बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुम्ही दररोज वापरता ते मीठ नक्की कसे आहे?

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 19, 2021 | 5:15 am
in इतर
0
salt

तुम्ही दररोज वापरता ते मीठ नक्की कसे आहे?

आयोडिनच्या कमतरतेमुळे उदभवणारे विविध आजार हे सार्वजनिक आरोग्यासमोर असलेली गंभीर समस्या आहे. आपली मुलं ही आपल्या देशाची गुंतवणूक आहेत, म्हणूनच त्यांना “देशाची संपत्ती” असे संबोधल्या जाते. म्हणून मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगांपासून स्वत:ला तसेच आपल्या मुलांना वाचविणे ही काळाची गरज आहे.

  • डॉ. श्रीराम गोगुलवार, (प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

सध्या जगात 1.5 बिलीयन पेक्षा अधिक लोक आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आजाराने ग्रासले आहेत. तर 200 मिलियन पेक्षा अधिक भारतीय लोक आयोडिनच्या कमतरतेमुळे उदभवणाऱ्या धोक्यांना सामोरे जात आहेत. तर 71 मिलियन लोक गलगंड आणि इतर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे भारत सरकारने केंद्र सहाय्यीत राष्ट्रिय गलगंड नियंत्रण कार्यक्रम सुरु केला. या माध्यमातून भारतातील सर्व भागातील लोकांना वेगवेगळया माध्यमांव्दारे “आयोडिन युक्त मीठ” रोजच्या आहारातून घेण्यास आरोग्य शिक्षण दिले जात आहे.

“आयोडिन” हे महत्वपूर्ण खनिज द्रव्यांपैकी एक खनिज असून शरीरातील साधारण थॉयरॉईड ग्रंथींचे कार्य, वाढ आणि विकास होण्यास अत्यंत आवश्यक घटक आहे. आहारातील आयोडिन शरीराच्या भैतिक तसेच मानसिक विकासासाठी आवश्यक असते. आयोडिनची 90 टक्के गरज अन्नातून आणि 10 टक्के आयोडिन पाण्यातून मिळते. समुद्राच्या 1 लिटर पाण्यात 0.05 मि.ग्रॅम (0.05 पी.पी.एम.) आयोडिन असते. समुद्रापासून तयार होणाऱ्या मीठात फक्त 0.28 पी.पी.एम. आयोडिन असते. म्हणून मीठाच्या आयोडीनीकरणासाठी साध्या मिठात पोटॅशिअम आयोडेट वापरले जाते. हे पूर्णपणे सुरक्षित आहे.

रोजच्या आहारात आयोडिनयुक्त मीठ वापरणे कां आवश्यक आहे?
आपल्या गळयामध्ये वरच्या भागात थॉयरॉइड ग्रंथी असते. ही ग्रंथी आयोडिनचा उपयोग करुन थायरॉक्झीन (टी-4) आणि ट्राय-आयडोथायरॉक्झीन (टी-3) नावाचे हार्मोन्स तयार करते. शारीरिक तसेच मानसिक विकासासाठी या होर्मोन्सची आवश्यकता असते.

थॉयरॉक्झीन कमी पडल्यास व्यक्ती निरुत्साळी बनते. लवकर थकवा येतो. त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारे विविध आजार म्हणजेच- गलगंड, मानसिक दुर्बलता, मुकेपणा, बहिरेपणा, तिरळेपणा, उभे राहण्याची आणि चालण्याची क्षमता कमी होणे, अवयवांची वाढ खुंटणे इ. विकार संभवतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये आयोडिनच्या कमतरतेची समस्या अधिक आढळते. पौंगंडावस्थेत आणि पुरुत्पादनक्षम वयात त्याची तीव्रता अधिकअसते. गर्भपात, उपजत मत्यू, जन्मात दोष्, अर्भक मत्यू मधील वाढ, मतिमंदपणा, तिरळेपणा, खुजेपणा, मनोव्यापारातील दौर्बल्य, नवजात हायपोथॉयराडिझम, बाल्यावस्थेतील हायपोथायराडिझम इत्यादी आजार उदभवतात. याशिवाय आयोडिनच्या कमतरतेमुळे “क्रेटिनिझम” हा आजार होतो. गर्भपणाच्या काळात मातेला आयोडीनची कमतरता असल्यास अर्भकाच्या शारीरिक आणि मेंदूच्या वाढीवर दुष्परिणाम होवून कायमचे अपंग येऊ शकते. अशी मुले जन्माला आल्यानंतर सर्वसाधारण मुलांप्रमाणे चालू किंवा बोलू शकत नाहीत. म्हणूनच आयोडिनयुक्त मीठाला अनन्य साधारण महत्च आहे. प्रौढ व्यक्तिला दररोज साधारणत: 150 मायक्रोग्रॅम इतके आयोडीन लागते. गर्भवती आणि स्तनदा मातांना मात्र 200 मायक्रोग्रॅम इतके आयोडिन आवश्यक असते.

खाण्याच्या मीठाचे आयोडिकरण हा आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगांचा प्रतिबंध करण्याचा साधा सोपा परिणामकारक उपाय आहे. सर्वसाधारणपणे आपण दररोज 10 ग्रॅम मीठ खात असतो. आपण 15 पी.पी.एम. एवढे आयोडिन असणाऱ्या आयोडिनयुक्त मीठाचे सेवन केल्यास आपली दैनंदिन आयोडिनची गरज पूर्ण होऊ शकते.

अन्न पदार्थांमध्ये विविध पोषक घटक असतात त्याप्रमाणे आयोडिन नसते काय?
विशेषकरुन समुद्री अन्नपदार्थांमध्ये आयोडिनचे प्रमाण भरपूर असते. परंतु डोंगराळ आणि पुरग्रस्त भाग या ठिकाणी जमिनीमध्ये व पाण्यामध्ये आयोडिनचे प्रमाण फारच कमी असते आणि साहजिकच त्याठिकाणी पिकणाऱ्या पिकांमध्ये सुध्दा आयोडिनचे प्रमाण कमीच राहते. उत्तर-पुर्व भारतात अधिकाधिक डोंगराळ भाग असल्यामुळे त्या भागात खूजेपणाचे लक्षण जास्त प्रमाणात आढळून येतात.

तसेच महाराष्ट्राबाबत सांगायचे झाल्यास औरंगाबाद, जालना, वर्धा, अमरावती, बुलढाणा, सातारा, ठाणे, लातूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्हयांमध्ये आयोडिनच्या कमतरतेचे रोगी जास्त प्रमाणात आढळून आलेले आहेत. इतर जिल्हयांमध्ये सुध्दा या रोगांकरिता सर्वेक्षण झाले असून कमी अधिक प्रमाणात आढळून आलेले आहेत. म्हणूनच आयोडिनच्या कमतरतेने होणाऱ्या विकारांच्या प्रतिबंधाकरिता आपल्या रोजच्या समतोल आहाराचा घटक म्हणून आयोडिनयुक्त मीठाचा वापर करावा.

आयोडिनयुक्त मीठ हे रोजच्या वापरात खूपच कमी लागते. जसे 10 ग्रॅम मीठ या अंदाजाने प्रत्येक माणसाला महिण्यासाठी 300 ग्रॅम आणि 5 जणांच्या कुटुंबाला 1.5 कोलोग्रॅम एवढे मीठ लागते. आयोडिन न्यूनता विकार यापासून बचाव हा मोठा फायदा घेण्यासाठी कुटूंबाला खुपच छोटी किंमत मोजावी लागते.

आयोडिनची कमतरता नसतांना आपण आयोडिनयुक्त मीठ घेतल्याने आपल्याला अपाय होणार नाही. शरीराला आवश्यक असेल एवढेच आयोडिन वापरले जाते आणि बाकीचे आयोडिन लघवी वाटे बाहेर टाकल्या जाते. आयोडीनयुक्त मीठाचे कोणतेही विपरित परिणाम होत नाहीत. हे आरोग्य शिक्षणाव्दारे लोकांना पटवून दिले जाते.

आयोडिनकरणाचा प्रयोग यशस्वीपणे राबविल्यास मुलांच्या शैक्षणिक क्षमतेत वाढ होणे, प्रौढांची कार्यक्षमता वाढणे. याशिवाय जीवनमानाचा दर्जा उंचावणे यासारखे मनुष्यबळ विकासाशी निगडीत फायदे होतात. आयोडिनयुक्त मीठ गर्भवती स्त्रिया, अर्भके तसेच आजारी व्यक्तींसाठी सुध्दा सुरक्षित असते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गर्लफ्रेंड सोबत जीममध्ये असलेल्या नवऱ्याला पत्नीने असे धो धो धुतले (बघा व्हिडिओ)

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या, मंगळवारचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या, मंगळवारचे राशिभविष्य

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011