शुक्रवार, सप्टेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केंद्र सरकारचा कांदाविक्री बाबत मोठा निर्णय.. २५ रुपये किलोने कांदा विक्री या ठिकाणी धडाक्यात केली सुरु

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 4, 2023 | 5:29 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 14

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खरीपाचा कांदा बाजारात येण्यास उशीर होत असल्या कारणाने बाजारात गेल्या काही काळात कांद्याच्या दरात होत असलेल्या वाढीपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने राखीव साठ्यातील कांद्याची २५ रुपये किलो या अनुदानित दराने किरकोळ विक्री करण्यास धडाक्याने सुरुवात केली आहे. देशांतर्गत ग्राहकांसाठी कांद्याची उपलब्धता आणि किफायतशीरपणा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सरकारने २९ ऑक्टोबर २०२३ पासून कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० अमेरिकी डॉलर्स प्रती मेट्रिक टन ठेवणे, राखीव साठ्यामध्ये २ लाख टन कांद्याची भर, ५.०६ लाख टन कांद्याची याआधीच केलेली खरेदी आणि किरकोळ विक्री, ई-नाम लिलाव तसेच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून घाऊक बाजारात सुरु केलेली मोठ्या प्रमाणातील विक्री असे उपक्रम याआधीच राबवण्यास सुरुवात केली आहे.

केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ तर्फे संचालित किरकोळ विक्री दुकाने आणि मोबाईल व्हॅन, नाफेड, केंद्रीय भांडार आणि इतर राज्य नियंत्रित सहकारी संस्थांच्या माध्यमातून २५ रुपये किलो दराने कांद्याची जोरदार विक्री सुरु केली आहे. नाफेडने २ नोव्हेंबर पर्यंत देशाच्या २१ राज्यांतील ५५ शहरांमध्ये दुकाने आणि मोबाईल व्हॅन यांचा समावेश असलेली ३२९ किरकोळ विक्री केंद्रे उभारली आहे. त्याचप्रमाणे, एनसीसीएफने २० राज्यांतील ५४ शहरांमध्ये ४५७ किरकोळ विक्री केंद्रे स्थापन केली आहेत. त्याच धर्तीवर, केंद्रीय भांडारतर्फे देखील ३ नोव्हेंबर २०२३ पासून त्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांमध्ये कांद्याची किरकोळ विक्री सुरु केली आहे तर सफल मदर डेरी देखील या आठवड्याच्या शेवटी कांदा विक्रीला सुरुवात करणार आहे.

रबी आणि खरीप पिकांच्या दरम्यान कांद्याच्या दरातील हंगामी चढउतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नंतर योग्य वेळी आणि लक्ष्यित पद्धतीने कांदा विक्रीसाठी काढता यावा म्हणून केंद्रसरकार रबी कांद्याची खरेदी करून त्याचा राखीव साठा ठेवत असते. या वर्षी कांद्याचा राखीव साठा ७ लाख मेट्रिक टन पर्यंत वाढवण्यात आला. वर्ष 2022-23 मध्ये हा साठा केवळ अडीच लाख मेट्रिक टन इतका होता. आतापर्यंत 5.06 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली असून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची प्रक्रिया सुरु आहे.

सरकारच्या सक्रिय उपाययोजनांचा परिणाम आता दिसू लागला असून २८ ऑक्टोबर २०२३ रोजी लासलगाव बाजारात ४,८०० रुपये क्विंटल पर्यंत पोहोचलेला कांद्याचा भाव आता २४ टक्क्याच्या घसरणीसह ३,६५० रुपये क्विंटल झाला आहे. येत्या आठवड्यामध्ये कांद्याचे किरकोळ बाजारातले दरही खाली येतील अशी अपेक्षा आहे.

बहुतांश भारतीय घरांमध्ये डाळी हा पोषणाचा महत्त्वाचा स्त्रोत मानला जातो. सर्वसामान्यांसाठी किफायतशीरडाळींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने एक किलोच्या पॅकसाठी ६० रुपये प्रतिकिलो तर ३० किलोच्या पॅकसाठी ५५ रुपये किलो असे अनुदानित दर असलेल्या भारत डाळ या उपक्रमाची सुरुवात केली. नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार, सफल आणि तेलंगणा तसेच महाराष्ट्र या राज्यांतील राज्य सरकार नियंत्रित सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्य नागरिक, लष्कर, सीएपीएफ आणि कल्याणकारी योजनांसाठी भारत डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये भारत डाळीचा पुरवठा वाढवण्यात येणार असून त्यामुळे संपूर्ण देशातील ग्राहकांसाठी ४ लाख टनांहून अधिक भारत डाळ उपलब्ध होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आचार्य श्री महाश्रमणजी मंत्री मुनगंटीवार यांनी घेतले दर्शन…नशामुक्त समाज निर्मितीच्या अभियानाबाबत मांडली ही भूमिका

Next Post

भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी या राज्याच्या मुख्यमंत्रीवर केला गंभीर आरोप….नेमंक काय आहे प्रकरण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

भाजपातून सहा नगरसेवकांचे निलंबन…निलेश राणेंचा संताप

सप्टेंबर 4, 2025
Untitled 1
महत्त्वाच्या बातम्या

५८ लाख नोंदीची सरकारकडे माहितीच नाही? मराठा आंदोलनानंतर या वकिलाने केला मोठा दावा

सप्टेंबर 4, 2025
crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
Next Post
pravin darekar e1699102329236

भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी या राज्याच्या मुख्यमंत्रीवर केला गंभीर आरोप....नेमंक काय आहे प्रकरण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011