बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांशी उपराष्ट्रपतींनी केला हा संवाद…

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 7, 2023 | 10:55 am
in राज्य
0
F QIvoEbUAA9cEyXMX9

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई -उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नवीन उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या परिवर्तन क्षमतेवर भर दिला आणि जग तांत्रिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता मूलभूतपणे आपल्या जगण्याची, कार्य करण्याची आणि संवाद साधण्याची पद्धत बदलेल आणि ही एक संधी आणि आव्हानही आहे यावर त्यांनी भर दिला. धनखड यांनी एआय चा उदय हा औद्योगिक क्रांतीनंतरच्या उत्पादनातील सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक असल्याचे नमूद केले.

आयआयटी, मुंबईतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, उपराष्ट्रपतींनी त्यांना संशोधन आणि नवोन्मेषात गर्क राहण्याचे आणि सामाजिक कारणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले ज्यामुळे देशातील लोकांचे जीवन आणि मानवता सुलभ होऊ शकते.तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण आणि सार्वत्रिकीकरण करता यावे यासाठी आयआयटी सारख्या प्रमुख संस्थांनी उद्योग आणि सरकार यांच्याशी समन्वय साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व जोखून, उपराष्ट्रपतींनी हजारो महिलांना आत्मसन्मान मिळवून देणाऱ्या, त्यांना कष्टमुक्त करणाऱ्या आणि त्यांचे जीवन अधिक सुखकर करणाऱ्या स्वच्छ भारत मिशन, उज्ज्वला योजना आणि हर घर जल योजनेसारख्या सरकारी उपक्रमांची प्रशंसा केली. अलीकडेच संसदेत मंजूर केलेले महिला आरक्षण विधेयक हे कालखंडातील विकास आहे, ज्यामुळे सामाजिक बदल दूरवर पोहोचतील असे त्यांनी नमूद केले.

युद्धाचे बदलते स्वरूप आणि धोरणात्मक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रवेश यावर प्रकाश टाकत उपराष्ट्रपती म्हणाले की, “सर्वोत्तम संरक्षण म्हणजे टोकाचा बचाव करण्यास तुम्ही सक्षम असणे.” जगातील कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि राष्ट्राचे स्थान निश्चित करण्याची क्षमता केवळ ज्ञान या सर्वोच्च शक्तीमध्ये असून उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना क्वांटम कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, 6जी , क्रिप्टोग्राफी, सायबर सुरक्षा आणि हरित हायड्रोजन यांसारख्या क्षेत्रात अत्याधुनिक संशोधनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

लोकसंख्येच्या स्वरुपानुसार मिळणारा लाभांश आणि तरुणांची भूमिका अधोरेखित करून तरुणाई प्रशासनातील सर्वात मोठे भागधारक असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. भारताचे भविष्य घडवण्याच्या युवकांच्या क्षमतेवर त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि त्यांना विकासाचे प्रमुख इंजिन असे संबोधले.तरुण वर्गाने भारताचे अभिमानी नागरिक व्हावे, आपल्या देशाच्या ऐतिहासिक कामगिरीचा अभिमान बाळगावा आणि आपली जुनी नीतीमूल्ये आणि लोकशाही मूल्ये जपण्याचे आवाहन धनखड यांनी केले.

मूल्यवर्धनाशिवाय आपल्या देशाचा कच्चा माल इतर देशांत जाण्याबद्दल चिंता व्यक्त करत आपण सगळ्यांनी आर्थिक राष्ट्रवादाची दृढ भावना विकसित करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले. मूल्यवर्धनाशिवाय कच्चा माल आपल्या देशातून इतर देशात पाठवल्याने आपले तरुण रोजगार आणि उद्यमशीलतेच्या संधीपासून वंचित राहतात, असे ते म्हणाले. भ्रष्टाचार हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे सांगत भ्रष्टाचार सामान्य माणसाच्या विकासात अडथळा आणतो आणि लोकांना हताश करतो असे उपराष्ट्रपती म्हणाले.

तंत्रज्ञानाचा विकास एक उत्प्रेरक म्हणून काम करू शकेल आणि जागतिक नेतृत्व म्हणून भारताचा उदय सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आयआयटी, उद्योग आणि सरकार यांसारख्या प्रमुख संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्याची गरज विद्यार्थ्यांना संबोधित करताना धनखड यांनी अधोरेखित केली.

आपल्या भाषणात उपराष्ट्रपतींनी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांची समृद्ध परंपरा आणि विविध विषयांमध्ये त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान देखील अधोरेखित केले. माजी विद्यार्थ्यांचा अनुभव, कौशल्य आणि संधींचा उपयोग धोरण निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये करता येईल, या अनुषंगाने सगळ्या आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनांचा समावेश असलेली एक संस्था तयार करण्याची कल्पना त्यांनी मांडली या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस,, प्रा. एस. सुदर्शन, उपसंचालक (एआयए), आयआयटी मुंबई , प्रा. के.व्ही. के. राव, उपसंचालक (एफईए), आयआयटी मुंबई, विद्यार्थी, प्राध्यापक सदस्य आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत आणि भूतानमध्ये झाले हे करार…चीनला मोठा धक्का

Next Post

रेल्वे ब्रिजवरुन कार रेल्वे ट्रकवर कोसळली….समोरुन मालगाडी आली.. तीन जण जागीच ठार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Sadan Ganesh 1 11 913x420 1
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष; आज ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1
महत्त्वाच्या बातम्या

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी….उपमुख्यमंत्री अजित पवार

ऑगस्ट 27, 2025
ganeshotsav 1 e1738348574343
मुख्य बातमी

यंदा बाप्पा वाजत गाजत येणार… अशी करा श्रीगणेशाची स्थापना… असा आहे मुहूर्त…

ऑगस्ट 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250826 WA0402
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद विकास निर्देशांकात राज्यात प्रथम…मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव

ऑगस्ट 26, 2025
Untitled 44
संमिश्र वार्ता

३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादनची दुबईला केली निर्यात

ऑगस्ट 26, 2025
Next Post
Screenshot 20231107 111315 Dailyhunt

रेल्वे ब्रिजवरुन कार रेल्वे ट्रकवर कोसळली….समोरुन मालगाडी आली.. तीन जण जागीच ठार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011