शनिवार, सप्टेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-पाकिस्तान सामनाः नाणेफेक जिंकणाराच विजयी होणार?

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 24, 2021 | 12:38 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
FCYhaz7VQAIrtnm

नवी दिल्ली – आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर १२ फेरीची दमदार सुरुवात झाली आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आज आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ विश्वचषकात सहाव्यांदा एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर होणार आहे. विश्वचषकाचे सगळे सामने यूएई आणि ओमान येथे खेळवले जात असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय टी-ट्वेंटी विश्वचषकाचे आयोजन करत आहे. आजच्या सामन्यात खेळपट्टी आणि हवामानाची काय स्थिती असेल हे प्रथम जाणून घेऊयात.

हवामानाची स्थिती
दुबईत ऑक्टोबर महिना जास्त उष्ण नसतो. भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान रविवारी हवामान जास्त उष्ण नसेल. आज दुबईमध्ये कमाल तापमान ३४ अंश आणि किमान तापमान २६ अंश असेल. आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्यता नाही. परंतु सायंकाळी मैदानावर दव पडण्याची शक्यता असल्याने नाणेफेक महत्त्वाची ठरेल.

नाणेफेक ठरणार महत्त्वाची
या मैदानावर आतापर्यंत ६१ टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणार्या संघांनी ३४ आणि नंतर फलंदाजी करणार्या संघानी २६ सामने जिंकले आहेत. आयपीएल २०२१ दरम्यान येथे १३ सामने खेळवले गेले. त्यामध्ये धावांचा पाठलाग करणारे संघांनी सर्वाधिक ९ सामने जिंकले आहेत. तर प्रथम बल्लेबाजी करणार्या संघांनी फक्त ४ सामन्यातच यश मिळविले आहे. सध्या मैदानात पडणारे दव महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. सराव सामने आणि आयपीएलमध्ये याची प्रचिती आली होती. गवतावर दवबिंदू असल्याने धावांचा पाठलाग करणे सोपे ठरते. त्यामुळे दोन्ही संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडेल.

नाणेफेक महत्त्वाची का?
भारत आणि पाकिस्तानदरम्यान एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी विश्वचषक असे दोन्ही मिळून १२ सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने आठ वेळा नाणेफेक जिंकली आहे. भारताने सात वेळा प्रथम फलंदाजी निवडून सामना जिंकला आहे. २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत झालेल्या गट फेरीचा सामना बरोबरीत सुटला होता. त्या सामन्यातही भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती.

दोन्ही संघातील सर्वाधिक धावा – भारतः १९२/५ (अहमदाबाद, २०१२)
दोन्ही संघातील सर्वात कमी धावा – पाकिस्तानः ८३/१० (आशिया चषक, ढाका २०१६)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

IND Vs PAK: आजचा सामना केव्हा आणि कुठे पाहता येईल?

Next Post

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वीच ४ भारतीय क्रिकेट खेळाडू मायदेशी; हे आहे कारण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात एलआयसीच्या या अधिका-याला दिली ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 5, 2025
IMG 20250904 WA0382 1
संमिश्र वार्ता

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव….परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

सप्टेंबर 5, 2025
CM
संमिश्र वार्ता

आता राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ …१५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट

सप्टेंबर 5, 2025
A90 LE KV e1757035342319
संमिश्र वार्ता

आयफोनसारख्या डिझाईनसह हा फोन लाँच….६,३९९ रुपये आहे किंमत

सप्टेंबर 5, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना आता इतकी मुदत…

सप्टेंबर 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
Next Post
FCbtX0VVQAk6Jf3

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वीच ४ भारतीय क्रिकेट खेळाडू मायदेशी; हे आहे कारण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011