इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला आणि दुस-या सामान्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आपलं उपांत्य फेरीत स्थान पक्कं केले. रविवारी दुबईत झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी २४२ धावांचं आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान ४२.३ षटकात ४ गडी गमवून पूर्ण केले.
या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने १११ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील ५१ वे शतक ठोकलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हे त्याचे पहिले शतक होते. २०२३ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीनंतर कोहलीने पहिले एकदिवसीय शतक झळकावले. तर श्रेयस अय्यरने ५६ आणि शुबमन गिलने ४६ धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने २ विकेट घेतल्या. अबरार अहमद आणि खुसदिल शाह यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताकडून सर्वाधिक तीन विकेटस कुलदीप यादवने घेतल्या. तर हार्दिकने दोन मिळवले. दुस-या विजयामुळे भारताने उपांत्य फेरीत स्थान पक्कं केले आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या २ मार्चच्या सामन्यात भारतावरील टेन्शन कमी झाले आहे. तर पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
रोहित शर्माने रचला वर्ल्ड रेकॅार्ड
रोहित शर्माने या सामन्यात २० धावांची खेळी साकारली. पण, या २० धावा करत वर्ल्ड रेकॅार्ड रचला. वनडे क्रिकेटमध्ये ९००० धावा करणारा रोहित हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला.