सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यात पीएमएवाय योजनेला अधिकाऱ्यांकडूनच सुरुंग…..अकुशल कर्मचाऱ्यांची वर्णी……एका कर्मचाऱ्याची पदवी बोगस……!

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 10, 2023 | 3:24 pm
in राज्य
0
Untitled 29

इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुंबई : राज्यात पंतप्रधान आवास योजनेची (शहरी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेची (पीएमयु) स्थापना करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. या यंत्रणेला तांत्रिक माहिती देण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता नसतानाही विशेष बाब म्हणून नियुक्ती केली आहे. यापैकी एका कर्मचाऱ्याने तर चक्क मुंबई विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअर अभ्यासक्रमाची बोगस पदवी नोकरीसाठी सादर केल्याची बाब माहिती अधिकारातून उजेडात आली आहे. या अकुशल कर्मचाऱ्यांमुळे पंतप्रधान आवास योजनेला सुरुंग लागण्याची भीती माहिती अधिकार कार्यकर्ते एजाज अहमद पठाण यांनी मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री आणि केंद्र सरकारला पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) राज्यात डिसेंबर २०१५ पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेसाठी म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून गृहनिर्माण विभागाने नेमणूक केली होती. या योजनेची गती वाढविण्यासाठी गृहनिर्माण विभागाने राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा (पीएमयु) स्थापन केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेला केंद्र शासन मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यस्तरावर ५ ते १० राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार (एसएलटीसी) नियुक्त करण्याची तरतूद आहे. त्यानुसार गृहनिर्माण विभागाने २९ सप्टेंबर २०२२ रोजी ४ एसएलटीसीची कंत्राटी स्वरूपात गृहनिर्माण विभागामध्ये नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी निधी वितरण, बांधकाम प्रगती, एमआयएस नोंदी, जिओ टॅगिंग इत्यादी प्रधानमंत्री आवास योजनेशी संबंधित माहिती सुकाणू अभियान तसेच अंमलबजावणी यंत्रणांकडून घेणे, माहिती संकलित करून त्याचे वर्गीकरण करणे इत्यादी कामे या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहेत.

हे कर्मचारी राज्य स्तरीय तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असतानाही त्यांची शैक्षणिक अहर्ता व कामाचा अनुभवाची कमतरता असल्याची तक्रार म्हाडामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या व्हीआरपी असोसिएशन या संस्थेने म्हाडाकडे केली होती. तर कुणाल सावंत या कर्मचाऱ्याने मुंबई विद्यापीठाची बीई सिव्हिल अभ्यासक्रमाची बोगस पदवी गृहनिर्माण विभागाकडे सादर केली, असल्याचा आरोप एजाज पठाण यांनी केला आहे. डिसेंबर २०२४ ला पीएमएवाय योजना संपणार असून महाराष्ट्र राज्याला मिळालेल्या १५ लाख घरांचा कोटा पूर्ण करण्यात अनुभव नसलेल्या लोकांचा अडथळा ठरणार असल्याचे, एजाज पठाण यांनी पत्रात म्हंटले आहे. तसेच म्हाडाकडे सक्षम अनुभवी तांत्रिक अधिकारी असताना नवीन यंत्रणा उभरण्या मागील गृहनिर्माण विभागाचा उद्देश स्पष्ट होणे गरजेचे असून गृहनिर्माण विभागाने पीएमयुची स्थापना करून म्हाडाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याबद्दलही पठाण यांनी पत्रात खंत व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे नियुक्त अधिकाऱ्यांचे अनुभव प्रमाणपत्र तसेच पदविका खरे असल्याची शहानिशा न केल्याने गृहनिर्माण विभागात आंधळा कारभार सुरु असल्याचे पठाण यांनी म्हंटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

अन्न व औषध प्रशासनाची दुध भेसळीची मोठी कारवाई….इतका साठा केला जप्त….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
IMG 20231010 WA0207 2 scaled e1696931839814

अन्न व औषध प्रशासनाची दुध भेसळीची मोठी कारवाई....इतका साठा केला जप्त....

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011