रविवार, ऑगस्ट 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बहूप्रतिक्षित हरणबारी पोहोच कालव्याचे पाणी तळवाडे भामेर धरणात पोहोचले

by Gautam Sancheti
सप्टेंबर 24, 2023 | 7:43 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230924 WA0014 1 e1695564778129

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सटाणा – तालुक्यातील बहूप्रतिक्षित तळवाडे भामेर कालव्याचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. मागील शासनाने सदर काम हे शासकीय मापदंडात बसत नाही म्हणून बंद केले होते, ह्या कालव्याला कुठलीही मंजुरी भेटणार नाही असे आदेश दिले होते. २०१५ मध्ये नवनिर्वाचित खासदार डॉ. सुभाष भामरे हे धुळे लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर खासदार भामरे यांनी सदर कालव्याच्या कामाचा स्थानिक लोकांच्या मदतीने पाठपुरावा सुरू केला. डॉ. सुभाष भामरे देशाचे संरक्षण राज्यमंत्री असताना राज्यात भाजपा सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या सहकार्याने या कामाची सुधारित तांत्रिक मान्यता करुन घेण्यात आली.

गेल्या २५-३० वर्षामध्ये रखडलेले तळवाडे भामेर पोहोच कालवा व हरणबारी डावा कालवा हे एकत्र दाखवून शासन स्थरावरून डॉ. सुभाष भामरे यांना ह्या कामाची मंजुरी घेण्यास यश संपादन झाले. २०१९ ला ह्या उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. २०१९ ला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सदर काम दोन वर्ष रखडले परंतु कोरोनानंतर कामाचा वेग वाढवून सदरचे काम आज रोजी पूर्णत्वास आले आहे.

गेल्या १५ दिवसापासून कालव्याची चाचणी घेण्यात येत होती, यावर्षी भयंकर दुष्काळ सदृश परिस्तिथी असल्याने मोसम नदीचे पाणी आटले होते हरणबारी धरणाचा पाणीसाठा कमी प्रमाणात होता.त्यामुळे कालव्याच्या चाचणी साठी अडचण येत होती परंतु मध्यंतरी पावसाचे उशिरा आगमन झाल्याने हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने धरणाचा पाणीसाठ्यात वाढ झाली व कालव्याची चाचणी घेण्यास सुरुवात झाली.

सदर कालवा अनेक वर्ष ओसाड असल्या कारणाने अनेक अडचणी होत्या परंतु त्याही दूर करण्यात आल्या आहेत. आणि आज रोजी कालव्याचे पाणी २७.५० किमी चा प्रवास करुन तळवाडे भामेर धरणात पोहचलेले आहे. आणि यामुळे अंतापूर,तहाराबाद,पिंपळकोठे,दरेगाव,नांदीन,सोमपुर, जायखेडा,वाडीपिसोळ, जयपूर,ब्राह्मणपाडे,तांदुळवाडी,श्रीपुरवडे,वडेखुर्द,उत्राणे ह्या गावांना प्रत्यक्ष फायदा झाला आहे.

हे धरण लवकरात लवकर भरावं यासाठी जलसंपदा विभागाकडे विनंती करण्यात येणार आहे , दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने धरणातील पाणीसाठ्यामुळे तळवाडे भामेर,वरचे टेंभे, खालचेटेंभे,इजमाने,बीजोरसे,मोराने,अंबासन तसेच काटवण भागातील काही गावांना विशेष फायदा होणार आहे. सदर धरणात पाणीपडावं म्हणून परिसरातील गावांतील लोक गेल्या२५-३० वर्षापासून प्रतीक्षा करत होते, आणि ते स्वप्न आज सत्यात उतरले पूर्ण झाल आहे.

सदर कालव्यासाठी शेतकरी, कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा केला त्यासर्वांमुळे तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या सहकार्याने आज माझ्या धुळे मतदारसंघातील सटाणा तालुक्यातील ४० गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे, या कामात माझा हातभार लागल्यामुळे मी खूप समाधानी आहे. सदर कालव्याची चाचणी झाल्यानंतर या कालव्याच्या ज्या छोट्या मोठ्या अडचणी असतील त्याप्रत्यक्ष्यात दिपावली नंतर दुरुस्ती करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिलेल्या आहेत.त्यामुळे पुढीलवर्षापासून कालवा पूर्ण क्षमतेने तळवाडे भामेर धरणापर्यंत पोहोचेल त्यासाठी शासन स्तरावरून गरजेची सर्व मदत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले.

तळवाडे भामेर पोहोच कालव्याबरोबर केळझर डावा कालवा व केळझर चारी क्रमांक ८ ह्या दोघं कालव्याचे पाणी देखील अंतिम टप्यात म्हणजे कौतिकपाड्या जवळ पोहचलेले आहे. येत्या २-३ दिवसात हे पाणी देखील कौतिकपाडा गावात पोहोचेल आणि हया दोन कालव्यांचा फायदा २५-३० गावांना होणार असून मला ह्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे खा. डॉ सुभाष भामरे यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रातील या शहरांना सायबर धोक्‍यांचा सर्वाधिक फटका…. बघा, हा अहवाल काय सांगतोय

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – २५ सप्टेंबर २०२३

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - सोमवार - २५ सप्टेंबर २०२३

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे आर्थिक नियोजन काही प्रमाणात ढासळेल, जाणून घ्या, सोमवार, ११ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 10, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

बिबट्याच्या हल्ल्यात मृतकच्या वारसांना १० लाखांचा धनादेश सुपूर्द…

ऑगस्ट 10, 2025
IMG 20250808 WA0367 2 e1754829983694

एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाला युजीसीकडून स्वायत्त दर्जा…नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय

ऑगस्ट 10, 2025
प्रातिनिधिक फोटो

आता अहिल्यानगर-पुणे नव्या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न…शंभर ते सव्वाशे किलोमीटर अतंर कमी होणार

ऑगस्ट 10, 2025
modi 111

नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या १८४ सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन…

ऑगस्ट 10, 2025
नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांचे फोटो 1 1024x683 1 e1754819420411

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ….या स्थानकावर थांबे

ऑगस्ट 10, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011