सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-पाकमध्ये मोठे युद्ध? अमेरिकन इंटेलिजन्सचा अहवाल

by Gautam Sancheti
एप्रिल 20, 2021 | 12:58 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
india pak

वॉशिंग्टन – भारत आणि पाकिस्तान देशांदरम्यान आतापर्यंत तीन मोठे युद्ध झाले असून, सीमेवर छोट्यामोठ्या चकमकी सुरूच असतात. मोठ्या युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे.  लष्करी सामर्थ्यासह इतर बाबतीत भारत नेहमीच वरचढ ठरत आला आहे. सध्या दोन्ही देशांदरम्यान युद्धबंदी असली तरी येत्या २०२५ पर्यंत भारत आणि पाकिस्तानदरम्यान एक मोठे युद्ध होण्याची शक्यता असलेला अहवाल अमेरिकेची गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिलने त्यांचा ग्लोबल ट्रेन्डस रिपोर्ट अमेरिकेच्या सरकारकडे दिला आहे. हा अहवाल सगळेच देश गंभीरतेने घेत असल्यामुळे त्याचे पडसाद कसे उमटतात हे पाहावे लागेल.
फाइव्ह इयर रिजनल आउटलूक रिपोर्ट-साउथ एशिया या अहवालात दक्षिण आशिया प्रदेशामध्ये अस्थिरता येणार असून अशांतताही पसरणार असल्याचे म्हटले आहे. आगामी काळात भारत-पाकिस्तानदरम्यान मोठे युद्ध होण्याची शक्यता असून हे युद्ध अनेक दिवस चालणार आहे. या युद्धात दोन्ही देशांच्या सैनिकांना बलिदान द्यावे लागणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये या अहवालाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या अहवालावरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र भरतात याची कोणतीच चर्चा नाही. पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र डॉनने ९ एप्रिलला यावर सविस्तर बातमी छापली आहे. तर भारतात फ्रंटलाईन या मॅगझिनने १० एप्रिलला अहवालावर लेख प्रसिद्ध झाला आहे.
आगामी पाच वर्षांच्या काळात भारतात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हल्ला करेल. त्याचे रूपांतर युद्धात होईल, असे नमूद करण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यामुळे आगामी काळातही भारत अशा हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
भविष्यात होणार्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोर पाकिस्तानशी संबंधित असतील. त्यामुळे आधी केलेल्या कारवाईप्रमाणेच तेव्हाही पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा दबाव भारत सरकारवर असेल. त्यानंतर निर्माण होणार्या परिस्थितीत दोन्ही देशात युद्ध होईल, असे अहवालात म्हटले आहे.

india pak1

दोन्ही देशांदरम्यान युद्ध होण्याची शक्यता असली तरी ते अणूयुद्धात रूपांतरीत होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. पण पुढील काही वर्षे दोन्ही देशांसह दक्षिण आशिया परिसरात गंभीर आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारत आणि चीन या दोन्ही देशांदरम्यान गलवान खोर्यात झालेल्या चकमकीसारखीच एखादी घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे. मात्र दोन्ही देशात युद्ध होणार नाही. तसेच अफगाणिस्तानमधून अमेरिकेने पूर्ण लक्ष काढून घेतल्यास त्याचा गैरफायदा घेत पाकिस्तान तालिबानसोबत दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास मदत करेल आणि त्या दहशतवाद्यांचा उपयोग काश्मिरमध्ये कारवाया करण्यासाठी करेल अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.
जागतिक आव्हाने, जगात कोणत्या गोष्टींवरून फूट पडू शकते, त्यामुळे निर्माण होणारी असमानता, स्पर्धा, त्याला जुळवून घेण्यासाठीचे प्रयत्न या पाच थीमच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा २०१६-१७ मध्ये या आधीचा ग्लोबल ट्रेंड्स रिपोर्ट तयार केला होता. त्यामध्ये महामारी येऊन जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. आता ही शक्यता खरी ठरली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सात महिन्याच्या गर्भवतीचा जात पंचायतीने लावला विवाह …

Next Post

स्टेट बँकेत क्लर्कची मेगा भरती; संधी दवडू नका

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

गणपती e1756131291560
संमिश्र वार्ता

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना…

ऑगस्ट 25, 2025
Nashik city bus 6 e1723473271994
स्थानिक बातम्या

सिटीलिंकची दोन नवीन मार्गांवर बससेवा सुरु…असे आहे वेळापत्रक

ऑगस्ट 25, 2025
manse1
संमिश्र वार्ता

मनसेने राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह तीन जणांची केली पक्षातून हकालपट्टी

ऑगस्ट 25, 2025
निबंधक भागीदारी संस्था संकेतस्थळाचा शुभारंभ 1 2 1024x604 1
संमिश्र वार्ता

भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ कार्यान्वित; आधुनिक सुविधा उपलब्ध होणार

ऑगस्ट 25, 2025
IMG 20250825 WA0292 1 e1756121671326
इतर

काठे गल्लीच्या विघ्नहर्ताचे ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत आगमन

ऑगस्ट 25, 2025
Nitesh Rane
संमिश्र वार्ता

देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द….नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिला हा इशारा….

ऑगस्ट 25, 2025
rape
क्राईम डायरी

अल्पवयीन मुली असुरक्षीत…वेगवेगळ्या दोन घटनेत बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 25, 2025
Jitendra Awhad
संमिश्र वार्ता

अंतरिक्षात जाणारा पहिला व्यक्ती हनुमानजी…अनुराग ठाकुर यांचा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

ऑगस्ट 25, 2025
Next Post
संग्रहित फोटो

स्टेट बँकेत क्लर्कची मेगा भरती; संधी दवडू नका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011