गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गोमातेचे काय आहे महत्व, घरातील अडचणी कशा दूर होतात..बघां संपूर्ण माहिती

फेब्रुवारी 3, 2024 | 11:14 pm
in राज्य
0
Untitled 10

प्रशांत चौधरी, नाशिक
शास्त्रानुसार गाईच्या शरीरात अनेक देवी देवतांचे वास्तव्य असते म्हणून जी व्यक्ती गाईची नित्य पूजा करतात त्यांच्यावर सर्व देवी-देवतांची कृपा असते. जे लोक गाईची सेवा करतात व गायीला देवी मानतात. देवी त्यांच्या दुः खांचे हरण करते. गोमाता त्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून त्यांची इ’च्छा पूर्ण करते.

आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला माता मानलेलं आहे. ज्यांच्या घरात गाई असतात त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात. आपल्या हिंदू धर्मानुसार गायीमध्ये अनेक देवी-देवतांचा वास आहे असे मानले जाते. म्हणून गायीचे पूजन केले की देवी-देवतांचे पूजन केल्याचे पु’ण्य आपल्याला प्राप्त होते. गाईवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो. गाई च्या पाठीच्या वरच्या भागात सूर्य केतू नाडी असते, जी सूर्याच्या किरणांपासून रक्तात सूर्यक्षर निर्माण करते.

हे सूर्यक्षर गाईच्या दुधात उतरत असते म्हणून गाईचे दूध मनुष्य प्राण्यांसाठी अमृतासमान मानले गेले आहे. या सुवर्ण क्षारा मुळेच गाईच्या दुधाचा रंग किंचित पिवळसर असतो त्यासाठी आपण आता जाणणार आहोत की, गाईच्या पूजनाने मनुष्याला कोण कोणते पुण्य फळाची प्राप्ती होते तसेच घरातील वास्तुदोष नष्ट करण्यासाठी कोणकोणत्या उपाय करावे तसेच गाईच्या कोणत्या अंगाला स्पर्श करणे शास्त्रानुसार शुभ मानले जाते.

घरामध्ये स्वयंपाक झाला की सर्वात अगोदर गाईला पोळी खायला द्यावी त्यानंतरच सर्वांनी खावी यामुळे घरामध्ये शांतता राहते. वाद-विवाद भांडण तंटा दूर होतात. अन्नग्रहण करण्यापूर्वी आपल्याला गोमातेला भाकरी खाऊ घालायचे आहे. जर आपण दररोज न चुकता एखादी भाकरी गोमातेला खाऊ घातली तर देवी-देवतांना चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल, आपल्या घरातील सर्व संकटांपासून आपली मुक्तता होईल व आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल.

गाईपासून मिळणारे पंचगव्य हजारो रोगावर गुणकारी औषध आहे. याचे सेवन केल्याने असाध्य रोगांवर मात करता येते. पूजापाठ हवन पंचगव्या नसेल तर त्यात यश मिळतं नाही. गायीच्या शेणा पासून तयार केलेल्या गोव-या सकाळ-संध्याकाळ मंदिरात किंवा घरात जाळून त्याचा धूरकेल्यास वातावरण शुद्ध होते यामुळे सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते.

गाईचे दान करणे शास्त्रात खूप शुभ मानले जाते जर आपली दशा वाईट असेल तर एखाद्या गरिबाला किंवा ब्राह्मणाला गाय दान करावी. नवग्रहांची शांती व शनी ग्रहाची स्थिती सागितली असेल तर एका काळ्या गाईचे दान जरूर करा यामुळेच सर्व प्रकारच्या संकटांपासून आपली सुटका होते व शनी देवांच्या कृपेमुळे सर्वकाही व्यवस्थित होते.

असे म्हणतात सूर्यास्तानंतर ज्यावेळी गाय रानातून घरी परतत असतात त्यावेळी त्यांच्या पायामध्ये हवेतून धुळीचे कण अडकतात, त्या धुळीमुळे व्यक्तीच्या पापांचा सर्वनाश होतो. ज्या विद्यार्थ्यांना खूप राग येतो, जे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप मागे आहेत तसेच जे बोलू शकत नाहीत अशा व्यक्तींनी गाईला हिरवा चारा जरूर खाऊ घालावा यामुळे बुध ग्रहाची स्थिती सुधारते व सर्व प्रकारच्या अडी अडचणी पासून आपली सुटका होते.
जर आपले एखादी कार्य पूर्ण होत नसेल तर काहींना काही अडथळे येत असेल तर गाईला पोळी खायला द्यावी व तिच्या कानात आपली इच्छा सांगावी तसेच गायीची नित्यनेमाने पूजा केल्यास माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते. उन्हाळ्यात, हिवाळ्यात जर दारामध्ये गाय आली तर तिला जरूर पाणी पाजावे यामुळे आपल्या सर्व रोगांपासून सुटका होते तसेच थंडीच्या दिवसात गाईला गुळ खाऊ घालावा

पितृदोष पासून सुटका मिळवण्यासाठी अमावस्येला गाईला गुळपोळी व हिरवा चारा जरूर खायला द्या यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात व त्याच बरोबर नवग्रहांची कृपा होते. जर घरामध्ये लहान मुले हट्टी असतील त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचा राग येत असेल तर दारात आलेल्या गाईला त्यांच्या हाताचे भोजन गाईला द्यावे, गाईच्या शेपटीने त्यांच्या डोक्यावर थप्पी मारावी यामुळे खूप फरक जाणवतो गाईच्या गळ्यात घंटी जरूर बांधा कारण गाईच्या गळ्यात घंटी बांधल्यामुळे गाईचा आवाज होतो. गाईच्या पोटा मध्ये असणारे देवांचे पुण्य आपल्याला मिळते. गायीच्या शेणात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते. तर गाईच्या मूत्रात देवी गंगेचे वास्तव्य असते तसेच गाईच्या दुधात सुवर्ण तत्व असतात म्हणूनच गाईच्या दुधाचे सेवन जरूर करावे.

गाईच्या पाठीवर उंच वट्यावर सूर्य केतू नाडी असते, रोज सकाळी गाईच्या या उंचवट्यावर हातफिरवल्याने आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या आर्थिक समस्या ही नष्ट होतात आणि दारिद्र्य दूर जाते त्याच बरोबर आपल्या सर्व रोगांचा नाश होतो. जर नवीन जागा घर बांधायचे असेल तर त्या जागी गाय कींवा वासरू काही दिवस तेथे राहू द्यावे यामुळे त्या जागेवर असलेले सर्व रोग दोष दूर होतात. गाय ज्या जागी बसून आराम करते त्या ठिकाणी कोणतेही वाईट शक्‍ती प्रवेश करत नाही. गीर गायीच्या पूजनाने विशेष लाभ होतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एल-निनोमुळे पुढील आठवड्यात होणार हवामानात हे बदल….

Next Post

या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते, ६८ हजार कोटीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन अणि लोकार्पण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
modi 111

या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते, ६८ हजार कोटीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन अणि लोकार्पण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011