मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्याच्या काळात वाढते ताणतणाव, धावपळीचे दैनंदिन जीवन, अयोग्य वेळी जेवण, आहारामध्ये आरोग्याला अनिष्ठ पदार्थांचा उपयोग, बैठे काम, निद्रानाश यासह अनेक कारणांनी बहुतांश नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढू लागला आहे. वाढत्या वजनाची समस्या सर्वांना सतावत असल्याने लठ्ठपणा कोणालाच नको असतो. त्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपायोजना करतात. परंतु आयुर्वेदानुसार पिण्याच्या पाण्याचे उपयोग केल्यास वजन कमी होण्यास मदत होऊ शकते असे म्हटले जाते.
वाढत्या वजनामुळे बहुतेक लोक चिंतेत असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक जण काहीही करायला तयार असतात. योग्य प्रमाणात थंड, कोमट किंवा गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. असे मानले जाते की, आठ किलोमीटरच्या जॉगिंगमध्ये जितक्या कॅलरीज खर्च करू शकता, तितक्याच कॅलरीज फक्त पाणी पिऊन बर्न करू शकता. वास्तविक, पाणी पिऊन, अनेक जण कमी खातात म्हणजे जास्त खाणे टाळता, पाणी हे जास्त न खाण्यास प्रवृत्त करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. पाण्यामुळे वजन कमी करण्यात कशी मदत होते जाणून घेऊ या…
पाण्यात कॅलरीजचे प्रमाण आढळत नाही. हे शरीर सक्रिय ठेवते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यासोबतच चरबी जाळण्यास मदत होते.
जर पाण्याच्या मदतीने वजन कमी करायचे असेल तर पाणी पिण्यास अजिबात विसरू नका. पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटेल, त्यामुळे पुन्हा पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही आणि त्यामुळे वजनही कमी होईल.
असे अनेक जण आहेत जे जेवणासोबत किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी पितात. जर असे केले तर काळजी घ्या कारण असे केल्याने अपचन होऊ शकते आणि त्यामुळे वजनही वाढते. यासाठी एक पर्याय आहे की, जेवण्यापूर्वी पाणी प्या. असे केल्याने आपण जास्त खाणे टाळाल आणि वजन कमी करण्यास देखील मदत कराल.
फॅट कमी करण्यासाठी फॅटच्या सेवनाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. गरम पाणी प्यायल्याने शरीरात साठलेली चरबी घटते आणि वजन कमी करणे सोपे होते. उन्हाळ्यातही दिवसातून एकदा किंवा झोपण्यापूर्वी गरम पाणी प्यावे.
हे सर्वज्ञात आहे की पाण्याला चव नसते. जर या कारणासाठी पाणी पिणे टाळत असाल तर तुम्ही लिंबू, आले, बडीशेप, फळांचे तुकडे इत्यादी काही नैसर्गिक चवीचे पदार्थ यात घालू शकता.