मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लक्षद्वीप व मालदीवमध्ये नेमका काय फरक आहे…एका निर्णयांचे कसे पडले पडसाद..वाचा माहितीपूर्ण लेख

by Gautam Sancheti
जानेवारी 13, 2024 | 12:00 am
in राज्य
0
Untitled 91

दत्ता भालेराव, नाशिक
नितांत सुंदर लक्षद्वीपचे पंतप्रधानांनी स्वतः भेट देऊन जगाचे लक्ष वेधले त्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन. गेले काही वर्षांपासून मोदीजी देशांतर्गत पर्यटन वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. देशाच्या प्रमुखाने आपल्याच एखाद्या भुभागास भेट देऊन त्याचे कौतुक करणे यात गैर काहीच नव्हते. दक्षिण भारतातील केरळ राज्यातील कोची शहरापासून अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे सुमारे २२०-४०० किलोमिटर आहेत. हा ३५ बेटांचा समूह असून केवळ १० बेटावर मानवी वस्ती आहे. या बेटांचा तळाशी समुद्रात पर्वतांची रांग लक्षद्वीप ते मालदीव अशी पसरली आहे. कवरत्ती हे शहर लक्षद्वीप ची राजधानी असून अगत्ती , कडमट, मिनिकोय ही बेटे प्रसिद्ध आहेत. येथे प्रामुख्याने मुस्लिम वस्ती आहे. येथे एक विमानतळ असला तरी सर्व वाहतूक कोची येथून सागरी मार्गाने चालते. लक्षद्वीपला जाण्यासाठी लक्षद्वीप प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. अंदमानच्या तुलनेत लक्षद्वीप पर्यटनाच्या बाबतीत थोडे मागे राहिले आहे. पण सध्याच्या घडामोडीमुळे लक्षद्वीपने जगाचे लक्ष वेधले आहे. कारण मोदीजी यांनी लक्षद्वीपला दिलेली भेट हे निमित्त ठरले. त्यांनी लक्षद्वीपचे भरपूर कौतुक केले आणि छटाकभर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी प्रथम यावर गरळ ओकली.

एक प्रकारे निसर्ग रम्य मालदीवच्या गळ्याला आणि स्वतःच्या पदाला नख लाऊन घेतले. त्यांना वाटले मोदीच्या या भेटीने मालदीवचे महत्व कमी होईल म्हणून त्यांनी समाज माध्यमावर काही आक्षेपार्ह विधाने केली किवा त्यांचेकडून करून घेतली गेली. अर्थात हा योगायोग नाही आणि ही कार्यावाही तोंड देखलीही असू शकते कारण हे प्रकरण दिसते तेवढे मालदीवचे नवीन अध्यक्ष मोहम्मद मुझ्झु सत्तेवर आल्यापासून त्यांचे भारताशी ब्रेक अप करून चीनशी जवळीक वाढून विविध सवलती आणि खैरात मिळवण्यासाठी त्यांचा आटापिटा चालू आहे. भारताला वाकुल्या दाखुन आणि ब्लॅकमेल करून चीन कडून जास्तीत जास्त सवलती पदरात पाडून घेण्यासाठी हा उपदव्याप असण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भारत आणि मालदीव मधील नागरिकांचे नाते जुने आणि घट्ट आहे. उद्या परत मुझ्झू जातील आणि भारताशी नाळ असलेले लोकप्रतिनिधी सत्तेवर येतीलही. म्हणून या सगळ्या गोष्टींकडे उघड्या डोळ्यांनी पाहणे जास्त योग्य आहे.

मालदीवची अर्थ व्यवस्था मुळातच पर्यटनावर अवलंबून आहे. दरवर्षी लाखो भारतीय मालदीवच्या तिजोरीत करोडो डॉलर ओततात , यावर भारत सरकारने कधीही बंधन आणले नाही. मात्र चीन सरकारने आपले चलन बाहेर जाऊ नये म्हणून विदेशी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात बंधने आणली आहेत आणि त्यामुळेच थायलंड, श्रीलंका अश्या काही पर्यटनावर अवलंबून असलेल्या देशांनी विसा फ्री केला आहे. अश्या परिस्थितीत केवळ पर्याटनावर अवलंबून असलेला एखादा देश अचानक असे का वागतो याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच औषधपाण्या पासून तर सुरक्षा या सगळ्या गोष्टीवर भारताची नेहमी मदत घेणारा मालदीव असे का वागतोय हेही पाहायला हवे. सखोल माहिती न घेता तेथील पर्यटनावर बहिष्कार टाकून त्यांना धडा शिकवणे आपल्या हिताचे आहे का हेही बघितले पाहिजे. बुकिंग रद्द झाल्याचे आकडे किती खरे हेही महत्त्वाचे. कारण सोशल मीडियावर मालदीव वर बहिष्कार घाला असा मेसेज करणे सोपे आहे. पण हॉटेल सुरू असल्याने, विमाने रद्द झालेली नसल्याने त्यावर किती पर्यटक पाणी सोडतील हेही बघितले पाहिजे. तसेच यापूर्वी अनेक वर्षा पासून भारताने मालदीववर केलेला खर्च निळ्या समुद्रात सोडून द्यावा का? यामागे बारक्या डोळ्याच्या चीनचा कपटी डावही ओळखवास हवा.

या सर्व पार्श्वभूमीवर बहिष्काराचा गांभीर्याने विचार करावा. याच बरोबर हेही बघितले पाहिजे आज घडीला जगातील जवळ पास सर्व मोठे ब्रँड हॉटेल्स मालदीव मध्ये आहेत तर लक्ष द्वीप बेटावर तश्या सुविधा येण्यास वेळ लागणार आहे. पण अशक्य काहीही नाही. केंद्र सरकारने मनात आणले तर लक्षद्वीप मध्येही उत्तम हॉटेल्स अल्पावधीत उभे राहतील आणि जगभरातील पर्यटक लक्षद्वीपला येऊ शकतील. कारण दोन्ही ठिकानां मध्ये सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे मालदीव पेक्षा लक्षद्वीपचे निसर्ग सौंदर्य कणभर ही कमी नाही.

या सर्व प्रकारात चीनच्या दौरावर असलेले मुझ्झू यांचे झोळीत खरंच काय पडते, तोंड्याल मंत्री परत कधी येतात हे पाहणे आणि कुठलाही टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा वेट अँड वॉच करावे हे सगळ्यात योग्य राहील. मात्र या सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुसरीकडे जगभरातील मोठे हॉटेल ब्रांड्स लक्षद्वीप येथे येतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिवाय तिथे उद्या अंबानी , अडाणी इ. यांनी मोठी गुंतवणूक केल्यास आपलेच पोट दुखू नये. कारण काहीही असो पर्यटनात थोडा मागे असलेला हा भाग आत्ता लवकरच उकळून निघेल हे नक्की. कारण मागील काही वर्षात मोदिजिनी ज्या ज्या पर्यटन स्थळांना भेटी दिल्या तेथील पर्यटनास भरभराट आलेली आहे.
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्या
नाशिक.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतातील सर्वात लांब सागरी पूल आजपासून सुरु होणार…पंतप्रधानाने केले शुक्रवारी उदघाटन

Next Post

उंबरठाण ग्रामीण रुग्णालयाला राज्य सरकारची मंजुरी…आमदार नितीन पवार यांची माहिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
nitin pawar 1

उंबरठाण ग्रामीण रुग्णालयाला राज्य सरकारची मंजुरी…आमदार नितीन पवार यांची माहिती

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
WhatsApp Image 2025 08 04 at 1.51.07 PM 1920x865 1 e1754317916454

मुख्यमंत्र्यांकडून वॉररुमध्ये ३० प्रकल्पांचा आढावा…दिले हे निर्देश

ऑगस्ट 4, 2025
anjali damaniya

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय बंगला ५ महिने खाली केला नाही…अंजली दमानिया यांनी केली ही टीका

ऑगस्ट 4, 2025
Untitled 4

भारतीय संघाने इंग्लंड विरुध्दच्या अंतिम कसोटी सामन्यात ६ धावांनी मिळवला थरारक विजय

ऑगस्ट 4, 2025
accident 11

धावत्या रिक्षातून पडल्याने ५८ वर्षीय प्रवासी गंभीर जखमी…चालकाच्या हलगर्जीपणामुळे घटना, गुन्हा दाखल

ऑगस्ट 4, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011