मंगळवार, नोव्हेंबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-पाकमध्ये मोठे युद्ध? अमेरिकन इंटेलिजन्सचा अहवाल

एप्रिल 20, 2021 | 12:58 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
india pak

वॉशिंग्टन – भारत आणि पाकिस्तान देशांदरम्यान आतापर्यंत तीन मोठे युद्ध झाले असून, सीमेवर छोट्यामोठ्या चकमकी सुरूच असतात. मोठ्या युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे.  लष्करी सामर्थ्यासह इतर बाबतीत भारत नेहमीच वरचढ ठरत आला आहे. सध्या दोन्ही देशांदरम्यान युद्धबंदी असली तरी येत्या २०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तानदरम्यान एक मोठे युद्ध होण्याची शक्यता असलेला अहवाल अमेरिकेची गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलने त्यांचा ग्लोबल ट्रेन्डस रिपोर्ट अमेरिकेच्या सरकारकडे दिला आहे. हा अहवाल सगळेच देश गंभीरतेने घेत असल्यामुळे त्याचे पडसाद कसे उमटतात हे पाहावे लागेल.
फाइव्ह इयर रिजनल आउटलूक रिपोर्ट-साउथ एशिया या अहवालात दक्षिण आशिया प्रदेशामध्ये अस्थिरता येणार असून अशांतताही पसरणार असल्याचे म्हटले आहे. आगामी काळात भारत-पाकिस्तानदरम्यान मोठे युद्ध होण्याची शक्यता असून हे युद्ध अनेक दिवस चालणार आहे. या युद्धात दोन्ही देशांच्या सैनिकांना बलिदान द्यावे लागणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये या अहवालाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या अहवालावरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र भरतात याची कोणतीच चर्चा नाही. पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र डॉनने ९ एप्रिलला यावर सविस्तर बातमी छापली आहे. तर भारतात फ्रंटलाईन या मॅगझिनने १० एप्रिलला अहवालावर लेख प्रसिद्ध झाला आहे.
आगामी पाच वर्षांच्या काळात भारतात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हल्ला करेल. त्याचे रूपांतर युद्धात होईल, असे नमूद करण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यामुळे आगामी काळातही भारत अशा हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
भविष्यात होणार्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोर पाकिस्तानशी संबंधित असतील. त्यामुळे आधी केलेल्या कारवाईप्रमाणेच तेव्हाही पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा दबाव भारत सरकारवर असेल. त्यानंतर निर्माण होणार्या परिस्थितीत दोन्ही देशात युद्ध होईल, असे अहवालात म्हटले आहे.

india pak1

दोन्ही देशांदरम्यान युद्ध होण्याची शक्यता असली तरी ते अणूयुद्धात रूपांतरीत होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. पण पुढील काही वर्षे दोन्ही देशांसह दक्षिण आशिया परिसरात गंभीर आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारत आणि चीन या दोन्ही देशांदरम्यान गलवान खोर्यात झालेल्या चकमकीसारखीच एखादी घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे. मात्र दोन्ही देशात युद्ध होणार नाही. तसेच अफगाणिस्तानमधून अमेरिकेने पूर्ण लक्ष काढून घेतल्यास त्याचा गैरफायदा घेत पाकिस्तान तालिबानसोबत दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास मदत करेल आणि त्या दहशतवाद्यांचा उपयोग काश्मिरमध्ये कारवाया करण्यासाठी करेल अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.
जागतिक आव्हाने, जगात कोणत्या गोष्टींवरून फूट पडू शकते, त्यामुळे निर्माण होणारी असमानता, स्पर्धा, त्याला जुळवून घेण्यासाठीचे प्रयत्न या पाच थीमच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा २०१६-१७ मध्ये या आधीचा ग्लोबल ट्रेंड्स रिपोर्ट तयार केला होता. त्यामध्ये महामारी येऊन जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. आता ही शक्यता खरी ठरली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सात महिन्याच्या गर्भवतीचा जात पंचायतीने लावला विवाह …

Next Post

स्टेट बँकेत क्लर्कची मेगा भरती; संधी दवडू नका

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
संग्रहित फोटो

स्टेट बँकेत क्लर्कची मेगा भरती; संधी दवडू नका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011