गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ऐतिहासिक! इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकून भारताने रचला इतिहास; असे आहेत आजवरचे विक्रम

by Gautam Sancheti
जुलै 18, 2022 | 11:23 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
indian cricket team 1 e1658123577227

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंग्लंडमधील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मँचेस्टरच्या ओल्डट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या वनडेत ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या भारताच्या विजयाचे नायक ठरले. भारताने इंग्लंडचा पाच विकेटने पराभव केला. ऋषभ पंतने शानदार शतक ठोकत 113 चेंडूत नाबाद 125 धावा केल्या. यात 16 चौकार आणि दोन षटकार आहेत. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 260 धावांचे लक्ष्य भारताने 42.1 षटकात पूर्ण केले.

भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. शेवटच्या वनडेत टीम इंडियानं पाच विकेट्स राखून विजय मिळवला. भारताकडून ऋषभ पंतचे शतक झाले तर त्याचवेळी हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरी केल्याने या विजयासह भारतानं अनेक विक्रमही आपल्या नावावर केलेत.

विशेष म्हणजे टीम इंडिया 2015 पासून गेल्या आठ वर्षांत द्विपक्षीय वनडे मालिका जिंकणारा इंग्लंडमधील दुसरा संघ आहे. यादरम्यान इंग्लंडने सात संघांविरुद्ध 15 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळली आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये इंग्लंडचा 3-2 आणि 2020 मध्ये 2-1 असा पराभव केला होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळला गेला. भारताने पहिला एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला, तर दुसरी वनडे इंग्लंडने 100 धावांनी जिंकली. भारतीय संघाने तिसरा एकदिवसीय सामना पाच गडी राखून जिंकून एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली. इंग्लंडचा संघ 259 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 42.1 षटकांत लक्ष्य गाठले.

#TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/SWYJMoMFOl

— Indian Cricket Team (@IndianCricNews) July 17, 2022

भारताच्या संघाने 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकापासून इंग्लंडविरुद्ध आठ पांढऱ्या चेंडूंची मालिका (ODI आणि T20) खेळली आहे. यापैकी टीम इंडियाने सात मालिका जिंकल्या. केवळ 2018 मध्ये इंग्लंडनं घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत भारताला 2-1 ने पराभूत केले होते. उर्वरित सात मालिका भारताने घरच्या मैदानावर आणि इंग्लंडमध्ये जिंकल्या आहेत.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 45.5 षटकांत 259 धावांत गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारताने एका क्षणी 72 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनी मिळून सामन्याला फिरवले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी रचली. भारताने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध 11 मालिका जिंकल्या आहेत.

विशेष म्हणजे इंग्लंडच्या भूमीवर टीम इंडियाचा हा चौथा एकदिवसीय मालिका विजय आहे. यामध्ये 1986 मध्ये 1-1 असा ड्रॉ देखील समाविष्ट होता. ज्यामध्ये भारताला विजेता घोषित करण्यात आलं. भारतीय संघ आठ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकू शकला. टीम इंडियाने शेवटची वेळ 2014 मध्ये इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका 3-1 ने जिंकली होती. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तिन्ही फॉरमॅट एकत्र करून सलग सातवी मालिका जिंकली आहे.

वनडेचे वर्ष, यजमान देश, मालिका निकाल
2017 – भारत – भारत 2-1 ने जिंकला
2018 – इंग्लंड – इंग्लंडचा 2-1 ने विजय
2021 – भारत – भारत 2-1 ने जिंकला
2022 – इंग्लंड – भारत 2-1 ने जिंकला

टी 20 चे वर्ष, यजमान देश, मालिका निकाल
2017 – भारत – भारत 2-1 ने जिंकला
2018- इंग्लंड – भारत 2-1 ने जिंकला
2021 – भारत – भारताचा 3-2 असा
2022 – इंग्लंड – भारत 2-1 ने जिंकला.

India Win One Day Series Against England Record History Cricket

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हयातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

Next Post

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोदींनी साधला माध्यमांशी संवाद; बघा, काय म्हणाले ते (व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
pm narendra modi

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोदींनी साधला माध्यमांशी संवाद; बघा, काय म्हणाले ते (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Gyy4 pSWYAAjtUr e1755777906342

खासदार सुनेत्रा अजित पवार संघाच्या कार्यक्रमात…वेगवेगळ्या प्रतिक्रियेनंतर दिले स्पष्टीकरण

ऑगस्ट 21, 2025
rohit pawar

शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांना न्यायालयाकडून दिलासा

ऑगस्ट 21, 2025
kapus

कापूस आयात शुल्क माफीचा निर्णय: शेतकरी नाराज

ऑगस्ट 21, 2025
Screenshot 20250821 161509 Facebook 1

नाशिक महानगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई….या भागात रस्त्यालगत उभारलेली ३० अनधिकृत गाळे व पत्राशेड हटवले

ऑगस्ट 21, 2025
प्रातिनिधिक फोटो

दिवाळी आणि छठ पूजेसाठी १२ हजाराहून अधिक विशेष रेल्वे गाड्या…परतीच्या तिकिटांवर इतके टक्के सूट

ऑगस्ट 21, 2025
Untitled 26

सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत प्रसारित….राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011