गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जोजो हमसे टकराऐगा वो मिट्टी मे मिल जाएगा; छगन भुजबळ यांचा नाव न घेता जरांगेना इशारा

by Gautam Sancheti
जानेवारी 13, 2024 | 11:38 pm
in राज्य
0
IMG 20240113 WA0418 e1705169295313


बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. मात्र आमच्या आरक्षणाला धक्का लावला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. जसे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार काम करतय तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज बीड येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे ओबीसी भटके विमुक्त महाएल्गार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महादेव जानकर,प्रकाश शेंडगे,नारायणराव मुंडे, प्रा.लक्ष्मण गायकवाड, शब्बीर अन्सारी, समीर भुजबळ, प्रा.टी.पी.मुंडे,अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे,कल्याण दळे, दौलतराव शितोळे, सचिन साठे, चंद्रकांत बावकर, डॉ.स्नेहा सोनकाटे, डॉ सुदर्शन घेरडे, प्रा.पी टी चव्हाण,ॲड.सुभाष राऊत यांच्यासह ओबीसी भटके विमुक्त समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी स्व.गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण करत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व. गोपीनाथराव मुंडे आज असते तर ओबीसींचे हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते. पण ओबीसींच्या नशीबी हे दुर्दैव आलं आणि ओबीसींच्या संकटांची मालिका सुरू झाली. या विरुद्ध आपल्याला लढावे लागणार आहे. गेली दोन तीन महिने आंदोलन सुरू होते आपल्या विरोधात खालच्या पातळीवर शिवीगाळ सुरू होती. तरी देखील आपण काहीही बोललो नाही. मात्र बीड पेटले, आमदारांचे घरे, कार्यालये जाळली गेली. सुभाष राऊत यांचं हॉटेल जाळलं गेलं. हे सर्व अचानक झालं नव्हत तर प्लॅन करून सर्व घडविण्यात आल याविरुद्ध आपण गप्प बसायचे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, इतिहास असं म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज मराठा सैनिक घेऊन लढले. इतिहासात हेच नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढले. ते मावळे म्हणजे भटके विमुक्त, ओबीसी, बारा बलुतेदार समाजाचे होते. पण आता छत्रपतींचं नाव घेऊन आमच्यावरच हल्ले केले जात आहेत. छत्रपतींसाठी जीवाची बाजी लावून लढवणाऱ्यांचीच आज घरं पेटवता तुम्ही? त्यांची लायकी काढता? असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले.

ते म्हणाले की, आरक्षणासाठी जे लोक आंदोलन करत आहे. त्यांना काही लोक रसद पुरवीत आहे. काही लोक शांत आहे. जे शांत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, पण जे आमच्या विरोधात काही लोकांना शक्ती देत आहेत त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल. हे जे चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. तसेच आमची किंमत काय आहे ते येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले की, राज्यात वातावरण बिघडविण्याचे आरोप आमच्यावर केले जाताय. त्यांना सांगायचं आहे की आम्ही जाळपोळ केली नाही, कुणाला मारहाण केली नाही, दादागिरी केली नाही असा सवाल उपस्थित केला. ज्या वकिलांनी कुठलीही फी न घेता जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांना जामीन मिळवून दिला त्यांचा सत्कार हे करता आहे. अगदी सरकारने गुन्हे दाखल करू नये असे इशारे देत आहे. त्यातून यामागे कोण आहे हे सर्वांना समजले आहे अशी टीका त्यांनी केली. तसेच जालना जिल्ह्यात २०० हून अधिक गावठी कट्टे आले, अगदी पाच हजारात विक्री झाली, जे आंदोलन करता आहे. त्यांच्या आंदोलनात देखील बंदुका घेऊन लोक सहभागी झाले मात्र पोलिसांकडून कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित करून पोलिसांनी यावर कडक कारवाई करावी अशा सूचना त्यांनी केल्या.

ते म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण कदापिही मिळणार नाही. या अगोदर अनेक आयोगांनी ते सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाही हे सिद्ध केलं आहे त्यांनी आरक्षण देण्यास विरोध दर्शविलेला आहे. आता मात्र ओबीसी आयोग हे मराठा आरक्षण देण्यासाठी केवळ मराठा समाजासाठी काम करतोय का ? हा आयोग ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे ? असा सवाल उपस्थित केला. तसेच देशाच्या मुख्य न्यायमूर्तींचा पगार २ लाख ८० हजार आणि इकडे आयोगाच्या न्यायाधीशांना ४ लाख ८० हजार एवढा पगार दिला जातोय हा प्रकार नेमका काय आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच ओबीसींच्या प्रश्नावर आपण सरकारमध्ये तर बोलतच आहोत आणि इथेही बोलणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले की नाशिकमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्यावेळी देखील कोणी नाशिक बंद करण्याचे आदेश दिले नाही. मात्र त्यांच्या सभा असल्या की शाळांना सुट्टीचे आदेश दिले जातात अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, भुजबळांना पाहून घेऊ अशा धमक्या दिल्या जातात. त्यांना मला सांगायचे आहे की,बेटा छोड दे ये हतियारो की बात, हमसे क्या टकराऐगा, जोजो हमसे टकराऐगा वो मिट्टी मे मिल जाएगा असे छगन भुजबळ यांनी नाव न घेता जरांगेना इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले की, अजितदादा फक्त एवढंच म्हणाले की मुंबईमध्ये मोठ्या संख्येने लोक आल्यानंतर फक्त कायदा व सुव्यवस्था बिघडता कामा नये, एवढीच काळजी घ्या. तर त्यांच्याविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषा वापरली गेली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबाबत किती घाणेरडी भाषा वापरली गेली. इतका असंस्कृतपणा? एवढी मस्ती कुठून आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, गोरगरिबांच्या हक्काचे आरक्षण वाचवणे तुमचं आमचं काम आहे आणि कायदा हातात घेणार नाही. मात्र संविधानाने दिलेला अधिकार गाजवणार. आम्ही पेटविनारे नाही पटवणारे आहोत, आम्ही तोडणारे नाही घडवणारे आहोत असे सांगत करत आम्ही देखील मेलेल्या आईचे दूध पिलेलो नाही असा इशारा त्यांनी दिला. तसेच ते म्हणाले की, समाजाने दबाव निर्माण केला पाहिजे. आज ओबीसी संकटात आहे. त्यासाठी दलित आदिवासी बांधव एकमेकांना साथ देत आहेत.एकत्र येऊन लढले पाहिजे असे सांगत जिते वही है जो शेर होते है, बाकी सब मिट्टी के ढेर होते है या शायरीने सर्वांना एकत्र येऊन लढण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी क्षीरसागर कुटुंबियांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी वसीम शेख, जलील अन्सारी, सत्तार शेख, अझीम शेख यांनी त्यांना वाचवलं. आपली धार्मिक प्रार्थना बाजूला ठेवून त्यांनी हे माणुसकीचं काम केलं. याबद्दल आज ओबीसी मेळाव्याच्या मंचावरून त्या सर्वांचा जाहीर सत्कार केला. यावेळी राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त वंदन केले. तसेच आपल्या हॉटेलची जाळपोळ होऊन देखील ओबीसींच्या लढ्यात योगदान देत असलेल्या सुभाष राऊत यांचं खास कौतुक करत यापुढील काळातही आपलं काम सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू सुरु…पण, मुख्यमंत्र्यांना या गोष्टींची चिंता

Next Post

स्मार्ट गृहिणींसाठी या आहे स्मार्ट किचन टीप्स….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

farmer
महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच हा निधी जमा होणार…९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ

सप्टेंबर 4, 2025
Maharashtra Police e1705145635707
महत्त्वाच्या बातम्या

‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू…पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

सप्टेंबर 4, 2025
nirmal sitaraman
मुख्य बातमी

जीएसटीच्या स्लॅबमध्ये मोठा बदल…बघा, कोणत्या वस्तू होणार स्वस्त

सप्टेंबर 4, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
महत्त्वाच्या बातम्या

गेल्यावेळेस प्रश्न सोडवला होता ना, मग परत मराठा आंदोलन का? एकनाथ शिंदे यांना विचारा….राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

ऑगस्ट 30, 2025
Untitled 48
राज्य

महाराष्ट्राचा विविध कंपन्यांशी १७ सामंजस्य करार…३४ हजार कोटींचा गुंतवणूक, ३३ हजार रोजगार निर्मिती

ऑगस्ट 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 30, 2025
rape2
इतर

लग्नाचे आमिष दाखवत रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ऑगस्ट 30, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

घरच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे शासनाच्या या पोर्टलवर अपलोड करा…सांस्कृतिक मंत्र्याचे आवाहन

ऑगस्ट 30, 2025
Next Post
IMG 20240113 WA0395 1

स्मार्ट गृहिणींसाठी या आहे स्मार्ट किचन टीप्स….

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011