गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतचा ऑस्ट्रेलियावर दुस-या सामन्यातही दणदणीत विजय, मालिकाही घातली खिशात

by Gautam Sancheti
सप्टेंबर 24, 2023 | 10:13 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
F6zXvdOaoAAMxZ2

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्याच्या वनडे मालिका मधील दुसरा सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. भारताने ४०० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया दिले होते.पण, पाऊस आल्यामुळे ३३ षटकात ३१७ धावांचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट पार करतांना ऑस्ट्रेलियाची चांगलीच दमछाक झाली. सर्व खेळाडू बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला फक्त २८.२ षटकात २१७ धावाच करता आल्या.

आजच्या या सामन्यात ५ गडी गमावत भारताने ३९९ धाव केल्या. यात श्रेयस अय्यर १०५, शुबमन गिलने १०४ धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाड ८, इशान किशन ३१, केएल राहुल ५२, रविंद्र जडेजा १३ सुर्यकुमार यादव ७२यांनी धावा केल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादव याने ४४ व्या ओव्हरमध्ये सलग चार सिक्सर मारुन कांगारुंना धक्का दिला. त्यानंतर बँटींगसाठी आलेल्या कांगारुच्या खेळाडूंना भारतीय गोलंदाजांनी जखडून ठेवले. त्यांना फारशा धावा करता आल्या नाही. या सामन्यात आर. अश्विनने व रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन तर प्रसिध कृष्णा दोन विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.

इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये असलेला हा सामना जिंकून भारताने मालिकाही जिंकली. कांगारु पहिल्या सामन्यातील पराभवाचे उ्ट्टे काढण्याची संधी होती.पण, ते अपय़शी ठरले. भारताने धावांचा इतका मोठा डोंगर उभा केल्यामुळे त्यांना तो पार करणे अवघड गेले. हा सामना दुपारी सुरु झाला. त्यात पावसाने दोन वेळ व्यत्यय आणला. पण, पुन्हा हा सामना सुरु झाला. विश्वचषकापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आजचा सामना रंगणार असे वाटत असतांना तो एकतर्फी झाला.

२२ सप्टेंबर रोजी झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने पाच गडी गमावत दणणीत विजय मिळवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया २७७ धावांचे आव्हान दिले होते, हे आव्हान भारताने ४८.४ षटकात पार केले. या सामन्यात २७७ धावांचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली. शुभमन गिलने ६३ बॉलमध्ये ७४ धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाड ७१ धावा केल्या. के.एल. राहुल ५८, सर्यंकुमार यादव याने ५०, श्रेयस अय्यर ३, इशान किशन १८ धावा केल्या. रविंद्र जडेजा ३ धावा केल्या होत्या. तर मोहम्मद शामीने भेदक मारा करत पाच विकेट घेतल्या आहे. जसप्रीत बुमराह, आर अश्विन,,रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय जोश इंग्लिश, स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी महत्वाचे योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स याने अखेरीस जबराट फिनिशिंग टच दिला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात २७६ धावांपर्यंत मजल मारली होती.

या सीरिजमध्ये तीन सामने होणार असून आज दुसरा सामना आहे तर तिसरा सामना २७ सप्टेंबरला होणार आहे. पहिल्या दोन सामन्याचा संघ व तिस-या सामन्याचा संघ अगोदरच जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी कॅप्टन आणि विकेटकीपर केएल राहुल आहे. तर उपकर्णदार रवींद्र जडेजा आहे. तिस-या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा तर उपकर्णदार हार्दिक पंड्या असणार आहे.

पहिल्या दोन सामन्यासाठी टीम इंडिया केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा हे संघात आहे.
India’s resounding victory over Australia in the second match as well

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान मोदींच्या वाराणसीत होणार असे भव्य क्रिकेट स्टेडिअम…. अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime1 1
क्राईम डायरी

रूम पार्टनर झोपी गेला…परप्रांतीय तरूणाने बॅगेतील रोकड काढून केला पोबारा

सप्टेंबर 18, 2025
G0yR538bcAA85YQ e1758203148768
राष्ट्रीय

आता या परिक्षेत उमेदवारांच्या चेहेरा प्रमाणीकरणासाठी AI चा वापर…

सप्टेंबर 18, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
Next Post
विचार धन

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011