बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ऐक्याला धोका देणारा वर्ग आजही अस्तित्वात….शरद पवार यांची टीका

by Gautam Sancheti
जुलै 29, 2024 | 1:12 pm
in संमिश्र वार्ता
0
Sharad Pawar

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काहींनी त्यांना विरोध केला होता. त्यांचा राज्याभिषेक करायचा होता, तेव्हा समाजातील एका विशिष्‍ट घटकातील लोकांनी विरोध केल्याने उत्तरेकडून कोणालातरी आणावे लागले. त्या कालखंडात ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग होता. दुर्दैवाने हा वर्ग आजही आहे, अशी टीका राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत बोलत असताना त्यांनी मणिपूर आणि इतर राज्यांतील दंगलीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. पवार म्हणाले, की मणिपूरमध्ये अनेकांची घरे जळत आहे. शेती उद्ध्वस्त होत आहे. स्रियांवर अत्याचार सुरू आहेत, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या राज्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. पंतप्रधानांना त्या ठिकाणी भेट द्यावी वाटली नाही. एखाद्या राज्यावर एवढे मोठं संकट आल्यानंतर राज्यकर्त्यांनी त्याला सामोरे जावे, तेथील लोकांना विश्वास द्यावा, त्यांच्यात एकवाक्यता निर्माण करावी, कायदा-सुव्यवस्था जतन करावी, ही त्यांची जबाबदारी असते;परंतु मोदी यांनी यापैकी काहीही केले नाही.

महाराष्ट्रात आणि देशातील परिस्थितीत बदल करण्यासाठी सर्व जात-धर्म, भाषा यामध्ये जे अंतर आहे, ते दूर करण्याची गरज आहे. एकसंध समजा आणि एकसंध राष्ट्र ही संकल्पना घेऊन एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. ते करण्यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्‍त केला. संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरचे विविध जाती, भाषा बोलणारे लोक दिल्लीला आले होते. पिढ्यानपिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झाला, दोन जमातींमध्ये संघर्ष झाला. घरेदारे पेटवण्यात आली. शेती उद्ध्वस्त करण्यात आली. स्त्रियांवर अत्याचार झाले. पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारा, सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही, असे सांगून महाराष्ट्रातही मणिपूरसारखे काहीतरी घडण्याची चिंता वाटते, असे पवार म्हणाले.

ते म्हणाले, की मणिपूरमध्ये जे घडले, तेच आजूबाजूच्या राज्यात घडले. कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही काही घडले की काय, अशी चिंता आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊ गेले. त्यांनी समाजाचा विचार केला. देशात अनेक राजे होऊन गेल्याचे ऐकायला मिळेल; पण साडेतीनशे वर्ष झाल्यानंतरही आजही आदर आणि अभिमान असणारा राजा कोण, असा प्रश्न कोणालाही विचारल्यावर एकच नाव येते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्यांनी लोकांसाठी राज्य केले. दिल्ली मुगलांची होती, देवगिरी यादवांची होती, राजपूतांचे राज्य होते; पण शिवाजी महाराजांचे राज्य हे भोसल्यांचे नव्हे, तर हिंदवी स्वराज्य आणि रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले. हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्याला दिले, असे पवार यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अभ्यासवृत्ती भावेश ब्राह्मणकर यांना जाहीर

Next Post

व्हि.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत संमिश्र निकाल…हे उमेदवार झाले विजयी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

court 1
संमिश्र वार्ता

गोदावरी नदीच्या पुनर्जीवन याचिकेत अवमान याचिका…दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

ऑगस्ट 27, 2025
Untitled 45
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उध्दव ठाकरे…सहकुटुंब घेतले गणपतीचे दर्शन

ऑगस्ट 27, 2025
भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Sadan Ganesh 1 11 913x420 1
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष; आज ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1
महत्त्वाच्या बातम्या

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी….उपमुख्यमंत्री अजित पवार

ऑगस्ट 27, 2025
ganeshotsav 1 e1738348574343
मुख्य बातमी

यंदा बाप्पा वाजत गाजत येणार… अशी करा श्रीगणेशाची स्थापना… असा आहे मुहूर्त…

ऑगस्ट 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
Next Post
Untitled 104

व्हि.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत संमिश्र निकाल…हे उमेदवार झाले विजयी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011