शुक्रवार, सप्टेंबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पाकिस्तान आणि बांगलादेश देशाच्या संपूर्ण सीमेवर येत्या दोन वर्षांत कुंपण घालणार….

by Gautam Sancheti
डिसेंबर 1, 2023 | 6:57 pm
in राष्ट्रीय
0
image002RMY2

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज झारखंडमधील हजारीबाग येथे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५९ व्या स्थापना दिना निमित्त आयोजित समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि उपस्थितांना संबोधित केले. अमित शाह यांनी यावेळी ‘बॉर्डरमॅन’, या बीएसएफच्या वार्षिक मासिकाचे प्रकाशनही केले. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, “जीवन पर्यन्त कर्तव्य” ही केवळ बीएसएफची घोषणाच नसून, आतापर्यंत 1,900 पेक्षा जास्त सीमा प्रहरींनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देऊन हे ब्रीद वाक्य पूर्ण केले आहे. ते म्हणाले की, लाखो सीमा प्रहरींनी त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ अत्यंत कठीण परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहून घालवला आहे.

ते म्हणाले की, देशाच्या सीमांचे रक्षण करणारी पहिली फळी म्हणून, बीएसएफने ज्या प्रकारे देशाच्या दुर्गम भागातील सीमा सुरक्षित केल्या आहेत, त्याबद्दल, सीमा सुरक्षा दलाच्या या शूर जवानांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या एका सीमेवर एक सुरक्षा दल तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. ते म्हणाले की, या निर्णयानुसार पाकिस्तान आणि बांग्लादेश बरोबरच्या अतिदुर्गम सीमांच्या रक्षणाची जबाबदारी सीमा सुरक्षा दलावर सोपवण्यात आली होती, आणि बीएसएफने ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील बर्फाच्छादित प्रदेश असो, की ईशान्येकडील विशाल पर्वत रांगा, गुजरात आणि राजस्थानचे वाळवंट असो, गुजरातचा दलदलीचा प्रदेश असो, किंवा सुंदरबन आणि झारखंडचे घनदाट जंगल असो, बीएसएफने सदैव सतर्क राहून शत्रूचे दुष्ट हेतू हाणून पाडले आहेत. सीमा सुरक्षा दलाने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्येही आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा आणि शौर्याचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. ज्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत तो देश कधीच विकसित आणि समृद्ध होऊ शकत नाही, असे शाह म्हणाले.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे, आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपल्या शूर सैनिकांचा त्याग, समर्पण आणि शौर्याने देशाच्या सीमा सुरक्षित असतील. देशाच्या सीमांचे रक्षण करणारे शूर सैनिक हे देशाच्या विकासाचा भक्कम पाया आहेत असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले की, सीमा सुरक्षा दलाचे शिपाई केवळ देशाच्या सीमांचे रक्षण करत नाहीत तर ते देशातील युवकांना शिस्तपालनाचा संदेश देखील देत असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांत देशाच्या सीमेवर ५६० किलोमीटरचे कुंपण उभारुन घुसखोरी तसेच तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. येत्या दोन वर्षांच्या काळात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या बाजूंच्या सीमा कुंपण घालून संपूर्णपणे सुरक्षित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशाच्या ११०० किलोमीटरच्या सीमेवर फ्लडलाईट्स बसवण्यात आले असून ५४२ नव्या सीमावर्ती चौक्या तसेच ५१० टेहळणी चौकी मनोरे उभारण्यात आले आहेत तसेच हरामी नाला भागात पहिल्यांदाच टेहळणी मनोऱ्याची उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. सीमेवरील ६३७ चौक्यांना वीजपुरवठा सुरु करण्यात आला असून सुमारे ५०० ठिकाणी पाणीपुरवठ्याची सोय करून देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. याबरोबरच, सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांची सोय व्हावी म्हणून ४७२ ठिकाणी सौर उर्जा संयंत्रे बसवण्यात आली आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की आपला देश डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादापासून संपूर्णपणे मुक्त असेल तो दिवस आता फार दूर नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १० वर्षांत या दिशेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. मोदी सरकारच्या या प्रयत्नांचा परिणाम म्हणून या विचारसरणीशी संबंधित हिंसेच्या घटना ५२ टक्क्यांनी कमी झाल्या, अशा घटनांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 70 टक्क्यांनी कमी झाले तर डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादामुळे प्रभावित जिल्ह्यांची संख्या ९६ वरुन कमी होऊन ४५ झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की आता डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादी वृत्तीचा अधिकाधिक संकोच होत आहे आणि आता केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल तसेच भारत-तिबेट सीमा पोलीस दल नवे धैर्य आणि नव्या धडाडीने या विचारसरणीवर अंतिम प्रहार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते म्हणाले की, येत्या काही दिवसांत देशाला डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादापासून संपूर्णपणे मुक्त करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे. सुरक्षा विषयक पोकळी भरून काढण्यासाठी या भागांमध्ये 199 नव्या चौक्या सुरु करण्यात आल्या आहेत. नव्या चौक्या उभारून आणि गस्तीचे प्रमाण वाढवून डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाचे सर्व स्रोत नियंत्रित करण्यात आले आहेत आणि याचा परिणाम म्हणून बुढा पहाड आणि चकरबंद यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादापासून संपूर्णपणे मुक्त करण्यात आपल्याला यश लाभले आहे. कोल्हन आणि झारखंडमधील काही भागात या विचारसरणीविरुद्धचा निर्णायक लढा अजूनही सुरूच असून आम्ही त्यात नक्कीच विजयी ठरू असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये ६७ व्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन…मॅटवर स्पर्धा, २८ राज्यांचे संघ सहभागी होणार

Next Post

नशिक जिल्ह्यात पहिलाच प्रयोग…शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, हॉटेलमध्ये मिळणार बचत गटांना स्टॉल्स

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
महत्त्वाच्या बातम्या

सीबीआयने अनिल अंबानीशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये केले आरोपपत्र दाखल…२७९६ कोटींच्या घोटाळयाचा असा रचला कट

सप्टेंबर 19, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी साधला संवाद…या विषयावर झाली चर्चा

सप्टेंबर 19, 2025
IMG 20250918 WA0276 e1758249257199
स्थानिक बातम्या

नाशिक एफडीएची धडक कारवाई…४३ हजाराचा बनावट पनीर व खव्याचा साठा जप्त

सप्टेंबर 19, 2025
cricket
स्थानिक बातम्या

रणजी ट्रॉफी सराव.. नाशिकच्या सत्यजित बच्छावची या सामन्यात ५ बळींसह अष्टपैलु चमक

सप्टेंबर 19, 2025
Untitled 26
मुख्य बातमी

भारतातील या ७ नैसर्गिक स्थळांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश…महाराष्ट्रातील या स्थळालाही स्थान

सप्टेंबर 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, शुक्रवार, १९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
IMG 20250918 WA0380 1
संमिश्र वार्ता

हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्यात सुधारणा करा…मंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 18, 2025
G1IZjsTaQAA9THD 1024x652 1
महत्त्वाच्या बातम्या

सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी जमीन अकृषक परवाना अट काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश….

सप्टेंबर 18, 2025
Next Post
IMG 20231201 WA0276

नशिक जिल्ह्यात पहिलाच प्रयोग…शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, हॉटेलमध्ये मिळणार बचत गटांना स्टॉल्स

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011