नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी गडावर फिरायला गेलेले १० पर्यटक मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे गडावर अडकून पडले होते. या पर्यटकांना सहा तास रेस्क्यू ऑपरेशन करुन वन विभागाने या पर्यटकांना वाचवले. मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे या पर्यटकांना खाली उतरता येत नव्हते. त्यानंतर स्थानिकांनी वनविभागाच्या पथकाला पाचरण केले. त्यांनंतर वनविभागाच्या पथकाने या पर्यटकांना खाली उतरवले. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.