गुरूवार, डिसेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आसाम मध्ये आता कायमस्वरूपी शांतता….भारत सरकारने उल्फा सोबत केला हा सामंजस्य करार

डिसेंबर 30, 2023 | 1:49 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
image001MS6B

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज भारत सरकार, आसाम सरकार आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) यांच्यातील प्रतिनिधींदरम्यान आज नवी दिल्लीत एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांततापूर्ण, समृद्ध आणि घुसखोरीमुक्त ईशान्येच्या दृष्टीकोनाची पूर्तता करण्यासाठी आणि आसाम मध्ये कायमस्वरूपी शांतता, समृद्धी आणि सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या मार्गात, हा करार एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करताना आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा आणि गृह मंत्रालय आणि आसाम सरकारचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

आज आसामसाठी, एक सुवर्णदिन आहे, कारण आता, दीर्घकाळापासून हिंसाचाराचे चटके सोसत असलेल्या ईशान्य भारत आणि विशेषतः आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्याची सुरुवात होणार आहे, असं अमित शाह म्हणाले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दिल्ली आणि ईशान्येकडील देशांमधील दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि खुल्या मनाने चर्चा सुरू करण्यात आली, असं त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखालीच गृह मंत्रालयाने बंडखोरी, हिंसाचार आणि संघर्षमुक्त ईशान्य भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण ईशान्य भारतात, गेल्या ५ वर्षांत विविध राज्यांशी शांतता आणि सीमा संरक्षणाशी संबंधित नऊ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे आज ईशान्येकडील मोठ्या भागात शांतता प्रस्थापित झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, ९००० हून अधिक कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले आहे आणि आसामच्या ८५ टक्के भागातून सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (अफस्पा) मागे घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, भारत सरकार, आसाम सरकार आणि उल्फा यांच्यात आज झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे मोदी सरकारने आसाममधील सर्व हिंसक गटांचा नायनाट करण्यात यश मिळवले आहे. ते म्हणाले की, आजचा करार आसाम आणि संपूर्ण ईशान्येकडील शांततेसाठी खूप महत्त्वाचा आहे.

मोदी सरकार २०१४ साली सत्तेत आल्यानंतर,आसाममधील हिंसक घटनांमधे ८७ टक्के, मृत्यूसंख्येत ९० टक्के तर अपहरणाच्या घटनांमधे ८४ टक्के घट झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एकट्या आसाममध्ये आतापर्यंत ७५०० हून अधिक कट्टरपंथी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले आहे, ज्यात आज ७५० लोकांची भर पडली आहे, म्हणजे आतापर्यंत ८२०० कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण करत, देशात शांततेचे नवे युग सुरू केले आहे. उल्फा संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून कालबद्ध कार्यक्रम तयार केला जाईल आणि त्याच्या देखरेखीसाठी एक समितीही स्थापन केली जाईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव येथे दोन चोरांना नागरिकांनी बेदम चोपले…

Next Post

मुंबई – आग्रा महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात…ट्रेलरची पिकअप व कंटनेरला धडक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Untitled 218

मुंबई - आग्रा महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात…ट्रेलरची पिकअप व कंटनेरला धडक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011