बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

साहित्य संमेलनात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या मुलाखतीतून उलगडले भटक्या विमुक्त समाजाचे दर्शन

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 3, 2024 | 3:19 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240203 WA0270 e1706953720486

अमळनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : मरीआई, नंदी बैल व पारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यास समाजानेही साथ देणे गरजचे आहे. आधुनिकतेची कास धरत चंद्रावर जात असताना भटक्या विमुक्त समाजालाही समजून घेत त्यांच्या प्रगतीसाठी काम करणारे साहित्य आणि युवक तयार होणे ही काळाची गरज असल्याचे मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठाच्या पहिल्या सत्रात रवींद्र गोळे (मुंबई), सारंग दर्शने( मुंबई) यांनी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले.

ते म्हणाले की, सी.एम. केतकर, माजगावकर, शरद कुलकर्णी अशा आमच्यात साहित्य परिषदेत मार्क्सवादावर खडाजंगी चर्चा होत असे. त्यावर माणूस या साप्ताहिकात लेखन करत असे. मात्र माजगावकरांनी नुसते असे लेखन करण्यापेक्षा कृती करून लेखन करण्याचा सल्ला दिला आणि तो तंतोतंत अंमलात आणला. त्यासाठी मी काही दिवस खेडेगावात राहण्यास गेलो. रेल्वेने जाण्यासाठी स्टेशनवर आलो असता तेथे खुप मोठी गर्दी दिसली. ३० ते ४० जण परिवारासह तेथे आले होते. त्यावेळी कोणताही कार्यक्रम, राजकीय सभा नसताना एवढी गर्दी पाहून उत्सुकता वाढली. त्यामुळे त्यांच्याशी बोलणे केले. त्यानुसार त्यांच्या गावात पाण्याची टंचाई असल्याने शेती पिकली नाही. पिण्यास पाणी नाही म्हणून गाव सोडून जात असल्याचे त्यांनी सांगितले. आणि मनात धस्स झाले.

निमगाव म्हाळगी येथे राहत असताना गावात नंदी बैलवाला, मरीआई वाले, पारधी भिक्षा मागण्यास येत. शिक्षण, संस्कार या सारख्या विविध बाबींचा गंधही नसलेल्या या समाजाबद्दल जवळून माहिती घेतली आणि ठरवले की या समाजाच्या प्रगतीसाठी आपण काम करायला हवे. ही स्थिती तेव्हाची असली तरी आजही ग्रामिण भागातील स्थिती फारशी वेगळी नाही. ग्रामीण भागात आजही पाण्याची स्थिती गंभीर आहे. तेव्हा हा समाज गावाच्या प्रमुखाची कामे विनामोबदला करत त्या बदल्यात प्रमुख त्यांना धान्य देत असे. काळ बदलला. प्रमुखाकडून मोफत धान्य देणे बंद झाले आणि बारा बलुतेदार त्यांच्या कामासाठी व मोबदल्यासाठी वणवण फिरू लागले. कामधंदा नसल्याने चोऱ्या करू लागले. पोलीस त्यांना पकडू लागले. कोठे काही झाले की पहिला संशय यांच्यावरच. पोलीस येत पुरूषांना पकडून घेवून जात. त्यांच्या महिला मग कोर्टकचेऱ्यातच आयुष्य घालवत. त्यातुन तो सुटला तर दुसरे पोलीस हजर. अशा रितीने या समाजांचे जीवन हालाखीचे झाले आहे. ही सामाजिक असंतोषाची नांदी असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून यु ट्यूब चॅनलवरील कलावंत तरूणीवर निर्मात्याने केला बलात्कार…नाशिकमध्ये गुन्हा दाखल

Next Post

पूर्ववैमनस्यातून इमारतीवर काचेच्या बाटल्या फेकल्या, महिलेच्या दिशेने गोळीबार…नाशिकची घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Manoj Jarange Patil
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला रवाना…ठिकठिकाणी स्वागत,पत्नी व मुलीला अश्रू अनावर

ऑगस्ट 27, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

या महाविद्यालयातील २१ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…महाराष्ट्रातील २ शिक्षकांचा समावेश

ऑगस्ट 27, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा

ऑगस्ट 27, 2025
1 6 1068x1335 1 e1756283788606
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त रील स्पर्धा….प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

ऑगस्ट 27, 2025
court 1
संमिश्र वार्ता

गोदावरी नदीच्या पुनर्जीवन याचिकेत अवमान याचिका…दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

ऑगस्ट 27, 2025
Untitled 45
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उध्दव ठाकरे…सहकुटुंब घेतले गणपतीचे दर्शन

ऑगस्ट 27, 2025
भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

पूर्ववैमनस्यातून इमारतीवर काचेच्या बाटल्या फेकल्या, महिलेच्या दिशेने गोळीबार…नाशिकची घटना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011