पे असतात. सॅनिटरी नॅपकिन्स हे विशिष्ट कप्प्यातच टाकले जातात. हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तब्बल ८ हजार ५०० स्वच्छता मित्र कार्यरत आहेत. जे तीन शिफ्टमध्ये काम करतात. अशी देखील माहिती महेश शर्मा यांनी दिली. इंदूर शहराच्या कचरा विल्हेवाट करण्याच्या प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे बायो सीएनजी प्लांट. शहरातून गोळा करण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यावर हा प्लांट चालतो. हा आशियातील सर्वात मोठा प्लांट असल्याचं अधिकारी सांगतात. विशेष म्हणजे यातून मोठा महसूलही निर्माण होतो.

कचऱ्याची विल्हेवाट करून कोट्यवधी रुपयांचा लाभ
व्यावसायिक सीएनजीच्या तुलनेत पाच रुपये स्वस्त पडणाऱ्या या बायोसीएनजीवर जवळपास १५० सिटी बस चालवतात. गेल्या वर्षात इंदूर महापालिका प्रशासनाने कचऱ्याच्या विल्हेवाटीतून १४.४५ कोटी रुपये कमावले. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कार्बन क्रेडिटच्या विक्रीतून साडेआठ कोटी आणि खासगी कंपनींकडून वार्षिक प्रीमियम म्हणून २.५२ कोटी रुपये मिळालेले आहेत. याशिवाय इंदूरमधील सांडपाण्यावरही तीन विशेष प्लांटमध्ये प्रक्रिया केली जात आहे आणि या पाण्याचा २०० सार्वजनिक उद्याने, शेतात व बांधकामांसाठी पुन्हा वापर केला जात आहे.

Indore Cleanest City in India Cleanliness Model

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दसरा मेळाव्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे असे आहे जंगी नियोजन; शिंदे गटाला शह देणार

Next Post

राज्य सरकारने सुरू केलेली ‘नदी परिक्रमा’ आहे तरी काय? ती कशी असेल? त्याचे फायदे काय? घ्या जाणून सविस्तर…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
02 1140x570 1

राज्य सरकारने सुरू केलेली 'नदी परिक्रमा' आहे तरी काय? ती कशी असेल? त्याचे फायदे काय? घ्या जाणून सविस्तर...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011