सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मासिक पाळी उशीरा येते आहे? ही असू शकतात कारणे…

by India Darpan
ऑगस्ट 25, 2022 | 5:09 am
in राष्ट्रीय
0
stomach pain

इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – स्त्रियांच्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे मासिक पाळी होय. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण जेव्हा ती अनियमित होते तेव्हा ती समस्या बनते. कधी कधी आपल्याला याचे कारणही कळत नाही. बहुतेक स्त्रिया या समस्येकडे दुर्लक्ष करतात आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्नही करत नाहीत, असे करून त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे असे दिसून आल्यास त्यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. तर जाणून घ्या मासिक पाळी उशीरा येण्याची कारणे आणि त्यावरील फायदेशीर उपाय. ज्याचा अवलंब करून या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

वयात आलेल्या प्रत्येक स्त्रीच्या गर्भाशयाच्या आतल्या भागाला पेशी आणि रक्ताचे एक अस्तर असते. हे अस्तर ती स्त्री गरोदर झाली असता गर्भाच्या पोषण आणि संरक्षणाकरता वापरले जाते. परंतु जर ती स्त्री गरोदर नसेल तर ते अस्तर गर्भाशयातून योनिमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. आणि नवीन अस्तर तयार होते. ही प्रोसेस दर महिन्याला घडते. त्यामुळे गरोदर नसलेल्या प्रत्येक स्त्रीला प्रत्येक महिन्याला योनिमार्गातून असा रक्तस्त्राव होतो. त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात.

उच्च तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे देखील मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. या व्यतिरिक्त म्हातारपणाचा किंवा तरुणपणाचा परिणामही मासिक पाळीवर दिसून येतो. ज्या स्त्रियांचं वय 40 पेक्षा जास्त आहे त्यांना रजोनिवृत्ती पूर्वी मासिक पाळीमध्ये अनियमितता असू शकते. या व्यतिरिक् तरुण स्त्रियांमध्ये संप्रेरक बदलांमुळे देखील मासिक पाळीत विलंब होऊ शकतो.

मासिक पाळीची सुरुवात किशोरावस्थेतील ९ ते १५ वर्षे वयाच्या मुलींमध्ये दिसून येते. आणि साधारणपणे वयाच्या ४५ ते ५५ वर्षांपर्यंत स्त्रियांना पाळी येते. त्यांनंतर पाळी येणे बंद होते. मासिक पाळी ही साधारणपणे दर २८ ते ३० दिवसांनी येते. रक्तस्त्राव ३ ते ५ दिवस होतो. पहिले २ दिवस त्याचे प्रमाण जास्त असते. गर्भधारणा झाली नाही तर पुन्हा पुढील महिन्यात मासिक पाळी येऊन रक्तस्त्राव होतो.

मासिक पाळीचे हे चक्र चालू असते. लहान मुलींमध्ये सुरूवातीची २ वर्षे पाळी अनियमित असू शकते, आणि परंतु मधल्या संपूर्ण काळात नियमितरित्त्या पाळी येणे हे स्त्रीच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पाळीबद्दल आणि पाळी आलेल्या स्त्री बद्दल असलेल्या अंधश्रद्धांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. एम्सच्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांच्या मते, ज्या स्त्रिया बहुतेक गर्भनिरोधक गोळ्या वापरतात त्यांनादेखील मासिक पाळीशी संबंधित अनियमितता आढळते. वास्तविक गर्भ निरोधक गोळ्या शरीरातील संप्रेरकांवर परिणाम करतात.

मासिक पाळीच्या दिरंगाईची सर्व कारणं लक्षात ठेवून, नित्यक्रम आयोजित करणं, शिस्तबद्ध ठेवणं आणि तणाव मुक्त राहण्याचा प्रयत्न करणं खूप महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम करा आणि प्राणायाम करा आणि सकाळी फिरायला जा, जेणेकरून शरीरात पुरेसा प्राणवायू वाहू शकेल. प्रथिनं आणि जीवनसत्त्वंयुक्त आहार घ्या. पुरेशी झोप घ्या जेणेकरून आरोग्य चांगले राहील.

वजन वाढल्यास शरीराला अधिक इन्सुलिन तयार करण्याची आवश्यकता असते, ज्यामुळे मासिक पाळीत उशीर होतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा, यासाठी व्यायामासह वजन कमी करण्यात मदत करणारा आहार घ्या. शरीरात संप्रेरक बदलांमुळे बर्‍याचदा मासिक पाळीला उशीर होऊ शकतो. यासाठी डॉक्टर त्यावर योग्य उपचार करू शकतात. म्हणून अशी कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. योग्य समस्या तसंच योग्य उपचारांद्वारे डॉक्टर ही समस्या दूर करू शकतात.

बर्‍याच वेळा महिला गर्भाशयाच्या संबंधित आजारांना समजण्यास असमर्थ असतात आणि मासिक पाळीच्या उशीराबद्दल काळजीत असतात. अशा परिस्थितीत डॉक्टर या समस्या समजून योग्य सल्ला देऊन यावर उपचार करण्यास मदत करू शकतात. प्रत्येक महिलांना कुठल्या न कुठल्या गोष्टीचे टेन्शन हे असतेच. कधी कामाचे टेन्शन तर कधी कुटुंबाचे टेन्शन. जर तुम्हीही जास्त टेन्शन घेत असाल तर आजच ही सवय सोडा कारण याचा शरीरावर अनेक प्रकारे वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त तणावामुळे GnRH नावाच्या संप्रेरकाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे ओव्हुलेशन किंवा मासिक पाळी येत नाही. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नये.

मासिक पाळी उशीरा येण्याचे एक कारण आजार देखील असू शकते. अचानक येणारा ताप, सर्दी, खोकला किंवा कोणत्याही दीर्घ आजारामुळेही मासिक पाळीला उशीर होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा घडते आणि एकदा का तुम्ही आजारातून बरे झालात तर तुमची मासिक पाळी पुन्हा नियमित होते. बदलत्या वेळापत्रकामुळे, बदलत्या शिफ्टमध्ये काम करणे, गावाबाहेर जाणे किंवा घरातील लग्न किंवा समारंभ यामुळे अनेक वेळा आपला दिनक्रम बदलत राहतो. या कारणास्तव मासिक पाळीच्या तारखा देखील वर आणि खाली जाऊ शकतात.

एकदा का शरीराला या वेळापत्रकाची सवय झाली की, मासिक पाळी देखील नियमित होते. मासिक पाळी येण्यास उशीर होण्याची सर्व कारणे लक्षात घेऊन दैनंदिन दिनचर्यावर विशेष लक्ष ठेवणे गरजेचं आहे. याशिवाय नियमित व्यायाम, प्राणायाम करा आणि मॉर्निंग वॉकसाठी जा, जेणेकरून शरीरामध्ये पुरेपूर ऑक्सिजन प्रवाहित होईल. त्याचबरोबर चांगला आहार ठेवा, ज्यामध्ये सर्व प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतील. तसेच पुरेशी झोप घ्या, वाढत्या वजनामुळे शरीराला जास्त इन्सुलिन तयार करावे लागते, त्यामुळे मासिक पाळीला उशीर होतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा, यासाठी व्यायामासोबतच असा आहार घ्यावा.

Health Tips Menstruation Cycle Late Reasons

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पैसे मिळविण्यासाठी ठेवीधारकाने बँकेत घातला असा गोंधळ

Next Post

घराबाहेर शौचास गेलेल्या अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या

Next Post
प्रातिनिधिक फोटो

घराबाहेर शौचास गेलेल्या अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011