रविवार, ऑगस्ट 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी हवा असतो दुष्काळ!…..कर्नाटकच्या काँग्रेसच्या मंत्र्यांची मुक्ताफळे

by Gautam Sancheti
डिसेंबर 25, 2023 | 11:41 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 188

बंगळूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यावर भाजपने पलटवार केला आहे. शिवानंद पाटील यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अपमान केल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

राज्यात पुन्हा पुन्हा दुष्काळ पडावा, जेणेकरून त्यांचे कर्ज माफ व्हावे, अशी शेतकऱ्यांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. भाजपने हे विधान शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले असून मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागावा असे आवाहन केले आहे. मंत्री शिवानंद पाटील यांनी सप्टेंबरमध्ये एक वादग्रस्त विधान केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, की मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईची रक्कम दोन लाखांवरून पाच लाख रुपये केल्यानंतर शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

बेळगाव येथील एका कार्यक्रमात पाटील म्हणाले, की कृष्णा नदीचे पाणी फुकट आहे, नालाही फुकट आहे. मुख्यमंत्र्यांनी बियाणे आणि खतेही दिली आहेत. शेतकऱ्यांना एकच गोष्ट आवडेल, की वारंवार दुष्काळ पडावा कारण त्यांची कर्जे माफ केली जातील. शेतकऱ्यांनी अशी इच्छा करू नये, शेतकऱ्यांची इच्छा नसली तरी तीन-चार वर्षांतून एकदा दुष्काळ पडेल. ते म्हणाले की, राज्य दुष्काळाशी झगडत आहे, हे पाहता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मध्यम मुदतीच्या कर्जावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे.

जेव्हा शेतकरी संकटात सापडतो, तेव्हा सरकार त्यांच्या मदतीला धावून येते; पण कोणत्याही सरकारला तसे करणे नेहमीच अवघड असते. देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात मंत्र्यांचे वक्तव्य बेजबाबदार असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला. देशाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध काँग्रेस आणि त्यांच्या सरकारची ही वृत्ती दुर्दैवी आहे, असे म्हणत त्यांनी निषेध केला. भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी पाटील यांच्यावर अशी विधाने करून शेतकरी आणि कृषी संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप करत एक मिनिटही मंत्रिपदावर राहण्यास ते योग्य नसल्याचे सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘एनआयए’ने दहशतवाद्यांच्या केलेल्या चौकशीत ही धक्कादायक गुपिते झाली उघड….

Next Post

हिमाचलमध्ये रस्त्यावर गाड्याच्या रांगा…या पठ्ठ्याने थेट नदीतूनच गाडी चालवली (बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 189

हिमाचलमध्ये रस्त्यावर गाड्याच्या रांगा…या पठ्ठ्याने थेट नदीतूनच गाडी चालवली (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled 12

राष्ट्रवादी शरद पवार गटाची राज्यव्यापी ‘मंडल यात्रा’….३५८ तालुक्यात १४ हजार ८७७ कि.मी. प्रवास करणार

ऑगस्ट 10, 2025
Gx5vSZ XUAAfR4y e1754792266102

या गावातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या रक्ताने लिहले पत्र…केली ही मागणी

ऑगस्ट 10, 2025
congress 11

पुण्यात काँग्रेसच्या निवनियुक्त प्रदेश पदाधिका-यांची दोन दिवसांची निवासी कार्यशाळा….काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या ऑनलाईन करणार संबोधन

ऑगस्ट 10, 2025
Untitled 11

जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पहिल्या मालगाडीचे आगमन….पंतप्रधानांनी केले कौतुक

ऑगस्ट 10, 2025
Rawal 1 1 1024x768 1 e1754790679186

दिल्लीत केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक…शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नांवर झाली चर्चा

ऑगस्ट 10, 2025
1024x684 e1754789651386

आता देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था…महसूलमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

ऑगस्ट 10, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011