विशेष प्रतिनिधी, नागपूर
मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्वाचे स्थान आहे. परंतु त्यातही काही अवयव अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. उदाहरणार्थ हृदय, फुफ्फुस, नाक, कान आदि, पण त्यातही डोळे हे मौल्यवान मानले जातात. त्याकरिता डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. आबालवृद्धांनी म्हणजेच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी डोळ्याची काळजी घेतल्यास त्यांना या सृष्टीतील सर्व दृश्य पाहण्याचे व त्याचे आकलन करण्याचा आनंद निर्मळपणे घेता येणे शक्य असते. म्हणून डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊ या…
डॉक्टरांशी संपर्क साधा
डोळ्याची निगा राखण्यासाठी आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास दुर्लक्षित करू नये. डोळ्यांमध्ये जर जळजळ किंवा आग होत असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की, डोळ्याच्या समस्येसाठी वारंवार डोळे धुणे आणि पाणी ओतणे योग्य नाही.
चाळीसीनंतर तपासणी आवश्यक
डोळ्यांचे वय नसते, परंतु काचबिंदूसारखे काही रोग वयाबरोबर येतात. आपल्या कुटुंबातील एखाद्याला हा आजार झाला असेल तर वयाच्या ४० व्या वर्षानंतर आपण नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या. साखरेचा, हायपरटेन्शनचा परिणामही डोळ्यावर येऊ लागतो. आपण पाच वर्षे बीपी-शुगरचे रुग्ण असल्यास, सतत डोळे तपासणी करत रहा.
मोतीबिंदू, काचबिंदू
डोळ्यासमोर बरेच काळे डाग येत आहेत. किंवा डोळ्याच्या पडद्यासमोर अस्पष्ट दिसत असले तर डोळयामध्ये दोष असल्याचे स्पष्ट होते. याव्यतिरिक्त, वय संबंधित मॅक्युलर डीजेनेरेशन हा दृष्टीसाठीचा डोळ्याच्या मध्यभागी एक दोष असू शकतो. साधारणतः वय ६०ते ७० च्या रुग्णांमध्ये हे अधिक दिसून आले. डोळ्यासमोर उभे असलेल्या व्यक्तीलाही ते योग्यप्रकारे पाहण्यास सक्षम नसल्याची तक्रार करतात. अशा रुग्णांना रेटिना, मोतीबिंदू किंवा काचबिंदू असल्याने डॉक्टरांकडे तपासणी केली पाहिजे.









