शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बारावीच्या विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या, मंत्री उदय सामंत यांनी केली ही मोठी घोषणा

by Gautam Sancheti
जून 1, 2022 | 4:09 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
hsc college exam

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर इयत्ता बारावीचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. बारावी आणि सीईटी या परीक्षांच्या बाबतील शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही परीक्षांना ५० – ५० टक्के महत्त्व असणार असून पुढील वर्षापासून त्यानुसारच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे इथून पुढे फक्त सीईटीचीच नाही तर बारावीच्या परीक्षेचीही विद्यार्थ्यांना व्यवस्थित तयारी करावी लागणार आहे.

गेल्या काही वर्षात बारावीतील विद्यार्थी बारावीच्या परीक्षेकडे फक्त पास होण्यापुरतं बघतात तर सीईटीला जास्त महत्त्व देतात. उच्च शिक्षणासाठी सीईटीचे मार्क्सच ग्राह्य धरले जात असल्याने बारावीच्या परीक्षेपेक्षा सीईटीला प्राधान्य दिले जात होते. २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षापासून मात्र सीईटीतले ५० टक्के आणि बारावीतले ५० टक्के मार्कांच्या आधारावर प्रवेश दिला जाणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. याशिवाय सीईटीच्या निकालाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली असून १ जुलै रोजी निकाल लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. १ सप्टेंबरपासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे.

या निर्णयामागचं कारण सामंत यांनी स्पष्ट केले असून, बारावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांकडून कमी महत्त्व मिळत असल्याचे त्यांनी म्हणले आहे. इथून पुढे बारावीचे मार्कही प्रवेशासाठी आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना समजलं तर ते सीईटीइतकाच बारावीचाही अभ्यास करतील. शिवाय आता बारावीनंतर ज्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्या जातात त्यांची संख्याही आता कमी करण्यात येणार आहे.

बारावीच्या वर्गात विद्यार्थीच नाहीत..
सीईटीला अधिक महत्त्व दिले जात असल्याने विद्यार्थी त्यासाठी वेगवेगळे क्लासेस लावतात. पण याचा परिणाम बारावीच्या नियमित तासिकांवर होत आहे. वर्गामध्ये विद्यार्थीच बसत नसल्याची परिस्थिती आहे. आता ५० – ५० टक्के महत्त्व असल्यामुळे विद्यार्थी बारावीच्या तासिकाही नित्यनेमाने पूर्ण करतील. येत्या ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२२ दरम्यान पीसीएम तर १२ ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान पीसीबीची एमएचटी सीईटी परीक्षा होणार आहे. त्या सगळ्यांसाठी नवे नियम लागू असणार आहेत अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली आहे.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरकारी अधिकाऱ्याने चक्क ऑफिसमध्येच लावला ओसामा बिन लादेनचा फोटो; सर्वत्र एकच खळबळ

Next Post

पानेवाडीमध्ये जमीन भूसंपदनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी लावले पिटाळून (बघा व्हिडीओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
Next Post
20220601 152612

पानेवाडीमध्ये जमीन भूसंपदनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी लावले पिटाळून (बघा व्हिडीओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011