इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः शरद पवार यांची मंत्री छगन भुजबळांनी घेतलेल्या भेटीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देतांना त्यांनी भुजबळांवर टीका केली असून तेच राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
जरांगे म्हणाले, शरद पवार काय बोलले, हे मला माहीत नाही. मात्र सत्ताधाऱ्यांची ही चाल आहे. आजवर शरद पवार यांच्यावर टीका करणारा, शह देणारा भुजबळ अचानक कसा जातो? सरकारचा डाव आहे, असे वाटते. ज्या शरद पवार यांनी आरक्षण दिले. त्यांचाच कार्यक्रम भुजबळ यांनी केला.
भुजबळ बेईमान आहेत. कुठल्याही जातीत त्यांच्यासारखे लोक जन्मू नये. शरद पवार, अजित पवार आणि शिवसेना या सर्वांचाच त्यांनी गेम केला. जातीय तणाव करणारा, दंगली लावणारा, गोरगरीब ओबीसी आणि गोरगरीब मराठ्यात भांडण लावणारा हा माणूस आहे, अशी टीका त्यांनी केली.