गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हुंडा नाही की मानापमान की मिरवणूक : अनोख्या गावाची भन्नाट कथा…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 14, 2021 | 5:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


श्रीनगर – आपल्या देशात कोणत्याही समाजात सर्वसाधारणपणे लग्न समारंभाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यातच मुलीचे लग्न असेल तर त्यासाठी वधूपित्याला मोठा खर्च करावा लागतो. आणखी विशेष म्हणजे हुंडा, मानपान आदी प्रकार कालानुरूप प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने अनेक समाजात अद्यापही सुरूच आहेत. मोठ्या प्रमाणावर जनप्रबोधन होऊनही रूढी परंपरा बदलण्यास तयार नसतात. देशभरातील अनेक प्रांतात या रुढी-परंपरांचा पगडा दिसून येतो. परंतु काश्मीरमध्ये असे एक गाव आहे की, तिथे हुंडा, मिरवणूक, मानपान अशा कोणत्याच गोष्टी होत नसतात. काय घडते नेमके या गावात जाणून घेऊ या…

काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातील हरमुखच्या सुंदर डोंगरांमध्ये बबवाईल हे सुंदर गाव वसलेले आहे. श्रीनगरपासून ४० कि.मी. अंतरावर असलेले हे गाव कडक नियम आणि शिस्तीसाठी संपूर्ण काश्मीरमध्ये ओळखले जाते. या गावाचे नियम ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. या गावात लग्नामध्ये हुंडा घेणे आणि देणे दोन्ही गुन्हा मानला जातो. विशेष म्हणजे मुलीच्या लोकांना लग्नात एक पैसाही खर्च करावा लागत नाही. याउलट, मुलाचे कुटुंबीय मुलीच्या कुटुंबाला लग्नाचा खर्च, वधूचे कपडे आणि चहा – पाण्याची व्यवस्था यासाठी पैसे देतात.

बडा घर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुमारे १५०० लोकसंख्येच्या या गावात ‘नो हुंडा ‘ चा नियम गेल्या ३० वर्षांपासून काटेकोरपणे लागू केला जातो. याच कारणामुळे या गावात एकही कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडली नाही. बाबाविल गावचे सरपंच महंमद अल्ताफ अहमद शाह यांनी सांगितले की, गावात केलेल्या लेखी कागदपत्रानुसार, मुला – मुलीच्या कुटुंबातील प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे, असा ठराव केला आहे.

यापूर्वी १९९० पर्यंत, या गावात सामान्य रीतिरिवाजांसह विवाह केले जात होते. मुलीचे आईवडील तिला पूर्ण हुंडा देऊन तिच्या सासरच्या घरी पाठवायचे. परंतु १९९१ मध्ये घरगुती हिंसाचाराचे एक प्रकरण येथे समोर आले. कोर्टकचेरीमुळे या प्रकरणाने गावाचे नाव बदनाम झाले. मात्र पंचायतीने समेट घडवून आणला. पती -पत्नी दोघेही एकमेकांसोबत राहण्यास आनंदाने सहमत झाले. त्यानंतर या घटनेने गावकऱ्यांच्या मनावर खोल परिमाण झाला. आणि त्याच दिवशी पंचायतीने ठरवले की आजपासून गावात कोणीही हुंडा घेणार नाही किंवा देणार नाही. यासंदर्भातील लेखी कागदपत्रावर सर्व स्थानिक लोकांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे गावात हुंडाबंदी झाल्यामुळे मुलींच्या लग्नाची चांगली सोय तर झालीच पण यामुळे अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांवरील गुन्हेही संपले. गेल्या ३० वर्षांपासून महिलांवरील अत्याचाराचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. तसेच गावात लागू असलेल्या कायद्यानुसार, जर कोणी हुंडा देताना किंवा घेताना गुंतलेला आढळला तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल.

स्थानिक लोकांनी केवळ त्यांच्या गावात हुंडा न देण्याची परंपरा मर्यादित केली आहे. स्थानिक लोकांनी ‘नो टू हुंडा सिस्टीम’ या नावाने एक मोहीमही सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ते जागरूकता कार्यक्रम आयोजित करून लोकांना विशेषतः तरुणांना प्रेरित करतात. ही मोहीम यशस्वी होऊ लागली आहे. शेजारच्या गावातील तरुण त्यात सामील होत आहेत. हुंडा न घेण्याची ही परंपरा संपूर्ण काश्मीरमध्ये स्वेच्छेने लागू केली जावी, अशी येथील ग्रामस्थांची इच्छा आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अनोखे प्रेम! लहान भावाने किडनी देऊन बहिणीला दिले जीवनदान

Next Post

चाणक्य नीति: अशा व्यक्तींवर कधीच नसते लक्ष्मीची कृपा…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime11
क्राईम डायरी

सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला २८ लाखाला गंडा

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
राज्य

मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांस मंजुरी….तर पुण्यासाठी हा निर्णय

सप्टेंबर 4, 2025
Untitled
संमिश्र वार्ता

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरासंबंधी धोरणास मान्यता…

सप्टेंबर 4, 2025
प्रातिनिधिक संग्रहित फोटो
संमिश्र वार्ता

विशेष लेख…ग्रामीण शेत रस्त्यांना कायदेशीर ओळख देणारा सकारात्मक शासननिर्णय !

सप्टेंबर 4, 2025
farmer
महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच हा निधी जमा होणार…९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ

सप्टेंबर 4, 2025
Maharashtra Police e1705145635707
महत्त्वाच्या बातम्या

‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू…पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

सप्टेंबर 4, 2025
Next Post
chanakya

चाणक्य नीति: अशा व्यक्तींवर कधीच नसते लक्ष्मीची कृपा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011