सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आसाम मध्ये आता कायमस्वरूपी शांतता….भारत सरकारने उल्फा सोबत केला हा सामंजस्य करार

by Gautam Sancheti
डिसेंबर 30, 2023 | 1:49 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
image001MS6B

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज भारत सरकार, आसाम सरकार आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) यांच्यातील प्रतिनिधींदरम्यान आज नवी दिल्लीत एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांततापूर्ण, समृद्ध आणि घुसखोरीमुक्त ईशान्येच्या दृष्टीकोनाची पूर्तता करण्यासाठी आणि आसाम मध्ये कायमस्वरूपी शांतता, समृद्धी आणि सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या मार्गात, हा करार एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करताना आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा आणि गृह मंत्रालय आणि आसाम सरकारचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

आज आसामसाठी, एक सुवर्णदिन आहे, कारण आता, दीर्घकाळापासून हिंसाचाराचे चटके सोसत असलेल्या ईशान्य भारत आणि विशेषतः आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्याची सुरुवात होणार आहे, असं अमित शाह म्हणाले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दिल्ली आणि ईशान्येकडील देशांमधील दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि खुल्या मनाने चर्चा सुरू करण्यात आली, असं त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखालीच गृह मंत्रालयाने बंडखोरी, हिंसाचार आणि संघर्षमुक्त ईशान्य भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण ईशान्य भारतात, गेल्या ५ वर्षांत विविध राज्यांशी शांतता आणि सीमा संरक्षणाशी संबंधित नऊ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे आज ईशान्येकडील मोठ्या भागात शांतता प्रस्थापित झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, ९००० हून अधिक कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले आहे आणि आसामच्या ८५ टक्के भागातून सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (अफस्पा) मागे घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, भारत सरकार, आसाम सरकार आणि उल्फा यांच्यात आज झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे मोदी सरकारने आसाममधील सर्व हिंसक गटांचा नायनाट करण्यात यश मिळवले आहे. ते म्हणाले की, आजचा करार आसाम आणि संपूर्ण ईशान्येकडील शांततेसाठी खूप महत्त्वाचा आहे.

मोदी सरकार २०१४ साली सत्तेत आल्यानंतर,आसाममधील हिंसक घटनांमधे ८७ टक्के, मृत्यूसंख्येत ९० टक्के तर अपहरणाच्या घटनांमधे ८४ टक्के घट झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एकट्या आसाममध्ये आतापर्यंत ७५०० हून अधिक कट्टरपंथी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले आहे, ज्यात आज ७५० लोकांची भर पडली आहे, म्हणजे आतापर्यंत ८२०० कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण करत, देशात शांततेचे नवे युग सुरू केले आहे. उल्फा संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून कालबद्ध कार्यक्रम तयार केला जाईल आणि त्याच्या देखरेखीसाठी एक समितीही स्थापन केली जाईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव येथे दोन चोरांना नागरिकांनी बेदम चोपले…

Next Post

मुंबई – आग्रा महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात…ट्रेलरची पिकअप व कंटनेरला धडक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 2
महत्त्वाच्या बातम्या

उल्हासनगरमध्ये कलानींचा तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेनेला पाठिंबा…भाजपला धक्का

सप्टेंबर 8, 2025
G0NrBxTWkAALc8P e1757300035808
संमिश्र वार्ता

कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे जाहीर करा…रोहित पवार यांचा सवाल

सप्टेंबर 8, 2025
rain1
संमिश्र वार्ता

आजपासून पुढील पाच दिवस पावसाची उघडीप…त्यानंतर या तारखेपासून पुन्हा पाऊस

सप्टेंबर 8, 2025
541656183 1104530571863252 1386343450728100575 n
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये १६ तास चालली विसर्जन मिरवणूक….२ लाख २६ हजार १७७ मूर्तीचे संकलन

सप्टेंबर 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, जाणून घ्या, सोमवार, ८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
doctor
संमिश्र वार्ता

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

सप्टेंबर 7, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1
महत्त्वाच्या बातम्या

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता या नावाने दिला जाणार….मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सप्टेंबर 7, 2025
WhatsApp Image 2025 09 06 at 6.39.57 PM 1024x682 1
महत्त्वाच्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

सप्टेंबर 7, 2025
Next Post
Untitled 218

मुंबई - आग्रा महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात…ट्रेलरची पिकअप व कंटनेरला धडक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011