शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जास्त तापमानाचा कोरोना विषाणूवर काय परिणाम होतो? तो जळतो का?

जून 29, 2021 | 11:34 am
in संमिश्र वार्ता
0
Corona 11 350x250 1

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
गेल्या वर्षी  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तो कसा नष्ट होऊ शकतो यावर वेगवेगळे तर्क लावण्यात आले होते. काहींच्या मते तो जास्त तापमानात नष्ट होतो, तर काहींच्या मते तो कमी तापमानात निष्क्रीय होतो अशा चर्चाही रंगल्या. या सगळ्या चर्चा सुरू असताना कोरोना विषाणूवर जास्त तापमानाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास संशोधकांनी केला आहे.
कोरोना विषाणू ५० अंश तापमानातही आपले काम प्रभावीपणे करत असतो. ५० अंशाच्यावरील तापमानात विषाणू होरपळू लागतो. ८० अंशाच्या वर तो पूर्णपणे नष्ट होत नाही. त्याचा काही भाग सक्रिय असतो. कोरोना विषाणूवर उष्णता आणि वाढत्या तापमनाबाबत पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉयरोलॉजी आणि आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी पहिले संशोधन केले आहे. त्यामध्ये वेगवेगळे निष्कर्ष समोर आले आहेत.
संशोधनानुसार, कोरोना विषाणू ५० अंशावर जळताना त्याच्या बाहेरील संरचनेत असलेल्या छत्रीसारख्या आकारातील स्पाइक प्रोटिन नष्ट होऊ लागतात. तसेच आतील संरचनेत चट्ट्यांसारखे व्रण दिसतात. एखादा किटक चावल्यानंतर आपल्या त्वचेवर पडलेल्या व्रणासारखे हे व्रण दिसतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार ६० ते ७० टक्के भाग नष्ट झाल्यानंतरसुद्धा ३० ते ४० टक्के भाग जळण्यापासून वाचतो. त्या भागाला नष्ट करण्यासाठी जवळपास १०० अंश तापमानाची गरज पडू शकते.
आठ वेगवेगळ्या तापमानात तपसणी
कोरोना विषाणूला २, ४, १२, ३६, ४५, ५०, ६५ आणि ८० अंश तापमानावर ठेवून संशोधन करण्यात आले आहे. ५० अंशाहून कमी तापमानावर विषाणूच्या सायटोपॅथिक प्रभावात कोणताच बदल झाला नाही. ५० अंशा किंवा त्याहून अधिक तापमानामुळे सर्वात प्रथम बाहेरील संरचना नष्ट होऊ लागली. जसेजसे तापमान वाढत गेले तसे विषाणूच्या आतील संरचना नष्ट होत गेली. ८० अंश तापमानात विषाणूचे बहुतांश भाग जळाला होता. परंतु काही भाग बाकी होता. या स्थितीत विषाणूचा सायटोपॅथिक प्रभाव निष्क्रीय झाला होता.
उन्हामुळे विषाणू नष्ट होण्याच्या चर्चा
कोरोना महामारीच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्र झळांमुळे कोरोना विषाणू नष्ट होतो, असे वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केले होते. विषाणूपासून बचावासाठी लोकांनी उन्हात बसावे, असा सल्लाही त्यांनी दिला होता. आतापर्यंत तापमानामुळे विषाणूच्या प्रतिक्रियेबाबत कोणतेच संशोधन झाले नाही. परंतु २५ ते ३५ अंश तापमानावर विषाणू अचानक वाढू लागतो आणि वेगाने नवे बाधित रुग्ण आढळू लागतात, हे दिसून आले आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये अशी स्थिती पाहायला मिळाली होती. त्यादरम्यान पर्वतीय क्षेत्रात तापमान २० अंशापेक्षा कमी होते आणि तिथे नवे रुग्णही आढळले नव्हते.
काही भागात ५० अंशाच्या वर जातो पारा
एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनुसार, देशाच्या विविध भागातील तापमान पाहिल्यास काही भागात तापमापकातील पारा  ५० अंश किंवा त्याहून अधिक वर जातो. बहुतांश भागात पारा ५० अंशाच्या खालीच असतो. अशा तापमानात विषाणूवर कोणताही परिणाम जाणवला नाही. गेल्या वर्षीच राजस्थानातील चुरू येथे ५० अंश तापमान नोंदवले गेले होते. माणूस इतक्या जास्त तापमानात राहू शकत नाही. त्यामुळे वातावरणानुसार विषाणू नष्ट होण्याची कल्पना केली जाऊ शकत नाही.
विषाणूवर तापमानाचा किती परिणाम
तापमान             पहिला साइटोपॅथिक प्रभाव                     नंतरचा साइटोपॅथिक प्रभाव
२ ते ४५                     +++                                                       +++
५०                            +++                                                         ++
६५ ते ८०                    +++                                                कोणताच प्रभाव नाही
(+++ विषाणूचा परिणाम दाखवण्यासाठी सांख्यिकी तंत्रज्ञानाचा वापर)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रपतींसाठी आलिशान सूट असलेल्या या रेल्वेने तुम्हीही प्रवास करु शकता!

Next Post

नाशिक – देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्पाच्या उदघाटनालाच ५००० पॅडची ऑर्डर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
IMG 20210629 WA0090 e1624966620669

नाशिक - देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्पाच्या उदघाटनालाच ५००० पॅडची ऑर्डर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011