मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत नेमका काय आहे ‘ताबुला रसा’ उपक्रम…जिल्हाधिकारी यांनीच दिली माहिती

by Gautam Sancheti
एप्रिल 19, 2024 | 1:00 am
in स्थानिक बातम्या
0
jalgaon collector

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रनिर्मिती कार्यात युवकांची भूमिका अनन्यसाधारण आहे. त्यामुळे लोकशाही राष्ट्रात मतदान ही गोष्ट मूलभूत आहे. त्यामुळे युवा वर्गाने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन सारासार विवेकबुद्धीचा सुयोग्य वापर करून मतदान जरूर करावे. हा विचार करायला प्रेरित करणारी गोष्ट म्हणजे ‘ ताबुला रसा ‘ ही संकल्पना असल्याचे सांगून आपले आप्तेष्ट मित्रमंडळी, नातेवाईक यांना देखील मतदान करण्यास उद्युक्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
आज कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘ताबुला रसा’ उपक्रमाप्रसंगी विदयार्थ्यांना केले.

काय आहे ‘ ताबुला रसा ‘?
अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर ‘ताबुला रसा’ म्हणजे कोरी पाटी… कोणतीही व्यक्ति जन्माला येताना तशी कोरी असते. नंतर सामाजिक वातावरणात, सभोवतालातून अनेक अनुभवातून शिकते, विचार करते. त्यातून त्याची एक धारणा निर्माण होते. ती विचार करण्याची कल्पना म्हणजे ‘ ताबुला रसा ‘ यात नवमतदाराला पांढरा स्वच्छ कागद देऊन तुमच्या डोक्यात त्यावेळी काय असेल ते लिहायला सांगितले जाते. मग तो त्यावेळी विचार करायला प्रेरित होतो. त्यावेळी त्याच्या मनात वैचारिक मंथन होतं त्यातून तो लिहतो. उदा. लोकशाही, स्वातंत्र्य, किंवा चित्र काढेल किंवा डोक्यात असेल ते विचार व्यक्त करू शकेल. त्याक्षणी त्याच्या मनात जो वैचारिक अविष्कार होईल, त्याला ‘स्वातंत्र्य’ म्हटले जाते ….. तेच स्वातंत्र्य तुम्हाला मतदान करतांना लोकशाहीने बहाल केले आहे.मतदान करण्याच्या बॉक्स मध्ये फक्त तुम्ही असता त्यावेळी तुम्ही काही वेळासाठी विचार करता…त्यातून जे मत निर्माण होतं ते अमूल्य आहे. असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘ताबुला रसा ‘ संकल्पना सांगताना स्पष्ट केले.

यावेळी सर्वांना कोरे कागद देऊन वरील संकल्पने प्रमाणे प्रात्यक्षिक करायला सांगितले. त्यात विद्यार्थ्यांना युमच्या मनात येईल ते निबंध,चित्र, व्यंगचित्र,लेख, कविता यांच्या माध्यमातून व्यक्त व्हायला सांगितले. यातून एकच संदेश अभिप्रेत आहे की, लोकशाही मध्ये तुम्हाला विचार करण्याचे अनमोल स्वातंत्र्य आहे. त्या लोकशाहीचा आत्मा मतदान आहे. त्यामुळे तुम्ही तर कराच पण तुमच्या घरच्यांना, पाहुण्या- रावळ्यांना सांगा पण सांगा, मतदान कराच असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मतदानाचा दिवस सुटीचा दिवस न मानता देशाप्रती कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.तसेच देशात युवकांचा टक्का मोठा असल्याने युवकांना मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे मतदान अवश्य करावे असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी श्री.विनोद पाटील (कुलसचिव), श्री. अनिकेत पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी), श्री.योगेश पाटील (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे (संचालक विद्यार्थी विकास), डॉ. अतुल इंगळे व प्रा.श्री. राहुल वराडे (सहाय्यक जिल्हा स्वीप नोडल अधिकारी),प्रा.डॉ.गोगाडे यांचेसह मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशात पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या १०२ जागेवर आज मतदान, इतके कोटी मतदार

Next Post

६२ हजाराच्या लाच प्रकरणात पाटबंधारे विभागाच्या दोन महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Corruption Bribe Lach ACB

६२ हजाराच्या लाच प्रकरणात पाटबंधारे विभागाच्या दोन महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
WhatsApp Image 2025 08 04 at 1.51.07 PM 1920x865 1 e1754317916454

मुख्यमंत्र्यांकडून वॉररुमध्ये ३० प्रकल्पांचा आढावा…दिले हे निर्देश

ऑगस्ट 4, 2025
anjali damaniya

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय बंगला ५ महिने खाली केला नाही…अंजली दमानिया यांनी केली ही टीका

ऑगस्ट 4, 2025
Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011