नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून भारतात व्यापाऱ्यांनी कांदा आयात करू नये यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानातून कांदा आयात केला आहे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेल्या रब्बी कांद्याचा मुबलक प्रमाणात साठा असून केंद्र सरकारही बफर स्टॉकच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा साठवूण ठेवत आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत आत्ता कुठेतरी उत्पादन खर्चाच्या आसपास दर मिळत आहे मागील काही वर्षांमध्ये कांद्याच्या दरात सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते सोबतच केंद्र सरकारच्या कांद्यावरील निर्यात शुल्क, कांद्यावरील किमान निर्यात मूल्य व नंतर थेट कांदा निर्यातबंदी या निर्णयामुळे कांदा दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे अशातच गेल्या काही दिवसांपासून दरात होणारी थोडीफार वाढ शेतकऱ्यांना थोडासा नफा मिळवून देऊ शकते असे असतांना देशात कांदा आयात करून देशांतर्गत कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला पुढील काळातही चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने तत्काळ अफगाणिस्तानासह इतर कोणत्याही देशातून भारतात कांदा आयात करता येऊच नये यासाठी 100% कांदा आयातीवर बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून करण्यात आली आहे
कांदा निर्यातीवरील शुल्कही पुर्ण हटवा
केंद्र सरकारने मागील वर्षी ऑगस्टमध्ये कांद्यावर निर्यात 40 टक्के शुल्कल लागू केले त्यानंतर 800 डॉलर किमान निर्यात मूल्य लागू केले व डिसेंबर महिन्यात थेट संपूर्ण कांदा निर्यातबंदी केली सलग दहा महिने कांदा निर्यातीवर वेगवेगळे निर्बंध असताना लोकसभेच्या मतदानापूर्वी मे महिन्यात कांद्याची निर्यात बंदी सरकारने हटवली परंतु कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क व साडेपाचशे डॉलर किमान निर्यात मूल्य या अटी लागू केल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याची दरवाढ रोखल्या गेली आहे सरकारने हे 40 टक्के निर्याशुल्क व 550 डॉलर किमान निर्यात मूल्य हेही तत्काळ हटवावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे या मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले असून निवेदनावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, जिल्हा समन्वयक भगवान जाधव, सदस्य विश्वनाथ पाटील, खंडू फडे आदींच्या सह्या आहेत केंद्र सरकारने तत्काळ कांदा आयात बंदीचे व निर्यातीवरील शुल्क पूर्णपणे हटवण्याचे वरील दोन्ही निर्णय घ्यावे अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलने केले जातील असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आलेला आहे
जिल्हाधिकाऱ्यांची फोटो काढू देण्यास मनाई अनाकलनीय दिघोळे
शुक्रवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यासाठी मी व काही शेतकरी गेलो असता सदर निवेदन देतांना जिल्हाधिकारी यांनी फोटो काढण्यास मनाई केली जिल्हाधिकाऱ्यांची ही कृती शेतकऱ्यांचा अपमान करणारी असून कोणत्या अधिकारात फोटो काढण्यास मनाई केली याचा खुलासा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी करावा अशी मागणी आम्ही कांदा संघटनेकडून करत आहोत








