नागपूर (इंडिया दर्पण वृतसेवा) – ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ अशी एक जाहीरात आपल्याला नेहमीच ऐकायला किंवा बघायला मिळते. कारण आरोग्यासाठी अंड्यांचे फायदे लक्षात घेता, ही जाहिरात सर्वांनी लहानपणापासून ऐकली असेल, परंतु अंड्यांशी संबंधित एक गोष्ट अशी आहे की, त्याबद्दल फार कमी नागरिकांना माहिती असेल. अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, उकडलेल्या अंड्याचे उरलेले पाणी कसे फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊ या,
पोषक
पुरेशा प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम आणि थोड्या प्रमाणात फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सोडियम अंड्याच्या शेलमध्ये आढळतात. अशा परिस्थितीत जेव्हा अंडे उकळता तेव्हा हे घटक पाण्यात मिसळतात. हे सर्व घटक वनस्पतींसाठी खूप फायदेशीर आहेत. वनस्पतींना त्यांच्या पेशींच्या विकासासाठी या सर्व घटकांची आवश्यकता असते.
खत
उकडलेले अंड्याचे पाणी किंवा अंड्याचे कवच झाडांसाठी खत म्हणून काम करतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याची पुष्टी झाली आहे. हॅमिल्टनच्या मास्टर्स गार्डनर यांनी हा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासाच्या अहवालानुसार, ज्या पाण्यात अंडी उकळता. त्या पाण्यात अंडी उकळल्यानंतर अंड्यातील काही पोषक तत्त्वे येतात, जे झाडांसाठी खत म्हणून काम करतात.
टोमॅटो
अंड्यांचे उकळलेले पाणी अशा झाडांसाठी खूप फायदेशीर आहे, कारणही रोपे काही वेळा सूर्यप्रकाशाअभावी खराब होतात. तेव्हा हे पाणी विशेषतः टोमॅटो आणि मिरचीच्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
health tips boiled egg water benefits use