नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा ज्वलंत प्रश्न असलेल्या काश्मिर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची गोपनीय बैठक जानेवारीमध्ये दुबईत झाल्याचे वृत्त आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताकडून करण्यात आलेल्या हवाई कारवाईनंतर दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. रॉयटर या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगते आहे.
मागच्या दाराने
दीर्घ काळानंतर दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याच्या दृष्टीने बॅकडोअर डिप्लोमसीअंतर्गत पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात केली आहे. काश्मिर हा दोन्ही देशांदरम्यानचा ज्वलंत मुद्दा कायमच राहिला आहे.
रॉ आणि आयएसआय
या गोपनीय बैठकीत भारतीय गुप्तचर संस्था रॉ आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या अधिकार्यांनी सहभाग घेतला. या बैठकीच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरात सरकारने मदत केली आहे.










