बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१५ दिवसांपूर्वी मंत्री झाले; परंतु जनतेने नाकारले

by India Darpan
जानेवारी 8, 2024 | 3:34 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 59

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जयपूरः राजस्थानमध्ये मुख्यमंत्री भजनलाल शर्मा पहिल्या परीक्षेत नापास झाले आहेत. करणपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंह कुन्नर यांनी भाजपचे उमेदवार आणि मंत्री सुरेंद्र सिंह टीटी यांचा १२ हजार ५७० मतांनी पराभव केला आहे.

करणपूरच्या जागेवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने आमदार होण्यापूर्वी सुरेंद्र सिंह यांना मंत्री करून भजनलाल शर्मा मंत्रिमंडळात समाविष्ट केले होते. काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंह यांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर सहानुभूतीचा फायदा मिळाला. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांचा पराभव झाला. श्री गंगानगरच्या करणपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गुरमीत कुन्नर यांच्या निधनानंतर या जागेवरील निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने करणपूर जागेसाठी पाच जानेवारीला मतदान घेतले. काँग्रेसने गुरमीत कुन्नर यांचा मुलगा रुपिंदर सिंह कुन्नर यांना उमेदवारी दिली, तर भाजपने त्यांचे पूर्वीचे उमेदवार सुरेंद्र सिंह टीटी यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले. सुरेंद्र सिंह टीटी यांना राज्यमंत्री केले. निवडणुकीत पक्षाला राजकीय लाभ मिळावा, असा भाजपचा हेतू होता. सुरेंद्र सिंह यांना मंत्री करण्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘एक्स’ वर लिहिले होते, की करणपूरमध्ये ५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी आचारसंहिता लागू असूनही तेथून भाजपच्या उमेदवाराला मंत्री बनवणे हे आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. तेथील मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, असे गेहलोत म्हणाले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकालाचा मुहूर्त ठरला….या तारखेला निकाल

Next Post

पुणे लोकसभेची पोटनिवडणूकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल….

India Darpan

Next Post
SUPRIME COURT 1

पुणे लोकसभेची पोटनिवडणूकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011